शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

एलबीटी अभय योजना; ८२ लाखांचा महसूल

By admin | Updated: July 31, 2015 00:16 IST

आज अखेरचा दिवस : ४० लाखांची व्याज-दंड माफी

नाशिक : येत्या १ आॅगस्टपासून एलबीटी रद्द करण्याची घोषणा झाली असली तरी, एलबीटी थकबाकीदारांसाठी राज्य शासनाने १ जून २०१५ पासून लागू केलेल्या अभय योजनेचा शुक्रवारी (दि.३१) अखेरचा दिवस असून, दोन महिन्यांत ५३६ प्राप्त अर्जांतून महापालिकेच्या पदरात सुमारे ८२ लाख रुपयांचा महसूल पडला आहे. या योजनेंतर्गत महापालिकेला व्याज-दंड माफीच्या माध्यमातून सुमारे ४० लाख रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे. राज्य शासनाने एलबीटीचे थकबाकीदार, तसेच मुदतीत विवरणपत्र दाखल न करणे व नोंदणीच न केलेल्या व्यापारी-व्यावसायिकांसाठी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत ‘अभय योजना’ लागू केली होती. एकीकडे राज्य शासनाने १ आॅगस्टपासून एलबीटी रद्द करण्याची घोषणा केली असल्याने अभय योजनेला कितपत प्रतिसाद लाभतो, याविषयी साशंकता व्यक्त केली जात होती. एलबीटी रद्द होण्याची घोषणा जरी झालेली असली तरी, यापूर्वी एलबीटी न भरणाऱ्या, नोंदणी न करणाऱ्या आणि विवरणपत्र मुदतीत दाखल न करणाऱ्या व्यापारी-व्यावसायिकांविरुद्ध नियमानुसार कारवाई केलीच जाणार आहे. मुदतीत विवरणपत्र दाखल न केलेल्या व्यापाऱ्यांकडून महापालिकेने ५ हजार रुपये दंडाची वसुली केली होती, तर थकबाकी न भरणाऱ्यांकडून व्याजासह दंडाची वसुली करण्याचे धोरण अवलंबिले होते. त्यासाठी सुमारे ९५० व्यापाऱ्यांची बॅँक खाती गोठविण्याचीही कारवाई महापालिकेने केली होती. महापालिकेने सुरू केलेल्या कारवाईमुळे गेल्या दोन महिन्यांत अभय योजनेंतर्गत महापालिकेकडे ५२३ अर्ज प्राप्त झाले. सन २०१३-१४ या आर्थिक वर्षासाठी ३४६ तर सन २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी १९० अर्ज प्राप्त झाले. त्यातून सन २०१३-१४ या वर्षासाठीचा ४१ लाख २ हजार ७१ रुपये, तर सन २०१४-१५ या वर्षासाठीचा ४० लाख ८ हजार ५३४ रुपयांचा महसूल महापालिकेच्या खजिन्यात जमा झाला. अभय योजनेंतर्गत महापालिकेच्या खात्यात सुमारे ८२ लाख रुपयांचा महसूल जमा झाला; परंतु व्याजमाफीपोटी २४ लाख ५८ हजार १४ रुपये तर दंडाच्या माध्यमातून १५ लाख २० हजार रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे. नाशिक महापालिकेकडे मार्च २०१५ अखेर १७ हजार ५९२ व्यापाऱ्यांनी विवरणपत्र दाखल करत एलबीटीचा भरणा केला होता. त्यातून महापालिकेला सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात सरचार्जसह एलबीटीतून ६७५ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले होते. मात्र, विक्रीकर खात्याकडून मिळालेल्या व्यापारी-व्यावसायिकांच्या यादीतील सुमारे साडेचार हजार व्यापाऱ्यांनी ना विवरणपत्र सादर केले ना एलबीटीचा भरणा केला होता. या व्यापाऱ्यांसाठीच राज्य शासनाने लागू केलेल्या अभय योजनेंतर्गत दोन महिन्यांत महापालिकेकडे ५३६ अर्ज प्राप्त झाले. सदर अर्ज १३-१४ आणि १४-१५ या दोन आर्थिक वर्षांसाठी आहेत. महापालिकेकडे उपलब्ध आकडेवारीनुसार ४ हजाराहून अधिक व्यापाऱ्यांनी या योजनेकडेही पाठ फिरविल्याचे दिसून येते. मात्र, यामधील अनेक व्यापाऱ्यांचे पत्ते चुकीचे असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)