शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

सैनिकांच्या त्यागाची प्रत्येकाने आठवण ठेवावी : प्रभूदेसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:59 IST

कारगिलची शौर्यगाथा पाहताना सैनिकांच्या साहसाचे दर्शन घडते. आपल्या प्राणाची पर्वा न करता भारतीय सैनिक हिमालयाच्या टोकावर जवळपास १८ हजार फुटांवरील सीमेवर रात्रं-दिवस उणे ४० ते ५० अंश सेल्सिअस तपमानात डोळ्यात तेल घालून मृत्यूशी झुंज देत असतात.

नाशिक : कारगिलची शौर्यगाथा पाहताना सैनिकांच्या साहसाचे दर्शन घडते. आपल्या प्राणाची पर्वा न करता भारतीय सैनिक हिमालयाच्या टोकावर जवळपास १८ हजार फुटांवरील सीमेवर रात्रं-दिवस उणे ४० ते ५० अंश सेल्सिअस तपमानात डोळ्यात तेल घालून मृत्यूशी झुंज देत असतात. अशा परिस्थितीत देशवासीयांच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या धैर्य व त्यागाची समाजाने आठवण ठेवून प्रत्येक सैनिकाबद्दल भारतीयाला आदर आणि अभिमान असायला हवा, असे मत अनुराधा प्रभूदेसाई यांनी येथे व्यक्त केले.  गोदाघाटावरील नाशिक वसंत व्याख्यानमालेचे सातवे पुष्प प्रभूदेसाई यांनी सोमवारी (दि. ७) गुंफले. माजी खासदार दिवंगत अ‍ॅड. उत्तमराव ढिकले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘ऋणानुबंध सैनिकांशी-कारगिलची शौर्यगाथा’ या विषयावर बोलताना अनुराधा प्रभूदेसाई यांनी लेह, लडाख, द्रास, कारगिल प्रांतात प्राणपणाने झुंज देणाºया सैनिकांचे जीवनमान नाशिककरांसमोर मांडले. ज्या सैनिकांचे अदम्य साहस आणि शौर्याच्या जोरावर आपण देशात सुरक्षित आहोत त्या सैनिकांच्या त्यागाची समाज आठवण ठेवत नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, बॉलिवूडच्या तारेतारकांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेची माहिती प्रत्येकाला असते. परंतु देशातील परमवीरचक्र सन्मानित सैनिकांची नावे आपल्याला माहिती नाहीत, ही शोकांतिका आहे. कारगिल युद्धातील पहिले शहीद कॅप्टन सौरभ कालिया यांचे बलिदान आणि नंतरच्या यातना आपल्याला ठाऊक नाही. कॅप्टन विक्र म बात्रांचे कार्य माहिती नाही. काश्मीर किंवा अरुणाचलसारखा प्रदेश आपल्या नकाशावरून पुसला जातो आणि आपला नकाशा लहान होतो, यांसारखी लांच्छनास्पद गोष्ट नाही. देशाच्या सीमेचे रक्षण, पलटन की इज्जत या गोष्टींसाठी आपला सैनिक बर्फवृष्टी, हिमप्रपात, गोळीबार यांची पर्वा न करता तिथे उभा असतो, त्याची आठवण ठेवून सर्वांनी भारतीय सैन्याच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :Nashikनाशिक