शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

काकडगावी लोकसहभागातून गाळ काढण्याचा शुभारंभ

By admin | Updated: October 12, 2015 23:52 IST

उपक्रम : पावसाने ओढ दिल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प

द्याने : बागलाण तालुक्यातील काकडगाव येथे लोकसहभागातून धरणातून गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य सुनिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. पावसाने ओढ दिल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प झाली. हरणबारी पूरपाणी पोहोचले नसल्याने पाणीटंचाई जाणवत आहे. गावाशेजारील धरणातून सरपंच नंदलाल आहिरे ग्रामस्थांनी काढ काढण्याचा निर्णय घेतला. धरणाची उंची वाढल्यास परिसरातील शेतीचा व पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे, असे प्रतिपादन सरपंच नंदलाल आहिरे यांनी केले.यावेळी जि.प. सदस्य सुनिता पाटील. पंचायत समिती सभापती जिजाबाई सोनवणे, नायब तहसीलदार आबासाहेब तांबे, गटविकास अधिकारी बी. एम. बहिरम, मंडल अधिकारी विस्तार अधिकारी एस. एस. महाले, नामपूरचे सरपंच प्रमोद सावंत, किरण अहिरे, अशफाक पठाण, सी. पी. अहिरे, तलाठी डी. टी. साळवे, धीरज कापडणीस, सरपंच नंदलाल अहिरे, सदस्य विनोद पाटील, निंबा सोनवणे, संगीता गरूड, कुसुम अहिरे, ज्योत्स्रा पवार, स्ािंधुताई पाटील, पोलिस पाटील राजाराम पाटील, रामचंद्र अहिरे, देवराम अहिरे, महादू अहिरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जि.प. सदस्य सुनिता पाटील यांनी शासनाच्या विविध योजना व पाणी अडवा पाणी जिरवा योजना राबविण्यात याव्यात, असे आवाहन केले. त्र्यंबकला धडक मोहीमत्र्यंबकेश्वर : त्र्यंबक तालुक्यात कृषी विभागातर्फे वनराई बंधारे बांधण्याची धडक मोहीम सुरू करण्यात आली असून, ही मोहीम पंचसूत्री अभियानाअंतर्गत वसुंधरा पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून निवडण्यात आली आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील इतर गावांमध्ये वनराई बंधारे बांधण्याचा धडक कार्यक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अजय सूर्यवंशी यांनी दिली.उपविभागीय अधिकारी गोकुळ वाघ, अजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे बंधारे बांधण्यात आले. या गावांमध्ये मेट चंद्राची, टाकेहर्ष, नांदगाव (कोहळी), वरस विहीर, टाकेदेवगाव, देवडोंगरा, पिंपळद, बेझे, चाकोरे, आळवंड, तोरंगण, वाघेरे, कोटंबी, गडदवणे आदि गावात नुकतेच वनराई बंधारे बांधण्यात आले. वनराई बंधारे बांधण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक आदिंनी प्रयत्न केले. तसेच यापुढेही असे बंधारे बांधण्यासाठी सर्व अधिकारी प्रयत्नशील राहणार असल्याचे सूर्यवंशी यांनी दिली.दरम्यान, तालुक्यात परतीचा पाऊस चांगला झाल्याने ग्रामस्थांच्या श्रमदानाने सर्व कृषी सहायक यांनी तालुक्यात धडक मोहीम राबविली असल्याचे दृश्य परिणाम दिसत आहेत. बांधलेल्या वनराई बंधाऱ्यामुळे डिसेंबरअखेर ओहळ, नाले यामध्ये पाणी टिकून राहणार आहे.(वार्ताहर)