शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानास उशीर; शेतकरी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 00:17 IST

मालेगाव तालुक्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना जिल्हा बॅँकेकडून उशिरा अनुदान मिळत असून, आठवड्याला केवळ पाच हजार रुपये जिल्हा बॅँक शाखेकडून देण्यात येत असल्याने शेतकºयांत नाराजी व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देपाटणे : अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना वेळेवर अनुदान मिळत नसल्याची तक्रार

पाटणे : मालेगाव तालुक्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना जिल्हा बॅँकेकडून उशिरा अनुदान मिळत असून, आठवड्याला केवळ पाच हजार रुपये जिल्हा बॅँक शाखेकडून देण्यात येत असल्याने शेतकºयांत नाराजी व्यक्त होत आहे.चालू हंगामात सुरुवातीपासूनच खरीप पिके अतिशय जोमाने बहरली होती. पाऊस समाधानकारक होता दोन तीन वर्षांनंतर प्रथमच खरिपाचे पीक मोठ्या प्रमाणात मिळेल या आशेवर बळीराजा होता; परंतु चालू हंगामात सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यवृष्टी झाल्याने आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्याच्या अवकाळी पावसाने अतिवृष्टीने खरीप हंगामातील मका, बाजरी, कांदा, कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. फळबागांनाही मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका बसून अतोनात नुकसान झाले.शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शासनाने अतिवृष्टीबाधित शेतकºयांना मदत जाहीर केली त्यात खरीप पिकासाठी आठ हजार रुपये व बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी १८ हजार रुपये त्यानुसार २ हेक्टरपर्यंत बाधित क्षेत्राचे नुकसान झालेल्या शेतकºयांना अनुदान नुकतेच शासनाने शेतकºयांंच्या खात्यात जमा केले.पाटणे व परिसरातील शेतकºयांच्या खात्यात हे अनुदान १५ जानेवारी रोजी जमा करण्यात आले. त्यांचे वाटपही सुरू आहे. जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालय येथून तालुक्यातील शाखेत आदेश देऊन बाधित शेतकºयांना फक्त आठवड्याला पाच हजार रुपये देण्याचे आदेश दिले.शासनाने दिलेले अनुदान जिल्हा बँकेत शेतकºयांच्या खात्यात एकरकमी जमा करण्यात आले; परंतु बँक फक्त पाच हजार रुपये देत आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये संताप होत आहे. रब्बी हंगामाच्या पीक लागवडीसाठी पाटणे परिसरातील शेतकºयांना पैशाची गरज असताना खात्यात जमा असलेल्या रक्कमेचा वापर करता येत नसल्याची शेतकºयांची तक्रार आहे.शासनाने अतिवृष्टीचे अनुदान संपूर्ण दिले असता जिल्हा बँक शेतकºयांना देत नाही. आधीच नैसर्गिक आपत्तीने घायाळ झालेल्या शेतकºयांना तात्काळ संपूर्ण अनुदानाची रक्कम शेतकºयांना मिळावी, अशी मागणी पाटणेसह परिसरातील शेतकºयांनी केली आहे.वडनेरच्या शेतकºयांचे प्रांताधिकाºयांना निवेदनवडनेर : येथील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून शासनाने दिलेला दुष्काळ अनुदान निधी देण्यास विलंब होत असून, एकावेळेस फक्त पाच हजार रुपये दिले जात आहेत. यासाठी परिसरातील गाव खेड्याकडून येणाºया शेतकºयांना वडनेर येथील बँकेत दिवसभर ताटकळत उभे राहावे लागत आहे. वडनेर येथील बँकेत काटवण परिसरातील मोठ्या संख्येने खातेदार आहेत. शेतीची कामे बुडवत दिवसभर थांबूनदेखील पैसे मिळत नसून, रिकाम्या हाती परतावे लागत आहे. यामुळे अडचणीत वाढ झाली आहे. यासाठी तात्काळ संबंधितांनी लक्ष घालून अनुदानाची पूर्ण रक्कम एका वेळेस पूर्ण मिळावी यासाठी विराणेचे माजी सरपंच नंदकुमार सोनवणे यांनी प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांना निवेदन दिले आहे. निवेदनाची प्रत तहसीलदार, सोसायटी सभापती, जिल्हा बँक वडनेर शाखा व वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यास देण्यास आली आहे. निवेदनावर विराणेचे नंदकुमार सोनवणे, सतीश पगार, हिरालाल पगार, दावल माळी, ज्ञानेश्वर पगारे आदींच्या सह्या आहेत.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस