शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

भुजबळांच्या सुटकेने विधान परिषदेचे गणित बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 05:26 IST

जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवणारे राष्ट्रवादी चे नेते छगन भुजबळ यांच्या सुटकेने विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे गणित बदलणार आहे. राष्ट्रवादीटचे उमेदवार शिवाजी सहाणे यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला तर शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे, विकास आघाडीचे परवेज कोकणी यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.

नाशिक - जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवणारे राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या सुटकेने विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे गणित बदलणार आहे. राष्टÑवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला तर शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे, विकास आघाडीचे परवेज कोकणी यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.दोन वर्षापूर्वी छगन भुजबळ हे महाराष्टÑ सदन घोटाळा प्रकरणी तुरूंगात गेल्यानंतर नाशिकच्या राजकारणावरील त्यांची पकड सैल झाली होती परंतु तरिही पक्षपातळीवरील कोणतेही मोठे निर्णय घेताना भुजबळ यांचे मत विचारात घेतले जात होते. मात्र प्रत्येक वेळी जामीन नामंजूर झाल्यामुळे भुजबळ यांचा तुरूंगातील मुक्काम वाढत गेल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये व विशेषत: राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये मरगळ आली होती. भुजबळ तुरूंगात असतानाच्या काळातच नाशिक महापालिकेची व जिल्हा परिषद अशा दोन मोठ्या निवडणुका त्यांच्या गैरहजेरीत झाल्या. पक्षाला त्यांची उणीव भासली. दोन्ही निवडणुकीत राष्टÑवादीची कामगिरी जेमतेम राहिली.राज्यात विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारांच्या अर्जांची छाननी सुरू असतानाच शुक्रवारी छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने जमीन मंजूर केल्याने गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात राष्टÑवादीने शिवाजी सहाणे यांना उमेदवारी दिली असून, शिवसेनेकडून नरेंंद्र दराडे रिंगणात आहेत. दराडे हे येवल्यातील असून, एकेकाळी त्यांनी येवला मतदार संघाची जागा आघाडीने राष्टÑवादी काँग्रेसला सोडल्याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीसमोर उपोषण केले होते. परंतु तरिही भुजबळ यांनाच येवल्यातून उमेदवारी मिळाली. काही काळानंतर दराडे यांनी भुजबळ यांच्याशी जुळवूनही घेतले होते. गेल्या दोन वर्षांपासून दराडे यांनी येवल्यातून विधानसभेची निवडणूक लढविण्याची तयारीही सुरू केली होती. राज्यातील सत्तांतरानंतर दराडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निमित्ताने दराडे यांचे येवल्यातील वर्चस्व वाढणे भुजबळ यांना राजकीय दृष्ट्या धोकेदायक ठरू शकत असल्याने कोणत्याही परिस्थितीत दराडे यांना रोखण्यासाठी भुजबळ यांच्याकडून प्रयत्न केला जाणे साहजिकच आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीची समिकरणे भुजबळ यांच्यामुळे बदलण्याची शक्यता आहे.भुजबळ बाहेर आले, आता कसे?मुंबई : माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्यामुळे तुरुंगातील कोठडी तर रिकामी झाली, आता कसे? असा टोला राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्याने भाजपाला लगावला आहे.तुरुंगात भुजबळांच्या शेजारच्या कोठड्या खाली आहेत. त्याही लवकरच भरल्या जातील, असे सूचक वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपाच्या स्थापना दिनी आयोजित कार्यक्रमात बोलताना केले होते. त्यांचा इशारा अजित पवार, सुनील तटकरे यांच्याकडे होता.बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असलेले छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. महाराष्टÑ सदन आणि सिंचन घोटाळ्यावरून राष्टÑवादीच्या नेत्यांवर भाजपाकडून सातत्याने आरोप होत आहेत. भुजबळ यांच्या पाठोपाठ आता अजित पवार, तटकरे हे देखील तुरुंगात जातील, अशा वल्गना केल्या जात आहेत. त्यावर राष्टÑवादीचा एक नेता म्हणाला, न्यायालयानेच भुजबळांना तरुंगाबाहेर काढले आहे. त्यामुळे भाजपाचे नेते आता कोणत्या तोंडाने आमच्यावर आरोप करणार. या सरकारकडे सांगण्यासारखे काही नसल्यामुळे विरोधकांना सतत धमकावणे हाच एकमेव उद्योग भाजपाच्या नेतेमंडळीकडून होत आहे. पण आम्ही अशा धमक्यांना भीत घालत नाही.च्भुजबळांना जामीन मिळू नये यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात होते. आरोप सिद्ध होण्यापूर्वीच त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. ही छळवणूक आहे, असा आरोप पक्षाचे उपाध्यक्ष नवाब मलिक यांनी केला आहे.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळNashikनाशिक