शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:55 IST

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन पत्राच्या माध्यमातून पोहोचविण्यात आल्या आहेत. कांद्याला वीस रुपये प्रतिकिलो हमीभाव देण्यात यावा, अशी मागणीही पंतप्रधान मोदींना पाठविलेल्या पत्रात करण्यात आली आहे.

देवळा : तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन पत्राच्या माध्यमातून पोहोचविण्यात आल्या आहेत. कांद्याला वीस रुपये प्रतिकिलो हमीभाव देण्यात यावा, अशी मागणीही पंतप्रधान मोदींना पाठविलेल्या पत्रात करण्यात आली आहे.कांदा उत्पादक संघटनेने सुरू केलेल्या या उपक्रमास कांद्याचे बाजारभाव कोसळल्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकºयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. देवळा तालुक्यातील शेकडो कांदा उत्पादक शेतकºयांची पत्रे देवळा येथील पोस्ट कार्यालयातून रवाना झाली आहेत. त्यात विठेवाडी, खर्डे, सटवाईवाडी, देवळा, मटाणे, लोहोणेर, गुंजाळनगर आदी गावांतील शेतकºयांचा सहभाग आहे. पत्र पाठविताना शारीरिक अंतर पाळण्यात आले. यावेळी कांदा उत्पादक संघटनेचे प्रांतिक संपर्कप्रमुख कुबेर जाधव, राज्य संघटक कृष्णा जाधव, कांदा उत्पादक शेतकरी नानाजी आहेर, बापू देवरे, दशरथ पूरकर, विनोद आहेर, हितेंद्र आहेर, संकेत जाधव, भाऊसाहेब मोरे, किशोर आहेर, दीपक आहेर, पंकज आहेर, जिंतेद्र आहेर, दीपक गुंजाळ, शशिकात पवार, संदीप पवार आदी उपस्थित होते.

शहरी भागातील ग्राहकांच्या मानसिकतेतून कांदा हा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकल्यामुळे शेतकºयांचे नुकसान झाले. आता कांद्याला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळण्यात आल्यानंतरही कांद्याच्या बाजारभावात फरक पडलेला नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी कांदा उत्पादक शेतकºयांना न्याय द्यावा, यासाठी पत्रप्रपंच केला आहे.- दशरथ पूरकर,कांदा उत्पादक, मांजरवाडी

चालूवर्षी सर्वच शेतमालाला कोरोनाचा फटका बसून शेती तोट्यात गेली. शेतकºयांची शेवटची आशा आता कांद्यावर आहे. कांद्याची शेतीही शाश्वत शेती होऊ शकते, हा विश्वास शेतकºयांमध्ये निर्माण करण्याची आवश्यकता असून, यासाठी केंद्र सरकारने शेतकºयांना दिलासा मिळेल, असे निर्णय घेण्याची गरज आहे.- नानाजी आहेर,कांदा उत्पादक, देवळा

टॅग्स :FarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदी