शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
3
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
4
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
5
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
6
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
7
९८ लाख कोटींच्या साम्राज्याचा सम्राट निवृत्त! वॉरेन बफे यांचा कंपनीतून ९५ व्या वर्षी राजीनामा
8
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
9
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
10
आजपासून काय-काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? कार महागणार, पीएफच्या नियमांतही मोठे बदल होणार अन् बरंच काही...!
11
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
12
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
13
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
14
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
15
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
16
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
17
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
18
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
19
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
20
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
Daily Top 2Weekly Top 5

दलित वस्तीचे चार वर्षांपासून हजारो कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 15:25 IST

जिल्ह्यातील दलित वस्त्यांमध्ये सन २०१५-१६ या वर्षामध्ये कोट्यवधी रुपये खर्चाचे कामे समाजकल्याण खात्याकडून सुरू करण्यात आले होते. या कामांपैकी १३२६ कामे चार वर्षांनंतरही अपूर्ण असल्याची बाब उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देपंधरा कोटी परत जाणार : विकासकामांवर होणार परिणाम दलित वस्तीतील अपूर्ण कामे पूर्ण कशी करायची

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या वसाहतीत रस्ते, पाणी, गटार व दिव्यांची सोय करणाऱ्या दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण खात्याच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कामांपैकी सुमारे १,३२६ कामे गेल्या चार वर्षांपासून रखडली असून, सदर कामे करणा-या ठेकेदारांनीही अपूर्ण कामे करून काही कामांचे देयकेही काढून घेतल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. जी काही कामे अपूर्ण आहेत त्यासाठी करण्यात आलेल्या तरतुदीची सुमारे १५ कोटींची रक्कम आता शासनजमा करावा लागणार असल्याने दलित वस्तीची कामे पूर्ण कशी करावी? असा नवीन प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यातील दलित वस्त्यांमध्ये सन २०१५-१६ या वर्षामध्ये कोट्यवधी रुपये खर्चाचे कामे समाजकल्याण खात्याकडून सुरू करण्यात आले होते. या कामांपैकी १३२६ कामे चार वर्षांनंतरही अपूर्ण असल्याची बाब उघडकीस आली आहे. या कामांसाठी करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या तरतुदीपैकी ९० टक्के रक्कम ठेकेदारांना अदा करण्यात आली असून, उर्वरित १० टक्केम्हणजेच १५ कोटी रक्कम समाजकल्याण विभागाकडे चार वर्षांपासून पडून आहे. सदरची रक्कम खर्च करण्याची मुदतही संपुष्टात आली असल्यामुळे ही रक्कम शासनाकडे परत करण्याशिवाय कोणताही पर्याय नसला तरी, दलित वस्तीतील अपूर्ण कामे पूर्ण कशी करायची व त्यासाठी निधीची उपलब्धता कोठून करायचा? असा प्रश्न समाजकल्याण समिती सभापतींसमोर उभा ठाकला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या समाजकल्याण समितीच्या मासिक बैठकीत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर समितीच्या सदस्यांनी समाजकल्याण अधिकारी व कर्मचाऱ्यांना यासाठी दोषी ठरवून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. सन २०१५-१६ मध्ये सरकारने दलित वस्ती सुधार योजनेसाठी दिलेला निधी पूर्ण खर्च न झाल्याने उर्वरित १५ कोटी रुपये शासनाकडे परत पाठविण्याची वेळ समाजकल्याण विभागावर आलेली असताना आता ७०१ कामांचे उर्वरित १० टक्के रक्कमेचे देयके परत मिळावे यासाठी ठेकेदारांनी प्रस्ताव दिले आहेत. त्यापोटी समाजकल्याण विभागाला सात कोटी रुपयांचे दायित्व आहे. एकीकडे पैसे परत करण्याचे तर दुसरीकडे सात कोटी रुपयांच्या निधीची उपलब्धता करण्याचे काम समाजकल्याण विभागाला करावे लागणार आह

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद