शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

चणकापूरमधून आज अखेरचे आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 22:39 IST

कळवण : चणकापूर प्रकल्पातून गिरणा नदीत पिण्यासाठी पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पाटबंधारे विभागाला दिले आहेत. त्यानुसार बुधवारी (दि.२३) सकाळी पाणी सोडण्याचे नियोजन मालेगाव पाटबंधारे विभागाने केले असून, ६४३ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देदिलासा : कळवणसह ५२ पाणी योजनांना होणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : चणकापूर प्रकल्पातून गिरणा नदीत पिण्यासाठी पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पाटबंधारे विभागाला दिले आहेत. त्यानुसार बुधवारी (दि.२३) सकाळी पाणी सोडण्याचे नियोजन मालेगाव पाटबंधारे विभागाने केले असून, ६४३ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यावेळी ११०० क्यूसेकने गिरणा नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार असून, त्यामुळे कसमादे पट्ट्यातील कळवण शहरासह ५२ पाणीपुरवठा योजनांना या आवर्तनाचा फायदा होणार आहे.मालेगाव पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. मालेगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चौधरी यांना चणकापूर धरणातून पाणी सोडण्याची मागणी असल्यामुळे जिल्हाधिकारी यांना सकारात्मक अहवाल पाठवून पाणी सोडण्याचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना आमदार नितीन पवार यांनी केली होती. चणकापूर प्रकल्पातून कळवण, देवळा, सटाणा तालुक्यातील व गिरणा नदीकाठावरील गावे व मालेगाव महानगरपालिका, सटाणा नगर परिषद, कळवण नगरपंचायत व इतर पाणीपुरवठा योजनांसाठी व कसमादेतील टंचाईग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याची सोडवणूक होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कसमादेसाठी वरदान ठरलेले चणकापूर धरण शेतकऱ्यांसाठी यंदा चांगलेच लाभदायी ठरले. दशकानंतर धरणातून सिंचनासाठी दोन आवर्तने मिळाली. पिण्यासाठीचे शेवटचे आवर्तन बुधवारी सोडण्यात येणार आहे.आवर्तनानंतरही राहणार पाणीसाठा शिल्लक धरणात बºयापैकी जलसाठा आहे. मालेगावसह विविध पाणीपुरवठा योजनांमध्ये निम्मा जलसाठा शिल्लक आहे. गिरणा नदीपात्र ओले असल्याने आवर्तनासाठी पाणी कमी लागू शकेल. शेवटच्या आवर्तनानंतरही अडीचशे ते तीनशे दशलक्ष घनफूट पाणीसाठा धरणात शिल्लक राहणार आहे. चणकापूर धरणावर कसमादेतील मालेगावसह लहान-मोठ्या ५२ पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला. परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नोव्हेंबरपर्यंत पूरपाणी पाणीपुरवठा योजनांना मिळत राहिले. त्यामुळे धरणातील पहिले आवर्तन सोडण्याची गरज फेब्रुवारीमध्ये निर्माण झाली. यामुळे आवर्तनाची संख्या चारवरून तीन झाली.

टॅग्स :Damधरणwater transportजलवाहतूक