शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

सज्ञान युवकांना पालकांनीच मुक्त निर्णय घेऊ द्यावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:08 IST

बीड येथे सैराटच्या धर्तीवर आंतरजातीय विवाह केल्याने हत्या केल्याची घटना घडली. सख्ख्या भावाने भरदिवसा बहिणीच्या पतीची हत्या केल्याने पुन्हा एकदा आॅनर किलिंगचा मुद्दा पुढे आला आहे.

माझे मतनाशिक : बीड येथे सैराटच्या धर्तीवर आंतरजातीय विवाह केल्याने हत्या केल्याची घटना घडली. सख्ख्या भावाने भरदिवसा बहिणीच्या पतीची हत्या केल्याने पुन्हा एकदा आॅनर किलिंगचा मुद्दा पुढे आला आहे. खरे तर बदलत्या काळात जातीय अभिनिवेश कमी होण्याची गरज असताना ते वाढत आहेत. याविषयी युवा पिढीने तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर मुले आणि मुली कायद्याने सज्ञान असल्याने त्यांना त्यांचे भले-बुरे कळत असल्याने त्यांच्यावर जातीयवाद लादू नका, अशाप्रकारची भूमिकाही युवकांनी प्रातिनिधिक स्वरूपात व्यक्त केली. आंतरजातीय विवाह ही खरे तर बदलत्या काळात समस्याच होऊ शकत नाही, परंतु तरीही आॅनर किलिंगच्या नावाखाली हत्याकांड होत असतात. सैराट या अलीकडच्या काळात गाजलेल्या चित्रपटामुळे खरे तर सामाजिक विषयावर प्रकाश पडल्याने अशाप्रकारच्या घटना थांबण्याऐवजी वाढत आहेत, हे दुर्दैवी असल्याचे मतही युवकांनी व्यक्त केले.बदलत्या परिस्थितीनुसार युवा पिढी  समजदार आणि परिपक्व झाली आहे. विवाहासह सर्वच विषयांबाबत निर्णय घेण्याससक्षम असतात. परंतु पालकांची संमती घेतल्यास अनेक समस्या टळू शकतात.  - कुणाल वाघ, के. के. वाघ कॉलेजशिक्षित झाल्यामुळे सर्व मुलांना चांगला आणि वाईट यातील भेद चांगला कळतो. अठरा वर्षांची मुलगी आणि एकवीस वर्षांचा मुलगा असेल तर ते कायद्याने सज्ञान असतात. त्यामुळे आयुष्याचा जोडीदार कोण हवा हे ठरविण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.- धनश्री बत्तासे, न. ब. ठाकूर विधी महाविद्यालयदेशभरात आंतरजातीय विवाहाचे प्रमाण वाढत आहे, परंतु दुसरीकडे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र बदललेला नाही. आपल्याच धर्मात अथवा जातीत विवाह केल्यास कोणत्याही प्रकारे वाद होत नाहीत किंवा मुला-मुलींचे वैवाहिक जीवन चांगलेच होते असे नाही. मात्र तरीही त्यासाठी आग्रह धरला जातो. आता पालकांचीदेखील मानसिकता बदलण्याची गरज आहे.  - पूजा दराडे, बिटको कॉलेजमुलगा आणि मुलगी दोघे कायद्याने सज्ञान असतील आणि दोघेही समजूतदार असतील तर घरातील मोठ्या मंडळींनी त्यांना त्यांचा निर्णय घेऊ देणे उचित आहे. परंतु दुर्दैवाने आंतरजातीय विवाहाबाबत पालक ‘लोक काय म्हणतील’ याचा जास्त विचार करतात आणि त्यामुळेच अनेक समस्या निर्माण होतात. पालकांनी लोक काय म्हणतील यापेक्षा मुलांना काय वाटते याकडे लक्ष दिले पाहिजे.- कल्याणी पोळ, बीवायके कॉलेज