शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

चणकापूरमधून आज अखेरचे आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 22:39 IST

कळवण : चणकापूर प्रकल्पातून गिरणा नदीत पिण्यासाठी पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पाटबंधारे विभागाला दिले आहेत. त्यानुसार बुधवारी (दि.२३) सकाळी पाणी सोडण्याचे नियोजन मालेगाव पाटबंधारे विभागाने केले असून, ६४३ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देदिलासा : कळवणसह ५२ पाणी योजनांना होणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : चणकापूर प्रकल्पातून गिरणा नदीत पिण्यासाठी पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पाटबंधारे विभागाला दिले आहेत. त्यानुसार बुधवारी (दि.२३) सकाळी पाणी सोडण्याचे नियोजन मालेगाव पाटबंधारे विभागाने केले असून, ६४३ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यावेळी ११०० क्यूसेकने गिरणा नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार असून, त्यामुळे कसमादे पट्ट्यातील कळवण शहरासह ५२ पाणीपुरवठा योजनांना या आवर्तनाचा फायदा होणार आहे.मालेगाव पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. मालेगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चौधरी यांना चणकापूर धरणातून पाणी सोडण्याची मागणी असल्यामुळे जिल्हाधिकारी यांना सकारात्मक अहवाल पाठवून पाणी सोडण्याचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना आमदार नितीन पवार यांनी केली होती. चणकापूर प्रकल्पातून कळवण, देवळा, सटाणा तालुक्यातील व गिरणा नदीकाठावरील गावे व मालेगाव महानगरपालिका, सटाणा नगर परिषद, कळवण नगरपंचायत व इतर पाणीपुरवठा योजनांसाठी व कसमादेतील टंचाईग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याची सोडवणूक होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कसमादेसाठी वरदान ठरलेले चणकापूर धरण शेतकऱ्यांसाठी यंदा चांगलेच लाभदायी ठरले. दशकानंतर धरणातून सिंचनासाठी दोन आवर्तने मिळाली. पिण्यासाठीचे शेवटचे आवर्तन बुधवारी सोडण्यात येणार आहे.आवर्तनानंतरही राहणार पाणीसाठा शिल्लक धरणात बºयापैकी जलसाठा आहे. मालेगावसह विविध पाणीपुरवठा योजनांमध्ये निम्मा जलसाठा शिल्लक आहे. गिरणा नदीपात्र ओले असल्याने आवर्तनासाठी पाणी कमी लागू शकेल. शेवटच्या आवर्तनानंतरही अडीचशे ते तीनशे दशलक्ष घनफूट पाणीसाठा धरणात शिल्लक राहणार आहे. चणकापूर धरणावर कसमादेतील मालेगावसह लहान-मोठ्या ५२ पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला. परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नोव्हेंबरपर्यंत पूरपाणी पाणीपुरवठा योजनांना मिळत राहिले. त्यामुळे धरणातील पहिले आवर्तन सोडण्याची गरज फेब्रुवारीमध्ये निर्माण झाली. यामुळे आवर्तनाची संख्या चारवरून तीन झाली.

टॅग्स :Damधरणwater transportजलवाहतूक