शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

जिल्ह्यात अंतिम चरणात प्रचार सभांचा धुरळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 01:25 IST

विधानसभा निवडणुकीत अंतिम चरणात आता खºया अर्थाने प्रचाराचा धुरळा उठू लागला असला तरी, काही मतदारसंघात स्टार प्रचारकांनी पायधूळ न झाडल्याने तेथील उमेदवारांना स्थानिक स्तरावरच प्रचारयंत्रणेवर भर देणे भाग पडले आहे. स्टार प्रचारकांच्या सभांसाठी लागणारा खर्च, त्याच्या तयारीत जाणारा वेळ, कार्यकर्त्यांचे लागणारे बळ आणि गर्दी जमविण्यासाठी करावा लागणारा आटापिटा पाहता यंदा राजकीय पक्षांच्या काही उमेदवारांनी स्वत:हूनच स्टार प्रचारकांवर फुली मारल्याचेही दिसून आले आहे.

ठळक मुद्देस्टार प्रचारकांची काही मतदारसंघांकडे पाठ : जाहीर सभांपेक्षा प्रचार फेऱ्यांवरच अधिक भर

नाशिक : विधानसभा निवडणुकीत अंतिम चरणात आता खºया अर्थाने प्रचाराचा धुरळा उठू लागला असला तरी, काही मतदारसंघात स्टार प्रचारकांनी पायधूळ न झाडल्याने तेथील उमेदवारांना स्थानिक स्तरावरच प्रचारयंत्रणेवर भर देणे भाग पडले आहे. स्टार प्रचारकांच्या सभांसाठी लागणारा खर्च, त्याच्या तयारीत जाणारा वेळ, कार्यकर्त्यांचे लागणारे बळ आणि गर्दी जमविण्यासाठी करावा लागणारा आटापिटा पाहता यंदा राजकीय पक्षांच्या काही उमेदवारांनी स्वत:हूनच स्टार प्रचारकांवर फुली मारल्याचेही दिसून आले आहे.विधानसभा निवडणुकीची मैफल आता समेवर येऊन ठेपली आहे. अवघ्या चार दिवसांवर मतदान येऊन ठेपल्याने उमेदवारांची मतदारसंघ पिंजून काढताना दमछाक होताना दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज माघारी प्रक्रियेनंतर गेल्या नऊ दिवसात जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांत उमेदवारांनी आपापल्या कुवतीनुसार शक्तिप्रदर्शन दाखविले आहे. नाशिक शहरातील नाशिक मध्य, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि देवळाली या चारही मतदारसंघात चुरस निर्माणझाली आहे. विशेषत: नाशिक पश्चिम आणि नाशिक पूर्व मतदारसंघातील लढती लक्षवेधी ठरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात भाजपचे राष्टÑीय कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांचेच कार्यकर्ता संमेलन झाले आहे तर नाशिक पश्चिममध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा झालेली आहे. देवळाली शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो; परंतु याठिकाणी सेनेच्या एकाही स्टार प्रचारकाची जाहीर सभा झालेली नाही.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराच्या सुरुवातीला सटाणा आणि चांदवड या दोन मतदारसंघांत सभा घेतल्या तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिंडोरी मतदारसंघातील वणी, नांदगाव मतदारसंघातील मनमाड आणि येवला येथे जाहीर सभा घेतल्या. राष्टÑवादीचे सध्या फार्मात असलेले अभिनेते व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जिल्ह्यात कळवण, सिन्नर, नाशिक शहर, देवळाली, दिंडोरी, येवला या ठिकाणी प्रचार फेºया काढल्या तर राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सिन्नर, दिंडोरी येथे सभा झाल्या. छगन भुजबळ यांनीही जिल्ह्यात सभा घेतल्या. मनसेप्रमुख राज ठाकरे यांची बुधवारी (दि. १६) नाशिकला डोंगरे वसतिगृह मैदानावर तोफ धडाडली. काँग्रेसचा एकही स्टार प्रचारक नाशिक जिल्ह्यात फिरकला नाही. मालेगाव मध्य मतदारसंघात एमआयएमचे असुदुद्दीन ओवेसी यांची एकमात्र सभा झाली. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची नांदगाव मतदारसंघातील मनमाड येथे सभा झाली तर नाशिकची नियोजित सभा रद्द झाली. जिल्ह्यात माकपचे दोन ठिकाणी उमेदवार लढत देत आहेत; परंतु नाशिक पश्चिममध्ये पक्षाच्या पॉलिटब्युरो सदस्य आणि माजी खासदार सुभाषिनी अली यांची एकमेव सभा होऊ शकली.इगतपुरी, देवळालीकडे सेना नेत्यांची पाठजिल्ह्यातील निफाड, कळवण, इगतपुरी, मालेगाव बाह्य तसेच देवळाली या मतदारसंघात कोणत्याही राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकाने अद्याप हजेरी लावलेली नाही. विद्यमान आमदाराच्या पक्षांतरामुळे चर्चेत आलेल्या इगतपुरी मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेप्रसंगी झालेली सभावगळता शिवसेनेकडून एकाही स्टार प्रचारकाची सभा झाली नाही. त्यामुळे तेथील सेनेच्या जागेबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. त्याचप्रमाणे सेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाºया देवळालीकडेही राज्यस्तरीय शिवसेना नेत्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. निवडणूक प्रचार संपायला आता अवघे तीन दिवस उरले असून या अखेरच्या चरणात प्रचाराचा धुराळा आणखी उठण्याची शक्यता आहे. काही सभा नियोजित आहेत. मात्र, यंदा जाहीर सभांऐवजी उमेदवारांनी घरोघरी प्रचारयंत्रणा राबविण्यावरच अधिक भर दिल्याचे दिसून येत आहे.युतीच्या तुलनेत आघाडीत एकोपाविधानसभा निवडणुकीसाठी सेना-भाजप युती झाली असली तरी, भाजपने शिवसेनेच्या आणि शिवसेनेने भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतलेल्या नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांसाठीच सभा घेतल्या. त्यातही नाशिक पश्चिममध्ये युतीत शिवसेनेने उघडपणे असहकार पुकारलेला आहे. अन्यत्रही अपवादानेच परस्परांसाठी मते मागितली जात आहेत. युतीच्या तुलनेत कॉँग्रेस आघाडीत मात्र एकोप्याचे दर्शन घडताना दिसत आहे. सभांचे व्यासपीठ असो की पदयात्रा, दोन्ही पक्षाचे नेते-कार्यकर्ते त्यात सोबतीने दिसत आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Politicsराजकारण