शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

भाषा, प्रांतवाद ही संकुचित भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 01:03 IST

समरसता, सेवा आणि हिंंदुत्व हा व्यापक संघ विचार असून भाषा, प्रांतवाद ही संकुचित भावना आहे. समरसता म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा विचार असल्याने अल्प आणि बहुमताच्या संख्येचा विचार करणे चुकीचे आहे. सर्वांना बरोबर घेऊन चाललो तरच जगावर वर्चस्व राखता येऊ शकेल, असे प्रतिपादन राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले.

ठळक मुद्देभय्याजी जोशी : अहिरे स्मृतिग्रंथ प्रकाशन सोहळ्यात प्रतिपादन

नाशिक : समरसता, सेवा आणि हिंंदुत्व हा व्यापक संघ विचार असून भाषा, प्रांतवाद ही संकुचित भावना आहे. समरसता म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा विचार असल्याने अल्प आणि बहुमताच्या संख्येचा विचार करणे चुकीचे आहे. सर्वांना बरोबर घेऊन चाललो तरच जगावर वर्चस्व राखता येऊ शकेल, असे प्रतिपादन राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले.गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात कै. बाळासाहेब अहिरे स्मृतिग्रंथ प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, निशिकांत अहेर, नानासाहेब जाधव, स्मृतिग्रंथ समितीचे कैलासनाना साळुंखे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कै. बाळासाहेब अहिरे स्मृतिग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जोशी म्हणाले, संघाचा विचार हा सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा आहे.भाषा, प्रांतवाद समाजाला संकुचित करीत असल्यामुळे समाजातील ही विषमता दूर करण्याचे काम संघ समरसतेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाषा, प्रांत हा काही अल्प आणि बहुमताचा विषय नाही तर समरसता आचरणाचा विषय असल्याचे जोशी म्हणाले. हिंदुत्व हे एक सत्य असल्यामुळे सत्य सिद्ध करण्याला बहुमत लागत नाही. त्यामुळे धर्मांतरीत करून हिंदूंची संख्या वाढविण्याची गरज नसल्याचे विधानही त्यांनी केले.हिंदुत्व ही समर्पण आणि समरसता असून हा विचार संघाच्या असंख्य ज्येष्ठांनी रूजविला आहे. त्याच पाऊलखुणांवर संघाची पुढची पिढी साधना करीत आहे. आपसातील मतभेद विसरून उभे राहिलो तरच आपण जगात स्थान निर्माण करू शकतो, असा पुनरुच्चार करताना जोशी यांनी प्राचीन काळापासून चालत आलेल्या हिंदुत्व विचाराचे पोषण राष्टÑीय स्वयंसेवक संघ करीत असल्याचे सांगितले. हिंदुत्व विचाराचे आणि चिंतनाचे पोषण झाले नाही तर हा विचारच दुर्बल होऊन जाईल, असेही ते म्हणाले.हिंदुत्व म्हणजे समर्पणहिंदुत्व म्हणजे सर्वसमावेशक समर्पणाची भावना आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा हा विचार आचरणात आणण्याची आवश्यकता आहे. जो सर्वांना बरोबर घेऊन चालेल तोच जगावर वर्चस्व राखू शकतो. आम्ही कोण तर आम्ही अमुकअमुक आहोत ही समरतसेची भावना नाही तर सर्वांबरोबर घेण्याचा विचार आहे. समरतेविषयी आज कुणीही बोलू शकतो. परंतु समरसता ही आचरणातून अंमलात आणण्याची आवश्यकता असल्याचे भय्याजी जोशी म्हणाले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकliteratureसाहित्यRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ