शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाडीतून होणाऱ्या वाळू उपशाकडे तहसीलची पाठ

By admin | Updated: January 11, 2016 21:58 IST

बैलगाडीतून होणाऱ्या वाळू उपशाकडे तहसीलची पाठ

मालेगाव : बैलगाडीद्वारे केल्या जाणाऱ्या नदीपात्रातील वाळू उपशाकडे येथील तहसील कार्यालयाने डोळेझाक केल्याने लाखो रुपये किमतीच्या वाळूची राजरोस चोरी केली जात आहे. यामुळे नदीपात्र कोरडेठाक झाले आहे. येथील गिरणा व मोसम नदीपात्रात सर्रास वाळू उपसा केला जात आहे. यासाठी टॅक्टर, ट्रक आदि साधनांचा वापर करण्यात येतो. मात्र या वाहनांवर कारवाई केली जात असल्याने बैलगाडीने वाळू चोरीची पद्धत गेल्या चार ते पाच वर्षांपासून सुरू करण्यात आली आहे. बैल सांभाळावे लागत असल्याच्या नावाखाली या चोरीकडे तहसील विभागाने काणाडोळा केल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे बैलगाडीवाल्यांची संख्या वाढली आहे. एका बैलगाडीत सुमारे अर्धा ब्रासच्या आसपास वाळू बसत असून, एका बैलगाडीची किंमत पाचशे ते सहाशे रुपयांच्या घरात आहे. एक बैलगाडी दिवसाला चार ते पाच फेऱ्या मारतात. यामुळे बंधारा परिसरातील वाळू पूर्णपणे नष्ट झाली आहे. नदीपात्रात सर्वत्र खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. असाच काहीसा प्रकार मोसम नदीपात्रातील आहे. या पात्रात वडगाव परिसरात बैलगाडीने उपसा केला जात असल्याने मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे हरणबारीचे पाणी पुढे जाण्यास मोठ्या अडचणी आल्या होत्या. या बैलगाड्यांच्या गाड्या जप्त करून हा वाळू उपसा थांबवावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)