शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

विधान परिषद निवडणूक : राजकीय समीकरणांवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 01:18 IST

नाशिक : तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष व त्यांचे इच्छुक संख्याबळावर आधारित तयारीला लागलेले असताना या निवडणुकीसाठी वर्षभरापूर्वी अस्तित्वात आलेल्या नगरपंचायतीचे सदस्य तसेच थेट नगराध्यक्ष यांच्या मतदानाच्या हक्काविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देनगरपंचायत सदस्यांच्या मतदानाविषयी प्रश्नचिन्हनिवडणूक शाखेने यासंदर्भात आयोगाकडे मार्गदर्शन मागविले

नाशिक : तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष व त्यांचे इच्छुक संख्याबळावर आधारित तयारीला लागलेले असताना या निवडणुकीसाठी वर्षभरापूर्वी अस्तित्वात आलेल्या नगरपंचायतीचे सदस्य तसेच थेट नगराध्यक्ष यांच्या मतदानाच्या हक्काविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासंदर्भातील कायद्यात फक्त महापालिका, नगरपरिषद, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचाच मतदार म्हणून उल्लेख करण्यात आल्याने यंदा पहिल्यांदाच नगरपंचायतींचा प्रश्न निर्माण झाल्याने निवडणूक शाखेने यासंदर्भात आयोगाकडे मार्गदर्शन मागविले आहे.येत्या मे महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची मुदत संपुष्टात येत असून, तत्पूर्वी राज्य विधानपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. ते लक्षात घेता काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील सदस्यांची माहिती मागविली असता त्यावेळी हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. या मतदारसंघावर गेल्या बारा वर्षांपासून राष्टÑवादीने आपले वर्चस्व कायम ठेवले होते, परंतु आता केंद्रात व राज्यात सत्तांतर झाल्याने राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली आहेत. दरम्यानच्या काळात गेल्या वर्षी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक आघाडी घेतली व त्यापाठोपाठ शिवसेनेचे सदस्य आहेत. राष्ट्रवादी तिसºया क्रमांकावर व कॉँग्रेस चौथ्या क्रमांकावर असल्याने होऊ घातलेली निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे अपक्ष सदस्यांची संख्याही लक्षणीय असल्याने या निवडणुकीतील प्रत्येक मत लाख मोलाचे ठरणार असले तरी, राजकीय पक्षांकडून या निवडणुकीचे गणित नगरपंचायतीमध्ये मिळालेल्या यशावर आखण्यात आले होते. त्यामुळे संख्याबळ पाहून उमेदवारीसाठी पक्षांतर्गत चुरस निर्माण झाली होती. परंतु विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यापूर्वी फक्त महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती या चार गटातून निवडून आलेल्या सदस्यांनाच मतदानाचा हक्क बहाल करण्यात आला होता. शासनाने मोठी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींचे गेल्या वर्षी नगरपंचायतीत रूपांतर करून तेथे जनतेतून थेट नगराध्यक्ष व सदस्यांच्या निवडीसाठी निवडणूक घेतली होती. त्यामुळे या सदस्यांना मतदानाचा हक्क आहे किंवा नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यातच जिल्हा निवडणूक शाखेला पत्र पाठवून सदस्यांची माहिती मागविल्यावर त्यांच्याकडून उलट टपाली मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. मे महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची मुदत संपुष्टात येत असून, तत्पूर्वी विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. ते लक्षात घेता काही दिवसांपूर्वी आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील सदस्यांची माहिती मागविली असता त्यावेळी हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झाला आहे.