शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

चणकापूरमधून आज अखेरचे आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 22:39 IST

कळवण : चणकापूर प्रकल्पातून गिरणा नदीत पिण्यासाठी पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पाटबंधारे विभागाला दिले आहेत. त्यानुसार बुधवारी (दि.२३) सकाळी पाणी सोडण्याचे नियोजन मालेगाव पाटबंधारे विभागाने केले असून, ६४३ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देदिलासा : कळवणसह ५२ पाणी योजनांना होणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : चणकापूर प्रकल्पातून गिरणा नदीत पिण्यासाठी पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पाटबंधारे विभागाला दिले आहेत. त्यानुसार बुधवारी (दि.२३) सकाळी पाणी सोडण्याचे नियोजन मालेगाव पाटबंधारे विभागाने केले असून, ६४३ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यावेळी ११०० क्यूसेकने गिरणा नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार असून, त्यामुळे कसमादे पट्ट्यातील कळवण शहरासह ५२ पाणीपुरवठा योजनांना या आवर्तनाचा फायदा होणार आहे.मालेगाव पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. मालेगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चौधरी यांना चणकापूर धरणातून पाणी सोडण्याची मागणी असल्यामुळे जिल्हाधिकारी यांना सकारात्मक अहवाल पाठवून पाणी सोडण्याचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना आमदार नितीन पवार यांनी केली होती. चणकापूर प्रकल्पातून कळवण, देवळा, सटाणा तालुक्यातील व गिरणा नदीकाठावरील गावे व मालेगाव महानगरपालिका, सटाणा नगर परिषद, कळवण नगरपंचायत व इतर पाणीपुरवठा योजनांसाठी व कसमादेतील टंचाईग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याची सोडवणूक होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कसमादेसाठी वरदान ठरलेले चणकापूर धरण शेतकऱ्यांसाठी यंदा चांगलेच लाभदायी ठरले. दशकानंतर धरणातून सिंचनासाठी दोन आवर्तने मिळाली. पिण्यासाठीचे शेवटचे आवर्तन बुधवारी सोडण्यात येणार आहे.आवर्तनानंतरही राहणार पाणीसाठा शिल्लक धरणात बºयापैकी जलसाठा आहे. मालेगावसह विविध पाणीपुरवठा योजनांमध्ये निम्मा जलसाठा शिल्लक आहे. गिरणा नदीपात्र ओले असल्याने आवर्तनासाठी पाणी कमी लागू शकेल. शेवटच्या आवर्तनानंतरही अडीचशे ते तीनशे दशलक्ष घनफूट पाणीसाठा धरणात शिल्लक राहणार आहे. चणकापूर धरणावर कसमादेतील मालेगावसह लहान-मोठ्या ५२ पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला. परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नोव्हेंबरपर्यंत पूरपाणी पाणीपुरवठा योजनांना मिळत राहिले. त्यामुळे धरणातील पहिले आवर्तन सोडण्याची गरज फेब्रुवारीमध्ये निर्माण झाली. यामुळे आवर्तनाची संख्या चारवरून तीन झाली.

टॅग्स :Damधरणwater transportजलवाहतूक