शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

वक्तृत्व स्पर्धेमुेळे नेतृत्वगुण विकसित : संतोष मंडलेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 01:10 IST

सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी कळत असल्यातरी, पुस्तक वाचन हे फार महत्त्वाचे आहे. वाचनाने चांगले विचार मांडता येतात त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धेमुळे नेतृत्व गुण विकसित होऊन त्यातून एक चांगला राजकीय नेता निर्माण होऊ शकतो,

नाशिक : सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी कळत असल्यातरी, पुस्तक वाचन हे फार महत्त्वाचे आहे. वाचनाने चांगले विचार मांडता येतात त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धेमुळे नेतृत्व गुण विकसित होऊन त्यातून एक चांगला राजकीय नेता निर्माण होऊ शकतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्सचे राज्य अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी केले.  निर्मिक फाउण्डेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. लिमये सभागृह येथे निर्मिक फाउण्डेशनच्या वतीने महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेली ही चौथी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातून स्पर्धक यात सहभागी झाले होते. यावेळी राजाभाऊ काठे, उद्योजक चंद्रकांत बागुल, राकाशेठ माळी, नगरसेविका सुप्रिया खोडे, अनिल जाधव, सुनील खोडे, विजय राऊत आदी उपस्थित होते.  परीक्षक म्हणून डोंबिवली येथील पुरुषोत्तम वाघ, नाशिकचे जयंत बेहळे, दत्तात्रय वेलजाळी यांनी कामकाज पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउण्डेशनचे अध्यक्ष जयवंत बागुल यांनी केले. सूत्रसंचालन सचिव नितीन पाटील यांनी केले, तर आभार बाबासाहेब खरोटे यांनी मानले. यावेळी संदीप बच्छाव, प्रसाद पवार, हरिभाऊ महाजन, अंबादास शेळके, सचिन बागुल, दादाजी बागुल, जयराम सोनवणे आदी उपस्थित होते.विजेते स्पर्धक‘शिवजयंतीचे जनक : म. जोतिराव फुले, छत्रपती शिवराय-म. फुले-डॉ. आंबेडकर : एक आदर्श गुरु-शिष्य परंपरा, म. फुले व त्यांचा सार्वजनिक सत्यधर्म, डॉ. आंबेडकरांची आरक्षण विषयक भूमिका’ या विषयांवर ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रथम क्रमांक नाशिक येथील अमोल गुट्टे याने पटकाविला. द्वितीय क्रमांक जुन्नर येथील शुभम गाढवे याने, तर तृतीय क्रमांक निफाड येथील तेजस्विनी शिंदे यांनी मिळविला. उत्तेजनार्थ बक्षिसाचे मुरबाड येथील महेश घावट व धुळे येथील प्रा. सतीश अहिरे हे मानकरी ठरले.

टॅग्स :Nashikनाशिक