शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

कांदा अनुदानासाठी सांगळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 01:09 IST

नाशिक जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असतानाही शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन व शेततळी पद्धतीचा अवलंब करून कांदापिकाचे उत्पादन घेतले आहे. परंतु कांद्याला प्रतिक्विंटल केवळ ५० रुपये इतकाच भाव मिळाल्यामुळे शेतकºयांपुढे आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : कृषिमंत्र्यांनाही पाठविले निवेदन

नाशिक : जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असतानाही शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन व शेततळी पद्धतीचा अवलंब करून कांदापिकाचे उत्पादन घेतले आहे. परंतु कांद्याला प्रतिक्विंटल केवळ ५० रुपये इतकाच भाव मिळाल्यामुळे शेतकºयांपुढे आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे.अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकºयांना कांदा फेकून देण्याची वेळ आली. शेतकºयांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन तातडीची मदत म्हणून प्रतिक्विंटल ५०० रुपये याप्रमाणे अनुदान मिळावे, असे पत्र जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत सदस्यांनी कांदा उत्पादक शेतकºयांच्या व्यथा मांडून शासनाकडून अनुदान मिळविण्याचा ठराव केला. तत्पूर्वी जिल्हा परिषदेच्या अनेक सभांमध्येदेखील कांद्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. सदस्यांच्या भावना आणि शेतकºयांची अपेक्षा लक्षात घेऊन अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांसह कृषिमंत्री, कृषी राज्यमंत्री, पालकमंत्री गिरीश महाजन यांना पत्र पाठवून कांदाप्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. महाराष्ट्रात कांदा उत्पादनात नाशिक जिल्हा अग्रेसर आहे. मात्र कांद्याला हमीभाव न मिळाल्यामुळे नाशिक जिल्हा परिषदेच्या विविध सभांमध्ये हमीभाव मिळण्याबाबत शासनाकडे मागणीबाबतचे ठराव केले जात आहेत. कांदा उत्पादक शेतकºयांच्या भावना तीव्र असल्याने शेतकºयांना रास्त भाव मिळण्याबाबत निर्णय व्हावा, अशी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी मांडलीआहे.नाशिक जिल्ह्णातील कांदा उत्पादनात झालेल नुकसानीपोटी शेतकºयांना प्रतिक्विंटल पाचशे रुपये अनुदान मिळावे तसेच उत्पादित होणाºया कांदापिकास हमीभाव देण्याबाबत जिल्हा परिषद अध्यक्षांनी फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे.जिल्ह्यात कांदा प्रश्न तीव्रशेतकरी हवालदिल झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील एका शेतकºयाने कांदा पिकास बाजारभाव नसल्याने कांदा चाळीतच विषप्राशन करून आत्महत्या केल्याने जिल्ह्यात कांदाप्रश्न तीव्र असल्याचे पत्रात नमूद करण्यात आलेले आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदonionकांदा