शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

चणकापूरमधून आज अखेरचे आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 22:39 IST

कळवण : चणकापूर प्रकल्पातून गिरणा नदीत पिण्यासाठी पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पाटबंधारे विभागाला दिले आहेत. त्यानुसार बुधवारी (दि.२३) सकाळी पाणी सोडण्याचे नियोजन मालेगाव पाटबंधारे विभागाने केले असून, ६४३ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देदिलासा : कळवणसह ५२ पाणी योजनांना होणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : चणकापूर प्रकल्पातून गिरणा नदीत पिण्यासाठी पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पाटबंधारे विभागाला दिले आहेत. त्यानुसार बुधवारी (दि.२३) सकाळी पाणी सोडण्याचे नियोजन मालेगाव पाटबंधारे विभागाने केले असून, ६४३ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यावेळी ११०० क्यूसेकने गिरणा नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार असून, त्यामुळे कसमादे पट्ट्यातील कळवण शहरासह ५२ पाणीपुरवठा योजनांना या आवर्तनाचा फायदा होणार आहे.मालेगाव पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. मालेगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चौधरी यांना चणकापूर धरणातून पाणी सोडण्याची मागणी असल्यामुळे जिल्हाधिकारी यांना सकारात्मक अहवाल पाठवून पाणी सोडण्याचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना आमदार नितीन पवार यांनी केली होती. चणकापूर प्रकल्पातून कळवण, देवळा, सटाणा तालुक्यातील व गिरणा नदीकाठावरील गावे व मालेगाव महानगरपालिका, सटाणा नगर परिषद, कळवण नगरपंचायत व इतर पाणीपुरवठा योजनांसाठी व कसमादेतील टंचाईग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याची सोडवणूक होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कसमादेसाठी वरदान ठरलेले चणकापूर धरण शेतकऱ्यांसाठी यंदा चांगलेच लाभदायी ठरले. दशकानंतर धरणातून सिंचनासाठी दोन आवर्तने मिळाली. पिण्यासाठीचे शेवटचे आवर्तन बुधवारी सोडण्यात येणार आहे.आवर्तनानंतरही राहणार पाणीसाठा शिल्लक धरणात बºयापैकी जलसाठा आहे. मालेगावसह विविध पाणीपुरवठा योजनांमध्ये निम्मा जलसाठा शिल्लक आहे. गिरणा नदीपात्र ओले असल्याने आवर्तनासाठी पाणी कमी लागू शकेल. शेवटच्या आवर्तनानंतरही अडीचशे ते तीनशे दशलक्ष घनफूट पाणीसाठा धरणात शिल्लक राहणार आहे. चणकापूर धरणावर कसमादेतील मालेगावसह लहान-मोठ्या ५२ पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला. परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नोव्हेंबरपर्यंत पूरपाणी पाणीपुरवठा योजनांना मिळत राहिले. त्यामुळे धरणातील पहिले आवर्तन सोडण्याची गरज फेब्रुवारीमध्ये निर्माण झाली. यामुळे आवर्तनाची संख्या चारवरून तीन झाली.

टॅग्स :Damधरणwater transportजलवाहतूक