शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

माणूस ओळखायला शिकावे : तुळशीराम गुट्टे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:13 IST

स्वत:भोवती जास्त माणसे जमवण्यापेक्षा माणसातला माणूस ओळखायला शिकणे म्हणजे मोठेपणाचे लक्षण असल्याचे सांगून दिघोळे यांनी विकासाबरोबर माणुसकीही जपल्याचे प्रतिपादन सिद्धी मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष तुळशीराम गुट्टे महाराज यांनी केले. सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथील परिसर ग्रामविकास समितीच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या जीवनगौरव समारंभात माजी मंत्री तुकाराम दिघोळे बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिघोळे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नायगाव : स्वत:भोवती जास्त माणसे जमवण्यापेक्षा माणसातला माणूस ओळखायला शिकणे म्हणजे मोठेपणाचे लक्षण असल्याचे सांगून दिघोळे यांनी विकासाबरोबर माणुसकीही जपल्याचे प्रतिपादन सिद्धी मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष तुळशीराम गुट्टे महाराज यांनी केले.सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथील परिसर ग्रामविकास समितीच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या जीवनगौरव समारंभात माजी मंत्री तुकाराम दिघोळे बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिघोळे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, सहचिटणीस हेमंत धात्रक, प्रकाश घुगे, संचालक हेमंत नाईक, गोदा युनियनचे अध्यक्ष लक्ष्मण सांगळे, चिंचोलीचे माजी सरपंच संजय सानप, विलास सांगळे, निवृत्त पोलीस अधिकारी भीमराव दराडे, पांडुरंग बोडके व्यासपीठावर उपस्थित होते.  सुमारे सातशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेले जलसंधारण, पाणी अडावा, पाणी जिरवा व नगर विक साचे नियोजनच निसर्गाचा समतोल राखण्यास यशस्वी मूलमंत्र असल्याचे सांगून ग्रामविकास समितीने हाती घेतलेले ग्रामविकासाचे कार्य कौतुकास्पद असल्याचेही डॉ. गुट्टे महाराज यांनी सांगितले.  सिन्नरच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावताना माणसे जोडण्याची किमया साधून सार्वजनिक हिताच्या केलेल्या कामाचे आज संपूर्ण तालुका फळे चाखत असून, झाडे लावणाऱ्या दिघोळे यांना विसरून चालणार नसल्याचे सांगत असताना दिघोळेंचा संपूर्ण जीवनपट सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब केदार यांनी आपल्या भाषणातून मांडला. यावेळी कोंडाजीमामा आव्हाड, लक्ष्मणराव सांगळे, हेमंत धात्रक आदींची भाषणे झाली.  यावेळी ग्रामविकास समितीचे अशोक बोडके, जयराम गिते, अंकुश गिते, सोमनाथ बोडके, संदीप नागरे, रामचंद्र कापसे, नामदेव कापसे, सीताराम बोडके आदींसह  ग्रामस्थ उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गिते यांनी प्रास्ताविक तर रामदास ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले.उगवत्या सूर्याला....ज्या सूर्याच्या सावलीचाही आपल्या हितासाठी उपयोग करून घेण्यासाठी नमस्कार करणारे, तोच सूर्य मात्र मावळतीला जात असताना त्याला विसरणारी संस्कृती आज बघायला मिळत आहे. आज झालेल्या माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या जीवनगौरव समारंभास निमंत्रण देऊनही तालुक्यातील एकही राजकीय पदाधिकारी उपस्थित न राहिल्याने हा विषय नायगाव खोºयात चर्चेचा बनला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक