शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

काकडगावी लोकसहभागातून गाळ काढण्याचा शुभारंभ

By admin | Updated: October 12, 2015 23:52 IST

उपक्रम : पावसाने ओढ दिल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प

द्याने : बागलाण तालुक्यातील काकडगाव येथे लोकसहभागातून धरणातून गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य सुनिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. पावसाने ओढ दिल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प झाली. हरणबारी पूरपाणी पोहोचले नसल्याने पाणीटंचाई जाणवत आहे. गावाशेजारील धरणातून सरपंच नंदलाल आहिरे ग्रामस्थांनी काढ काढण्याचा निर्णय घेतला. धरणाची उंची वाढल्यास परिसरातील शेतीचा व पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे, असे प्रतिपादन सरपंच नंदलाल आहिरे यांनी केले.यावेळी जि.प. सदस्य सुनिता पाटील. पंचायत समिती सभापती जिजाबाई सोनवणे, नायब तहसीलदार आबासाहेब तांबे, गटविकास अधिकारी बी. एम. बहिरम, मंडल अधिकारी विस्तार अधिकारी एस. एस. महाले, नामपूरचे सरपंच प्रमोद सावंत, किरण अहिरे, अशफाक पठाण, सी. पी. अहिरे, तलाठी डी. टी. साळवे, धीरज कापडणीस, सरपंच नंदलाल अहिरे, सदस्य विनोद पाटील, निंबा सोनवणे, संगीता गरूड, कुसुम अहिरे, ज्योत्स्रा पवार, स्ािंधुताई पाटील, पोलिस पाटील राजाराम पाटील, रामचंद्र अहिरे, देवराम अहिरे, महादू अहिरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जि.प. सदस्य सुनिता पाटील यांनी शासनाच्या विविध योजना व पाणी अडवा पाणी जिरवा योजना राबविण्यात याव्यात, असे आवाहन केले. त्र्यंबकला धडक मोहीमत्र्यंबकेश्वर : त्र्यंबक तालुक्यात कृषी विभागातर्फे वनराई बंधारे बांधण्याची धडक मोहीम सुरू करण्यात आली असून, ही मोहीम पंचसूत्री अभियानाअंतर्गत वसुंधरा पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून निवडण्यात आली आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील इतर गावांमध्ये वनराई बंधारे बांधण्याचा धडक कार्यक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अजय सूर्यवंशी यांनी दिली.उपविभागीय अधिकारी गोकुळ वाघ, अजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे बंधारे बांधण्यात आले. या गावांमध्ये मेट चंद्राची, टाकेहर्ष, नांदगाव (कोहळी), वरस विहीर, टाकेदेवगाव, देवडोंगरा, पिंपळद, बेझे, चाकोरे, आळवंड, तोरंगण, वाघेरे, कोटंबी, गडदवणे आदि गावात नुकतेच वनराई बंधारे बांधण्यात आले. वनराई बंधारे बांधण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक आदिंनी प्रयत्न केले. तसेच यापुढेही असे बंधारे बांधण्यासाठी सर्व अधिकारी प्रयत्नशील राहणार असल्याचे सूर्यवंशी यांनी दिली.दरम्यान, तालुक्यात परतीचा पाऊस चांगला झाल्याने ग्रामस्थांच्या श्रमदानाने सर्व कृषी सहायक यांनी तालुक्यात धडक मोहीम राबविली असल्याचे दृश्य परिणाम दिसत आहेत. बांधलेल्या वनराई बंधाऱ्यामुळे डिसेंबरअखेर ओहळ, नाले यामध्ये पाणी टिकून राहणार आहे.(वार्ताहर)