शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

ज्येष्ठ नागरिकांकडून संस्कृतीचा वारसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:32 IST

गावाचे गावपण तेथील संस्कार व संस्कृतीमुळे टिकून राहते. अशाच प्रकारे नाशिकचे गावपण टिकविण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडून गावाला संस्कार व संस्कृतीचा वारसा मिळत असून, या अमूल्य ठेव्यामुळेच नाशिकसारखे गाव आज समृद्धीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन आमदार देवयानी फरांदे यांनी केले.

नाशिक : गावाचे गावपण तेथील संस्कार व संस्कृतीमुळे टिकून राहते. अशाच प्रकारे नाशिकचे गावपण टिकविण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडून गावाला संस्कार व संस्कृतीचा वारसा मिळत असून, या अमूल्य ठेव्यामुळेच नाशिकसारखे गाव आज समृद्धीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन आमदार देवयानी फरांदे यांनी केले.  लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचतर्फे पेठे हायस्कूलच्या प्रांगणात रविवारी (दि. २२) लग्नास ५० वर्षे पूर्ण झालेल्या ५० दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर मधुकर झेंडे, डॉ. अनुज तिवारी, मंचचे अध्यक्ष सुरेश विसपुते, डी. एम. कुलकर्णी, रमेश डहाळे, मनीषा पगार, संजय घरटे, जितेंद्र येवले आदी उपस्थित होते. देवयानी फरांदे म्हणाल्या, ज्येष्ठ नागरिकांनी नाशिकला संस्कार व संस्कृ तीचा अमूल्य ठेवा दिला आहे. त्यामुळेच नाशिकच्या सांकृतिक वैभवात भर पडली आहे.  यावेळी ज्येष्ठ नागरिकांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात वसंतराव कोठावदे यांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले. अन्य ज्येष्ठ नागरिकांना उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जागेवर जाऊन सन्मानित केले. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपस्थिताना उतारवयात आरोग्य निरामय राहण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. सीमा पेठकर यांनी सूत्रसंचालन केले. विठ्ठल देवरे यांनी आभार मानले. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.ज्येष्ठ नागरिकांचा गौरवलोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचतर्फे पुंडलिकराव घरटे यांच्या स्मरणार्थ सिडकोतील शिवाजी चौक येथील नवे नाशिक ज्येष्ठ नागरिक संघ, गंगापूररोडच्या प्रमोदनगर येथील श्री समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ व नाशिकरोडच्या गांधीनगर येथील जीवनसंध्या ज्येष्ठ नागरिक संघ या तीन ज्येष्ठ नागरी संघांचा ‘कार्यक्षम ज्येष्ठ नागरिक संघ’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिक