शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दोन लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 01:06 IST

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मीडियाचा चुकीचा वापर केल्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिन, फेसबुक अकाउंट होल्डरवर गुन्हे दाखल होण्याबरोबरच कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत़

नाशिक : फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मीडियाचा चुकीचा वापर केल्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिन, फेसबुक अकाउंट होल्डरवर गुन्हे दाखल होण्याबरोबरच कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत़  शाळा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या सोशल मीडियाचे फायदे - तोटे तसेच धोके यांची जाणीव व्हावी यासाठी शहर पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी सायबर सुरक्षिततेचे धडे देण्याचा उपक्रम वर्षभरापूर्वी सुरू केला होता़ या उपक्रमाचा गत वर्षभरात सुमारे दोन लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून, त्यांना सायबर सुरक्षिततेचे धडे देण्यात आले आहेत़प्लॅस्टिक मनी ही तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाचीच गरज बनली आहे़ मात्र याच तंत्रज्ञानाचाच दुरुपयोग तसेच हाताळणीतील चुकांमुळे तंत्रज्ञान अवगत असलेल्या भामट्यांकडून आॅनलाइन पद्धतीने बँकेतील पैसे काढून घेणे, एटीएम क्लोनिंग, पासवर्ड हॅकिंग याद्वारे पैशांची अफरातफर केली जाते आहे़ याबरोबरच नोकरीचे आमिष दाखवून तसेच मेट्रीमॅन्यूअल साईटवरूनही फसवणूक केली जात असून चोरीचे नवनवीन फंडे अमलात आणले जात आहेत़ त्यामुळे सायबर सुरक्षिततेचे धडे ही काळाची गरज बनली आहे़मोबाइल व सोशल मीडियाच्या वापरात शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे़ पोलीस आयुक्त सिंगल यांनी पोलीस आयुक्तालयमार्फत विद्यार्थ्यांना सोशल मीडियाची हाताळणी कशी करावी, सोशल मीडियातील धोके, आॅनलाइन पद्धतीची फसवणूक, नोकरीच्या आमिषाने केली जाणारी फसवणूक, विवाहाच्या संकेतस्थळावरून तरुण-तरुणी वा विधवा महिलांची होणारी फसवणूक याबाबत माहिती व्हावी, यासाठी वर्षभरापासून सायबर सुरक्षिततेचे धडे देण्यास सुरुवात केली़ गत वर्षभरात शहरातील २०० ते २५० शाळा व महाविद्यालयांमधील दोन लाख विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षिततेचे धडे देण्यात आले आहेत़सायबर अ‍ॅम्बॅसिडर संकल्पनापोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी सायबर सुरक्षिततेसाठी एक स्वतंत्र पथक निर्माण केले असून त्यांच्यामार्फत शहरातील विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षिततेचे धडे दिले जातात़ या पथकाने सायबर विषयातील तज्ज्ञ तसेच संगणक शाखेतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन सायबर अ‍ॅम्बॅसिडर म्हणून नेमले आहे़ हे सायबर अ‍ॅम्बॅसिडर पोलीस पथकासमवेत शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह सायबर सुरक्षिततेचे धडे देतात़विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालक मोबाइल देतात मात्र, या मोबाइलचा वापर आपला पाल्य नेमका कशासाठी करतो याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करतात़ विद्यार्थ्यांच्या हातात आलेल्या या तंत्रज्ञानातील विविध सोशल मीडियाचा वापरातील धोक्यांबाबत त्यांना जाणीव व्हावी यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे़ या उपक्रमासाठी शंभर ते दीडशे सायबर अ‍ॅम्बॅसिडर तयार करण्यात आले असून पोलीस व अ‍ॅम्बेसिडर यांच्याकडून सायबर सुरक्षिततेचे धडे देण्याचा उपक्रम सुरू आहे़- डॉ़ रवींद्र सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिक

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमNashikनाशिकStudentविद्यार्थी