शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

दलित वस्तीचे चार वर्षांपासून हजारो कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 15:25 IST

जिल्ह्यातील दलित वस्त्यांमध्ये सन २०१५-१६ या वर्षामध्ये कोट्यवधी रुपये खर्चाचे कामे समाजकल्याण खात्याकडून सुरू करण्यात आले होते. या कामांपैकी १३२६ कामे चार वर्षांनंतरही अपूर्ण असल्याची बाब उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देपंधरा कोटी परत जाणार : विकासकामांवर होणार परिणाम दलित वस्तीतील अपूर्ण कामे पूर्ण कशी करायची

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या वसाहतीत रस्ते, पाणी, गटार व दिव्यांची सोय करणाऱ्या दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण खात्याच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कामांपैकी सुमारे १,३२६ कामे गेल्या चार वर्षांपासून रखडली असून, सदर कामे करणा-या ठेकेदारांनीही अपूर्ण कामे करून काही कामांचे देयकेही काढून घेतल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. जी काही कामे अपूर्ण आहेत त्यासाठी करण्यात आलेल्या तरतुदीची सुमारे १५ कोटींची रक्कम आता शासनजमा करावा लागणार असल्याने दलित वस्तीची कामे पूर्ण कशी करावी? असा नवीन प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यातील दलित वस्त्यांमध्ये सन २०१५-१६ या वर्षामध्ये कोट्यवधी रुपये खर्चाचे कामे समाजकल्याण खात्याकडून सुरू करण्यात आले होते. या कामांपैकी १३२६ कामे चार वर्षांनंतरही अपूर्ण असल्याची बाब उघडकीस आली आहे. या कामांसाठी करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या तरतुदीपैकी ९० टक्के रक्कम ठेकेदारांना अदा करण्यात आली असून, उर्वरित १० टक्केम्हणजेच १५ कोटी रक्कम समाजकल्याण विभागाकडे चार वर्षांपासून पडून आहे. सदरची रक्कम खर्च करण्याची मुदतही संपुष्टात आली असल्यामुळे ही रक्कम शासनाकडे परत करण्याशिवाय कोणताही पर्याय नसला तरी, दलित वस्तीतील अपूर्ण कामे पूर्ण कशी करायची व त्यासाठी निधीची उपलब्धता कोठून करायचा? असा प्रश्न समाजकल्याण समिती सभापतींसमोर उभा ठाकला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या समाजकल्याण समितीच्या मासिक बैठकीत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर समितीच्या सदस्यांनी समाजकल्याण अधिकारी व कर्मचाऱ्यांना यासाठी दोषी ठरवून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. सन २०१५-१६ मध्ये सरकारने दलित वस्ती सुधार योजनेसाठी दिलेला निधी पूर्ण खर्च न झाल्याने उर्वरित १५ कोटी रुपये शासनाकडे परत पाठविण्याची वेळ समाजकल्याण विभागावर आलेली असताना आता ७०१ कामांचे उर्वरित १० टक्के रक्कमेचे देयके परत मिळावे यासाठी ठेकेदारांनी प्रस्ताव दिले आहेत. त्यापोटी समाजकल्याण विभागाला सात कोटी रुपयांचे दायित्व आहे. एकीकडे पैसे परत करण्याचे तर दुसरीकडे सात कोटी रुपयांच्या निधीची उपलब्धता करण्याचे काम समाजकल्याण विभागाला करावे लागणार आह

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद