शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

माणूस ओळखायला शिकावे : तुळशीराम गुट्टे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:13 IST

स्वत:भोवती जास्त माणसे जमवण्यापेक्षा माणसातला माणूस ओळखायला शिकणे म्हणजे मोठेपणाचे लक्षण असल्याचे सांगून दिघोळे यांनी विकासाबरोबर माणुसकीही जपल्याचे प्रतिपादन सिद्धी मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष तुळशीराम गुट्टे महाराज यांनी केले. सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथील परिसर ग्रामविकास समितीच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या जीवनगौरव समारंभात माजी मंत्री तुकाराम दिघोळे बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिघोळे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नायगाव : स्वत:भोवती जास्त माणसे जमवण्यापेक्षा माणसातला माणूस ओळखायला शिकणे म्हणजे मोठेपणाचे लक्षण असल्याचे सांगून दिघोळे यांनी विकासाबरोबर माणुसकीही जपल्याचे प्रतिपादन सिद्धी मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष तुळशीराम गुट्टे महाराज यांनी केले.सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथील परिसर ग्रामविकास समितीच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या जीवनगौरव समारंभात माजी मंत्री तुकाराम दिघोळे बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिघोळे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, सहचिटणीस हेमंत धात्रक, प्रकाश घुगे, संचालक हेमंत नाईक, गोदा युनियनचे अध्यक्ष लक्ष्मण सांगळे, चिंचोलीचे माजी सरपंच संजय सानप, विलास सांगळे, निवृत्त पोलीस अधिकारी भीमराव दराडे, पांडुरंग बोडके व्यासपीठावर उपस्थित होते.  सुमारे सातशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेले जलसंधारण, पाणी अडावा, पाणी जिरवा व नगर विक साचे नियोजनच निसर्गाचा समतोल राखण्यास यशस्वी मूलमंत्र असल्याचे सांगून ग्रामविकास समितीने हाती घेतलेले ग्रामविकासाचे कार्य कौतुकास्पद असल्याचेही डॉ. गुट्टे महाराज यांनी सांगितले.  सिन्नरच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावताना माणसे जोडण्याची किमया साधून सार्वजनिक हिताच्या केलेल्या कामाचे आज संपूर्ण तालुका फळे चाखत असून, झाडे लावणाऱ्या दिघोळे यांना विसरून चालणार नसल्याचे सांगत असताना दिघोळेंचा संपूर्ण जीवनपट सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब केदार यांनी आपल्या भाषणातून मांडला. यावेळी कोंडाजीमामा आव्हाड, लक्ष्मणराव सांगळे, हेमंत धात्रक आदींची भाषणे झाली.  यावेळी ग्रामविकास समितीचे अशोक बोडके, जयराम गिते, अंकुश गिते, सोमनाथ बोडके, संदीप नागरे, रामचंद्र कापसे, नामदेव कापसे, सीताराम बोडके आदींसह  ग्रामस्थ उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गिते यांनी प्रास्ताविक तर रामदास ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले.उगवत्या सूर्याला....ज्या सूर्याच्या सावलीचाही आपल्या हितासाठी उपयोग करून घेण्यासाठी नमस्कार करणारे, तोच सूर्य मात्र मावळतीला जात असताना त्याला विसरणारी संस्कृती आज बघायला मिळत आहे. आज झालेल्या माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या जीवनगौरव समारंभास निमंत्रण देऊनही तालुक्यातील एकही राजकीय पदाधिकारी उपस्थित न राहिल्याने हा विषय नायगाव खोºयात चर्चेचा बनला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक