शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सज्ञान युवकांना पालकांनीच मुक्त निर्णय घेऊ द्यावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:08 IST

बीड येथे सैराटच्या धर्तीवर आंतरजातीय विवाह केल्याने हत्या केल्याची घटना घडली. सख्ख्या भावाने भरदिवसा बहिणीच्या पतीची हत्या केल्याने पुन्हा एकदा आॅनर किलिंगचा मुद्दा पुढे आला आहे.

माझे मतनाशिक : बीड येथे सैराटच्या धर्तीवर आंतरजातीय विवाह केल्याने हत्या केल्याची घटना घडली. सख्ख्या भावाने भरदिवसा बहिणीच्या पतीची हत्या केल्याने पुन्हा एकदा आॅनर किलिंगचा मुद्दा पुढे आला आहे. खरे तर बदलत्या काळात जातीय अभिनिवेश कमी होण्याची गरज असताना ते वाढत आहेत. याविषयी युवा पिढीने तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर मुले आणि मुली कायद्याने सज्ञान असल्याने त्यांना त्यांचे भले-बुरे कळत असल्याने त्यांच्यावर जातीयवाद लादू नका, अशाप्रकारची भूमिकाही युवकांनी प्रातिनिधिक स्वरूपात व्यक्त केली. आंतरजातीय विवाह ही खरे तर बदलत्या काळात समस्याच होऊ शकत नाही, परंतु तरीही आॅनर किलिंगच्या नावाखाली हत्याकांड होत असतात. सैराट या अलीकडच्या काळात गाजलेल्या चित्रपटामुळे खरे तर सामाजिक विषयावर प्रकाश पडल्याने अशाप्रकारच्या घटना थांबण्याऐवजी वाढत आहेत, हे दुर्दैवी असल्याचे मतही युवकांनी व्यक्त केले.बदलत्या परिस्थितीनुसार युवा पिढी  समजदार आणि परिपक्व झाली आहे. विवाहासह सर्वच विषयांबाबत निर्णय घेण्याससक्षम असतात. परंतु पालकांची संमती घेतल्यास अनेक समस्या टळू शकतात.  - कुणाल वाघ, के. के. वाघ कॉलेजशिक्षित झाल्यामुळे सर्व मुलांना चांगला आणि वाईट यातील भेद चांगला कळतो. अठरा वर्षांची मुलगी आणि एकवीस वर्षांचा मुलगा असेल तर ते कायद्याने सज्ञान असतात. त्यामुळे आयुष्याचा जोडीदार कोण हवा हे ठरविण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.- धनश्री बत्तासे, न. ब. ठाकूर विधी महाविद्यालयदेशभरात आंतरजातीय विवाहाचे प्रमाण वाढत आहे, परंतु दुसरीकडे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र बदललेला नाही. आपल्याच धर्मात अथवा जातीत विवाह केल्यास कोणत्याही प्रकारे वाद होत नाहीत किंवा मुला-मुलींचे वैवाहिक जीवन चांगलेच होते असे नाही. मात्र तरीही त्यासाठी आग्रह धरला जातो. आता पालकांचीदेखील मानसिकता बदलण्याची गरज आहे.  - पूजा दराडे, बिटको कॉलेजमुलगा आणि मुलगी दोघे कायद्याने सज्ञान असतील आणि दोघेही समजूतदार असतील तर घरातील मोठ्या मंडळींनी त्यांना त्यांचा निर्णय घेऊ देणे उचित आहे. परंतु दुर्दैवाने आंतरजातीय विवाहाबाबत पालक ‘लोक काय म्हणतील’ याचा जास्त विचार करतात आणि त्यामुळेच अनेक समस्या निर्माण होतात. पालकांनी लोक काय म्हणतील यापेक्षा मुलांना काय वाटते याकडे लक्ष दिले पाहिजे.- कल्याणी पोळ, बीवायके कॉलेज