शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

द्राक्षबागांना ‘डावण्या’ रोगाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 14:58 IST

वणी : वातावरणातील बदल आणि हवामानातील विषमता अशा निसर्गाच्या प्रतिकुलतेमुळे दिंडोरी तालुक्यातील काही भागांमधील द्राक्षबागांवर ‘डावण्या’ रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून उत्पादनात घट येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

वणी : वातावरणातील बदल आणि हवामानातील विषमता अशा निसर्गाच्या प्रतिकुलतेमुळे दिंडोरी तालुक्यातील काही भागांमधील द्राक्षबागांवर ‘डावण्या’ रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून उत्पादनात घट येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दिंडोरी तालुक्यातील काही भागांमधे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दमट हवामान आर्द्रतेचे वाढलेले प्रमाण याचा प्रतिकुल परिणाम झाला असुन द्राक्षबागांची पाने व घडांच्या हाणीमुळे ऊत्पादन क्षमतेवर याचा परिणाम होतो आहे. या रोगाच्या नियंत्रणासाठी महागङ्या औषधांची फवारणी करणे एवाढेच उत्पादकांच्या हातात आहे. दिंडोरी तालूक्यात हजारो एकर द्राक्ष बागांचे शेतीक्षेत्र असुन द्राक्षबागांची प्रतिवर्षी लागवड असे समीकरण आहे. उत्पादन व खर्च याचा ताळमेळ बसविताना नेहमी कोणत्या न कोणत्या रु पाने संकट येते. त्यातुन मार्ग काढताना तारेवरची कसरत करणारे उत्पादक निसर्गाच्या लहरीपणापुढे हतबल होतात, असेच चित्र सध्या तरी दिसते आहे. द्राक्षबागांबरोबर टमाटा या नगदी पिकांवरही विषम वातावारणामुळे करपा रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. द्राक्षाच्या बरोबरीने अडीअडचणीत हात देणारे पिक अशी या पिकाची ओळख आहे. सध्याच्या वातावरणात स्वच्छ आकाश मोकळा सुर्यप्रकाश थंडी अशा नैसर्गिक वातावरणाची अपेक्षा केली जात असताना अवकाळी पावसाच्या फटक्यामुळे नगदी पिकांचे अिस्तत्व धोक्यात आल्याने निराश व हताश झालेला शेतकरी अनुकूल वातावरणाच्या निर्मितीची प्रतिक्षा करीत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक