शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

ओझरखेड धरणाच्या पाइपलाइनला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 22:05 IST

चांदवड : तालुक्यातील सुमारे ७२ गावांना पिण्याचा पाणीपुरवठा करणाºया ओझरखेड धरणाच्या पाइपलाइनला ठिकठिकाणी गळती लागली असून, यामुळे चांदवड शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने ओझरखेडपर्यंत असलेल्या जुन्या पाइपलाइनची पाहणी केली असता सदर बाब उघड झाली आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाई : चांदवड शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत; पाहणी करून शिष्टमंडळाने केल्या सूचना

चांदवड : तालुक्यातील सुमारे ७२ गावांना पिण्याचा पाणीपुरवठा करणाºया ओझरखेड धरणाच्या पाइपलाइनला ठिकठिकाणी गळती लागली असून, यामुळे चांदवड शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने ओझरखेडपर्यंत असलेल्या जुन्या पाइपलाइनची पाहणी केली असता सदर बाब उघड झाली आहे.ओझरखेड धरणावरून गेल्या पंधरा दिवसांपासून पाणी अनियमित येत असल्याने चांदवड तालुक्यासह चांदवड शहराला पिण्याचा पाणी- पुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे शहरात गेल्या १८ दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी वरचेगावातील शिंपी गल्लीतील महिला व नागरिकांनी चांदवड नगर परिषदेच्या कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले होते.या पार्श्वभूमीवर चांदवडचे उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष नगरसेवक जगन्नाथ राऊत, संदीप उगले, अल्ताफ तांबोळी, राजकुमार संकलेचा, विलास पवार, पप्पू भालेराव, कांतिलाल बाफना, गुड्डू खैरनार, गणेश खैरनार आदींच्या शिष्टमंडळाने ओझरखेडपर्यंत असलेल्या जुन्या पाइपलाइनची पाहणी केली.ओझरखेड धरणावरून चांदवड शहरासाठी स्वंतत्र पाइपलाइन व योजना लवकरच सुरूहोईल; मात्र तोपर्यंत जुन्या पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा होत असताना येणाºया पाइपलाइनमधून मोठ्या प्रमाणात गळती आहे. ही गळती काढण्यासाठी या योजनेतील महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाचे दोनच कर्मचारी एवढ्या मोठ्या पाइपलाइनवर काम करतात. या कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे मत या शिष्टमंडळाने व्यक्त केले.या गळतीत आडगाव येथील मराठी शाळेच्यामागे पाइपलाइन फुटल्याने दोन दिवस पाणीपुरवठा खंडित झाला होता. तसेच शेलू वडगावमधील असलेल्या व्हॉल्व्हमधून गेल्या पाच महिन्यांपासूनमोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत आहे.सदर आजूबाजूच्या शेतकºयांची पाण्याची व्यवस्था करून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. तसेच शेलू व माथ्यावरची शेलू या दरम्यानदेखील व्हॉल्व्हशेजारी विहीर खोदून त्यावरचे पाणी पूर्ण विहिरीत घेतले जाते. परिणामी शहरांमध्ये येणारे पाणी हे कमी दाबाने येते. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी तत्काळ लिकेज काढण्यात यावे. नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी महाराष्टÑ जीवन प्राधिकरण व वीज वितरण कंपनीचा ढिसाळ कारभार कारणीभूत असल्याचे मत व्यक्त होत आहे. यामुळे पाणीपुरवठा चांदवड शहरापर्यंत होत नसल्याची बाब उघडकीस आली आहे.या पाहणीप्रसंगी बाळासाहेब शेळके, अंकुर कासलीवाल, पराग कासलीवाल, सुनील बागुल, सुनील डुंगरवाल, भटूसा वाणी, बाळा पाडवी, सुरेश जाधव, नितीन फंगाळ, महेश खंदारे, गणेश हांडगे, रत्नदीप बच्छाव, गंगाधर सोनवणे, रवि बडोदे, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सत्यवान गायकवाड आदींसह नागरिक उपस्थित होते.वारंवार तक्रार करूनही दखल नाहीखंडित वीजपुरवठा व ठिकठिकाणी गळती होणे, पाइपलाइनमधून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्याने तालुक्याला कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. ओेझरखेड धरणात मुबलक पाणी असूनही जनतेला वेळेवर व नियमित पाणी मिळत नसल्याने चांदवड शहरातील नागरिकांना १८ दिवसांपर्यंत पाण्याची वाट पाहावी लागते. चांदवड शहरातील पाण्याची टाकी न भरल्याने येथील स्वच्छ पिण्याचे पाणी एटीएम मशीनही गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याची बाब ही पाहणी दौºयात उपस्थित पत्रकार, नागरिकांच्या लक्षात आली.