शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

अखेरच्या तीन महिन्यांत बँकांना २५ सुट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:25 IST

यंदा दिवाळी आणि नाताळ या सणांच्या पार्श्वभूमीवर आॅक्टोबर, नोव्हेबर आणि डिसेंबर महिन्यांत तब्बल २५ दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे जे ग्राहक आॅनलाइन आर्थिक व्यवहार करणार नाहीत, त्यांच्यासाठी या सुट्या डोकेदुखी ठरणार असून, बँकांना असलेल्या सुट्यांचे नियोजन पाहून आर्थिक व्यवहार करणे उपयुक्त ठरणार आहे.

नाशिक : यंदा दिवाळी आणि नाताळ या सणांच्या पार्श्वभूमीवर आॅक्टोबर, नोव्हेबर आणि डिसेंबर महिन्यांत तब्बल २५ दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे जे ग्राहक आॅनलाइन आर्थिक व्यवहार करणार नाहीत, त्यांच्यासाठी या सुट्या डोकेदुखी ठरणार असून, बँकांना असलेल्या सुट्यांचे नियोजन पाहून आर्थिक व्यवहार करणे उपयुक्त ठरणार आहे. नोटाबंदीनंतर देशात आॅनलाइन आर्थिक व्यवहाराला बºयापैकी गती मिळाली होती. मात्र, चलन तुटवड्याची स्थिती संपताच पुन्हा रोखीने व्यवहार करण्याला नागरिकांनी पसंती दिली असून, आता या वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांमध्ये तब्बल २५ दिवस बँका बंद राहणार असल्याने बाजारात चलन टंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता अर्थतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.  आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच रविवार, दि.१ आॅक्टोबरला लागून २ आॅक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती असल्याने बँका दोन दिवस बंद राहिल्या, तर १४ आॅक्टोबरला दुसरा शनिवार आणि रविवारी बँका बंद होत्या. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर १९ आॅक्टोबरला (लक्ष्मीपूजन) आणि २० आॅक्टोबर (पाडवा) अशा सलग दोन दिवस बँका बंद राहिल्या असून, लक्ष्मीपूजन, पाडव्याची सुटी झाल्यानंतर शनिवारी बँका उघडल्या, मात्र पुन्हा २२ आॅक्टोबरला रविवारची सुटी आली, तर २८ आॅक्टोबरला चौथा शनिवार आणि २९ आॅक्टोबरला रविवार असे दोन दिवस बँका बंद राहणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात गुरु नानक जयंतीनिमित्त ४ नोव्हेंबर रोजीही बँकांना सुटी असून ५, १२, १९ आणि २६ नोव्हेंबरला रविवारची साप्ताहिक सुटी व ११ आणि २५ नोव्हेंबरला महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवारच्या दिवशी सुट्यांमुळे बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. डिसेंबर महिन्यात २३, २४ आणि २५ रोजी चौथा शनिवार, रविवार आणि नाताळच्या सलग तीन सुट्या आल्या आहेत, तर ३, १०, १७ आणि ३१ डिसेंबरला रविवारच्या साप्ताहिक सुटीमुळे बँकांचे काम बंद राहणार असून, दुसºया आणि चौथ्या शनिवारी ९ आणि २३ डिसेंबरलाही बँका बंद राहतील. याशिवाय ईद-ए-मिलादच्या निमित्ताने १ डिसेंबरलाही बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे या तीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे २५ दिवस बँका बंद असणार आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांना आॅनलाइन अथवा कॅशलेस व्यवहार करणे शक्य नाही. त्यांना या सुट्यांच्या नियोजनानुसारच आपले आर्थिक गणितं जुळवावी लागणार आहेत.