शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
4
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
5
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
6
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
7
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
8
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
9
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
10
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
11
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
12
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
13
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
14
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
15
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
16
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
17
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
18
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
19
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
20
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
Daily Top 2Weekly Top 5

पेठ तालुक्यात जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 15:22 IST

पेठ -तालुक्यात अतिवृष्टीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत केले असून राष्ट्रीय व राज्य महामार्गासह लहान मोठया रस्त्यावर मोठया प्रमाणावर दरडी व झाडे कोसळल्याने जवळपास सर्वच तालुका बंदिस्त झाला आहे.२४ तासात तब्बल २४३मिमी पावसाची नोंद झाली असून तालुक्याने पावसाने सरासरी ओलांडली आहे.

ठळक मुद्देरस्ते बंद-दरडीसह झाडे कोसळल्याने गावांचासंपर्क तुटला, पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान

पेठ -तालुक्यात अतिवृष्टीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत केले असून राष्ट्रीय व राज्य महामार्गासह लहान मोठया रस्त्यावर मोठया प्रमाणावर दरडी व झाडे कोसळल्याने जवळपास सर्वच तालुका बंदिस्त झाला आहे.२४ तासात तब्बल २४३मिमी पावसाची नोंद झाली असून तालुक्याने पावसाने सरासरी ओलांडली आहे.इनामबरी धरणाच्या खालच्या बाजूला रविवारी अचानक भगदाड पडून पाणी निघू लागल्याने इनामबारी सह करंजाळी, देवगाव व परिसरातील गावांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. आमदार नरहरी झिरवाळ, तहसीलदार हरिष भामरे यांनी तात्काळ भेट देऊन संबंधित विभागाकडून उपाययोजना करत भगदाड दुरु स्ती केल्याने धरण वाचविले.आंबेगण गौतमी -गोदावरी प्रवाही वळण योजनेच्या आंबेगण वळण बंधारा पाण्याचा दाब वाढल्याने खालील शिंदे-हट्टी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच सर्व धरणांच्या सांडव्यातून प्रचंड वेगाने पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या जनतेने सतर्क रहावे असे कळवण्यात आले आहे.प्रमुख रस्ते झाले बंदपेठ तालुका मुख्यालयापासून पेठ -भूवन, पेठ- जांभूळमाळ, पेठ- शिवशेत,पेठ- डेरापाडा,पेठ-लव्हाळी, करंजाळी- हरसुल, जोगमोडी -ननाशी रस्त्यावर दरड व झाडे कोसळल्याने मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. प्रशासनाकडून रस्ते मोकळे करण्याची कार्यवाई सुरू असली तरी पावसाचा जोर कायम असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. पावसामुळे दगड व माती रस्त्यावर आली असून घाटरस्त्यावरून प्रवास करणे धोकेदायक बनले आहे.आसरबारी येथील नदी काठची स्मशानभूमी पुरात वाहून गेल्यामूळे अंत्यविधी साठी नागरिकांना ऐन पावसात कसरत करावी लागत आहे. अभेटी, तिर्ढ, आसरबारी, पेठ, कोहोर, गांगोडबारी, झाडीपाडा, धोंडमाळ यांचेसह गावागावात घरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. जामले येथील चिंतामण भोये यांचे शेततळे फुटल्याने सर्व मासे वाहून गेले. माळेगाव, डेरापाडा गावांना जोडणारे फरशी पुल तुटल्याने वाहतूक बंद पडली आहे. धोंडमाळ व जूनोठी येथील पाझरतलाव फुटल्याने शेतीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे