शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:55 IST

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन पत्राच्या माध्यमातून पोहोचविण्यात आल्या आहेत. कांद्याला वीस रुपये प्रतिकिलो हमीभाव देण्यात यावा, अशी मागणीही पंतप्रधान मोदींना पाठविलेल्या पत्रात करण्यात आली आहे.

देवळा : तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन पत्राच्या माध्यमातून पोहोचविण्यात आल्या आहेत. कांद्याला वीस रुपये प्रतिकिलो हमीभाव देण्यात यावा, अशी मागणीही पंतप्रधान मोदींना पाठविलेल्या पत्रात करण्यात आली आहे.कांदा उत्पादक संघटनेने सुरू केलेल्या या उपक्रमास कांद्याचे बाजारभाव कोसळल्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकºयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. देवळा तालुक्यातील शेकडो कांदा उत्पादक शेतकºयांची पत्रे देवळा येथील पोस्ट कार्यालयातून रवाना झाली आहेत. त्यात विठेवाडी, खर्डे, सटवाईवाडी, देवळा, मटाणे, लोहोणेर, गुंजाळनगर आदी गावांतील शेतकºयांचा सहभाग आहे. पत्र पाठविताना शारीरिक अंतर पाळण्यात आले. यावेळी कांदा उत्पादक संघटनेचे प्रांतिक संपर्कप्रमुख कुबेर जाधव, राज्य संघटक कृष्णा जाधव, कांदा उत्पादक शेतकरी नानाजी आहेर, बापू देवरे, दशरथ पूरकर, विनोद आहेर, हितेंद्र आहेर, संकेत जाधव, भाऊसाहेब मोरे, किशोर आहेर, दीपक आहेर, पंकज आहेर, जिंतेद्र आहेर, दीपक गुंजाळ, शशिकात पवार, संदीप पवार आदी उपस्थित होते.

शहरी भागातील ग्राहकांच्या मानसिकतेतून कांदा हा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकल्यामुळे शेतकºयांचे नुकसान झाले. आता कांद्याला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळण्यात आल्यानंतरही कांद्याच्या बाजारभावात फरक पडलेला नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी कांदा उत्पादक शेतकºयांना न्याय द्यावा, यासाठी पत्रप्रपंच केला आहे.- दशरथ पूरकर,कांदा उत्पादक, मांजरवाडी

चालूवर्षी सर्वच शेतमालाला कोरोनाचा फटका बसून शेती तोट्यात गेली. शेतकºयांची शेवटची आशा आता कांद्यावर आहे. कांद्याची शेतीही शाश्वत शेती होऊ शकते, हा विश्वास शेतकºयांमध्ये निर्माण करण्याची आवश्यकता असून, यासाठी केंद्र सरकारने शेतकºयांना दिलासा मिळेल, असे निर्णय घेण्याची गरज आहे.- नानाजी आहेर,कांदा उत्पादक, देवळा

टॅग्स :FarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदी