शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

प्रशासनाच्या संवादातून कायद्याची अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 01:14 IST

नाशिक : महाराष्ट्र सरकारने ३ जुलै २०१७ रोजी ‘सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा’ संमत केला असला तरी या कायद्याची प्रशासकीय यंत्रणा तसेच सर्वसामान्यांना माहिती नाही़ कायद्याची माहितीच नसल्याने अंमलबजावणी करणे दूरच असून पीडित न्यायापासून दूर तर गुन्हेगार मोकाट आहेत़ त्यामुळे या नवीन कायद्याबाबत जनजागृतीचे काम महाराष्ट्र अंनिसच्या जात पंचायतीला मूठमाती अभियान व कायदा व्यवस्थापन विभागाच्या पुढाकाराने हाती घेण्यात आले आहे़ त्यानुसार प्रशिक्षकांना कायद्याचे सखोल ज्ञान दिले जात असून, याचा उपयोग प्रशासकीय यंत्रणेसोबत संवाद साधण्यासाठी होणार असल्याचे प्रतिपादन राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले़

ठळक मुद्देअविनाश पाटील : अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे प्रशिक्षक प्रशिक्षण

नाशिक : महाराष्ट्र सरकारने ३ जुलै २०१७ रोजी ‘सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा’ संमत केला असला तरी या कायद्याची प्रशासकीय यंत्रणा तसेच सर्वसामान्यांना माहिती नाही़ कायद्याची माहितीच नसल्याने अंमलबजावणी करणे दूरच असून पीडित न्यायापासून दूर तर गुन्हेगार मोकाट आहेत़ त्यामुळे या नवीन कायद्याबाबत जनजागृतीचे काम महाराष्ट्र अंनिसच्या जात पंचायतीला मूठमाती अभियान व कायदा व्यवस्थापन विभागाच्या पुढाकाराने हाती घेण्यात आले आहे़ त्यानुसार प्रशिक्षकांना कायद्याचे सखोल ज्ञान दिले जात असून, याचा उपयोग प्रशासकीय यंत्रणेसोबत संवाद साधण्यासाठी होणार असल्याचे प्रतिपादन राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले़पाटील यांनी सांगितले की, मअंनिसच्या पुढाकारानंतर सरकारने सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यातील गुन्हे हे दखलपात्र केले असून ते जामीनपात्र आहेत. मात्र, यात सुधारणा होणे गरजेचे असून ते अजामीनपात्र व्हावेत यासाठी आपला प्रयत्न आहे़ आजही समाजातील अनेक जातींमध्ये अन्याय, अत्याचार केले जात असून जातीबाहेर काढण्याचे प्रकार सुरूच आहे़या शिबिरात सहभागी झालेल्या प्रशिक्षकांना दिवसभर पाच सत्रात प्रशिक्षण देण्यात आले़ प्रथम सत्रात कृष्णा चांदगुडे यांनी अत्याचार झालेली उदाहरणे सांगत जात पंचायतीला मूठमाती अभियान ते कायदा मंजुरीबाबत माहिती दिली़ द्वितीय सत्रात अ‍ॅड़ मनीषा महाजन यांनी सामाजिक बहिष्कार कायद्याबाबत माहिती दिली़ तृतीय सत्रात अ‍ॅड़ रंजना गवांदे यांनी या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यासाठी असलेली पूर्वतयारी ते एफआयआरबाबत विस्तृतपणे माहिती दिली़ चतुर्थ सत्रात सामाजिक बहिष्कार कायदे व इतर पूरक कायदे याबाबत घ्यावयाच्या दक्षतेबाबत अ‍ॅड़ विनोद बोरसे यांनी मार्गदर्शन केले़ तर पाचव्या सत्रात या कायद्याचा प्रचार, प्रसार, माध्यमे, शॉर्ट फिल्म याबाबत माहिती देण्यात आली़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा़ सुशीलकुमार इंदवे यांनी तर पाहुण्यांचा परिचय महेंद्र दातरंगे यांनी करून दिला़ आभार प्रभाकर धात्रक यांनी मानले़अनिष्ठ प्रथांविरोधात मअंनिसने वेळोवेळी आवाज उठविला असून, या कायद्याच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला होता़ कायदा तयार झाला असला तरी या कायद्याबाबत जनजागृती तसेच प्रभावी अंमलबजावणी यासाठी प्रशिक्षक प्रशिक्षण शिबिर सुरू करण्यात आले आहे़ १ मे २०१८ पासून सुरू झालेले हे प्रशिक्षण शिबिर ३० एप्रिल २०१९ पर्यंत सुरू राहणार असून, ते संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे़ प्रा. दाभोळकर, पानसरे आणि डॉ. कलबुर्गी हत्याप्रकरणी पाच वर्षांत तपासाला फारशी गती मिळाली नाही. यात सीआयडी आणि एटीएस यांसारख्या पाच तपास यंत्रणा काम करत असूनही दोषीवर अद्याप कारवाई होऊन कठोर शिक्षा झालेली नाही. यामध्ये काही सामाजिक, धार्मिक संघटनांचा संशयित म्हणून हात असताना राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी कारवाईला गती मिळत नाही, असा आरोपही पाटील यांनी केला.