शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

किसान सभेचे चलो दिल्ली, २१ रोजी नाशिकमधून मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 16:07 IST

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला बळ

ठळक मुद्देमोर्चात सहभागी होण्यासाठी तसेच आठ ते दहा दिवस सर्वांना दिल्लीच्या सीमेवर रहावे लागणार

सुरगाणा : अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलची ऑनलाईन बैठक होऊन यात दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो शेतकऱ्यांचा वाहन मोर्चा थेट दिल्लीला घेऊन जाण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.दिनांक २१ डिसेंबर २०२० रोजी नाशिक येथून या भव्य शेतकरी मोर्चाला सकाळी ११ वाजता सुरुवात होईल. नाशिक, ठाणे - पालघर व अहमदनगर जिल्ह्यातून मोर्चात सहभागी होणारे शेतकरी सोमवारीसच सकाळी ११ वाजेपर्यंत नाशिक येथे पोहचतील. महाराष्ट्र मधील अन्य जिल्ह्यातून मोर्चात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांनी रविवारी ( दि. २०) रात्री मुक्कामी नाशिक येथे पोहोचणार असल्याचे सांगण्यात आले.दिल्ली मोर्चात सहभागी होण्यासाठी तसेच आठ ते दहा दिवस सर्वांना दिल्लीच्या सीमेवर रहावे लागणार असल्याने वाहने, डिझेल, भरपूर गरम कपडे, भोजन, पाणी, सॅनिटायजर, त्यासाठी लागणारे पैसे यासह संपूर्ण तयारी संबंधित जिल्ह्यांनी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या या संघर्षात संपूर्ण ताकदीने सहभागी होणार असल्याचेडॉ.अशोक ढवळे, माजी आमदार जे.पी.गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले यांनी म्हटले आहे.

टॅग्स :NashikनाशिकMorchaमोर्चा