शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
2
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
3
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
4
Makarand Anaspure : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मकरंद अनासपुरेंनीही केलं होतं भाष्य, म्हणालेले की, "मराठी माणूस..."
5
Narendra Modi : "तो कुटुंबासाठी कष्ट करत होता, दहशतवाद्यांनी त्याला मारलं"; आदिलच्या आठवणीत मोदी भावुक
6
आजीच्याच शाळेत जातोय नातू...! पृथ्वी अंबानीच्या शाळेचे नाव काय, फी किती? डोळेच विस्फारतील...
7
'मला अशा मुली आवडत नाहीत, ज्या...'; भाजप नेत्याचे कपड्यांबद्दल वादग्रस्त विधान
8
Lord Hanuman : हनुमंताला पाच भाऊ होते, तेही विवाहित; काय होती त्यांची नावे? जाणून घ्या!
9
iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम
10
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ
11
Gold Price Today: सोनं झालं स्वस्त, खरेदीपूर्वी जाणून घ्या काय आहेत नवे दर?
12
पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!
13
आधी आईनं गळा आवळला, त्यानंतर मामानं...; बारावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर!
14
पाकिस्तानला भारतात दंगली घडवायच्या होत्या, पण..; जम्मू-काश्मीरमधून PM मोदींचा पाकला इशारा
15
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
16
रेपो रेटचा डबल धमाका! व्याजापोटीचे १.४८ लाख वाचणार, त्यातून ईलेक्ट्रीक स्कूटर घेतली तर आणखी... 
17
प्रामाणिकपणा काय असतो? ते या डॉगीकडून शिका! जीवाची पर्वा न करता मालकाच्या मुलाला वाचवलं; सापानं अनेक वेळा घेतला चावा, पण... 
18
ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले
19
RCB चेंगराचेंगरी प्रकरणात पहिली अटक; कोण आहे न‍िख‍िल सोसाले? त्या घटनेत महत्वाची भूमिका
20
सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम

साहित्य संमेलनाला प्रारंभ

By admin | Updated: January 23, 2016 23:54 IST

कविसंमेलन : कवींनी मांडल्या भटक्या विमुक्तांच्या जीवन व्यथा

सेनापती तात्या टोपे साहित्यनगरी (येवला) : महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती-जमाती शिक्षण विकास व संशोधन संस्था आयोजित भटक्या विमुक्तांच्या नवव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाला शनिवार, दि. २३ जानेवारी रोजी येथील आसरा लॉन्सवर उभारण्यात आलेल्या थोर स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपे साहित्यनगरीत दीपप्रज्वलनाने प्रारंभ झाला.या प्रसंगी बोलताना प्रा. वा.ना. आंधळे यांनी भटके विमुक्त अजून मागासलेले असून, अद्याप ते दगडच फोडत आहेत. साहित्यातून त्यांच्या जीवनाला नवी पालवी फुटण्यासाठी अथक परिश्रमाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. स्वागताध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी, भटके विमुक्त अजूनही पालातच राहत आहेत. तीन दगडावर संसार मांडला आहे. त्याच्या उत्थानाची खऱ्या अर्थाने गरज आहे. याकरिता संघटना प्रमुखांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.उद्घाटन कार्यक्रमानंतर प्राचार्य वा. ना. आंधळे, संमेलनाध्यक्ष भिकुजी (दादा) इदाते, श्रीमती रिता जाधव, संस्थापक तथा निमंत्रक प्राचार्य डी.के. गोसावी, स्वागताध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून कविसंमेलनाचे उद्घाटन झाले. प्रत्येक कवीने आपल्या कवितेमधून भटक्यांचे जीवन, त्यांच्या व्यथा, दशा मांडण्याचा प्रयत्न केला. मन सुन्न करणाऱ्या कवितांनी साहित्यनगरी गहिवरली. मुंबईपोलीस दलातील महिला कॉस्टेबल रिना जाधव - राठोड यांनी ‘भटक्याची मुलं ही कचरा कुंडीतली फुलं’ या कवितेतून ‘मुक्त भटके आम्ही भटकंती दाही दिशांची’ अशी सुरुवात करून भटक्यांचा उघडा संसार आणि त्याची व्यथा मांडली. त्यानंतर प्रा.वा.ना. आंधळे यांनी आई मला जन्म घेऊ दे, तू जसे पाहिले जग,मलादेखील पाहू दे,नको मारू आई मला जन्म हा घेऊ दे !!परमेश्वर प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही, त्याच्या जागी तू कसे तुला कळत नाही!!ताईसवे माझ्या मला आनंदाने न्हाऊ दे,नको मारू आई मला जन्म हा घेऊ दे !! या कवितेतून स्त्री जन्माची कहाणी मांडली, तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले. परभणीतील शेलू येथील कवी गौतम सूर्यवंशी यांनी बापानं परंपरागत तुणतुणंभूतकाळाच्या झाडाला टांगल्याने बलुतेदारी तिथेच गेली फासावर मजुरीचे हिशेब बोटावर मोजण्याइतका साक्षर या कवितेतून भटक्या विमुक्तांच्या शिक्षणाची व्यथा शब्दबद्ध करत साक्षरतेचा संदेश दिला. हमाली व्यवसाय करत असलेले श्रीरामपूरचे कवी आनंदा साळवे यांनी हातात विळा, पोटाला पिळा, उन्हाच्या प्रहरी,भर दुपारी, गवताचा भारा डोक्यावरी माय रानमाळ फिरायची कधी माय उपाशी पोटी निजायची या कवितेतून आईने उपाशी पोटी राहून उभ्या केलेल्या संसाराचे वर्णन करत. आता पोराबाळांनी आयुष्याचे सोने करावे, असा संदेश कवितेतून दिला. त्यानंतर कवी बापू बैरागी यांनी आयुष्याच्या वाटेवरील पडझड थांबवून चूक सुधारून जीवनाचे सोने करण्याची जाणीव कवितेतून करून दिली.एकापेक्षा एक सरस कवितांनी हे कविसंमेलन उत्तरोत्तर रंगत गेले. या संमेलनात भास्कर लगड, अ‍ॅड. सुरेश मोकळ, प्रा. रमेश राठोड, संजय वऱ्हाडे, विष्णू भालेरे यांनी आपापल्या कविता सादर केल्या. स्वागताध्यक्ष आणि उपाध्यक्ष ललिता गोसावी, अरु ण ओतारी या पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत केले. कविसंमेलनाचे सूत्रसंचलन सरचिटणीस बापू बैरागी यांनी केले. यानंतर सायंकाळी पोट धरून हसवणारा विनोदी कलाकार प्रा. विष्णू भारती (दौंड) यांनी बारा बलुतेदाराचा कालवा हा एकपात्री प्रयोग सादर केला. (वार्ताहर)