शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

भाषा, प्रांतवाद ही संकुचित भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 01:03 IST

समरसता, सेवा आणि हिंंदुत्व हा व्यापक संघ विचार असून भाषा, प्रांतवाद ही संकुचित भावना आहे. समरसता म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा विचार असल्याने अल्प आणि बहुमताच्या संख्येचा विचार करणे चुकीचे आहे. सर्वांना बरोबर घेऊन चाललो तरच जगावर वर्चस्व राखता येऊ शकेल, असे प्रतिपादन राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले.

ठळक मुद्देभय्याजी जोशी : अहिरे स्मृतिग्रंथ प्रकाशन सोहळ्यात प्रतिपादन

नाशिक : समरसता, सेवा आणि हिंंदुत्व हा व्यापक संघ विचार असून भाषा, प्रांतवाद ही संकुचित भावना आहे. समरसता म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा विचार असल्याने अल्प आणि बहुमताच्या संख्येचा विचार करणे चुकीचे आहे. सर्वांना बरोबर घेऊन चाललो तरच जगावर वर्चस्व राखता येऊ शकेल, असे प्रतिपादन राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले.गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात कै. बाळासाहेब अहिरे स्मृतिग्रंथ प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, निशिकांत अहेर, नानासाहेब जाधव, स्मृतिग्रंथ समितीचे कैलासनाना साळुंखे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कै. बाळासाहेब अहिरे स्मृतिग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जोशी म्हणाले, संघाचा विचार हा सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा आहे.भाषा, प्रांतवाद समाजाला संकुचित करीत असल्यामुळे समाजातील ही विषमता दूर करण्याचे काम संघ समरसतेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाषा, प्रांत हा काही अल्प आणि बहुमताचा विषय नाही तर समरसता आचरणाचा विषय असल्याचे जोशी म्हणाले. हिंदुत्व हे एक सत्य असल्यामुळे सत्य सिद्ध करण्याला बहुमत लागत नाही. त्यामुळे धर्मांतरीत करून हिंदूंची संख्या वाढविण्याची गरज नसल्याचे विधानही त्यांनी केले.हिंदुत्व ही समर्पण आणि समरसता असून हा विचार संघाच्या असंख्य ज्येष्ठांनी रूजविला आहे. त्याच पाऊलखुणांवर संघाची पुढची पिढी साधना करीत आहे. आपसातील मतभेद विसरून उभे राहिलो तरच आपण जगात स्थान निर्माण करू शकतो, असा पुनरुच्चार करताना जोशी यांनी प्राचीन काळापासून चालत आलेल्या हिंदुत्व विचाराचे पोषण राष्टÑीय स्वयंसेवक संघ करीत असल्याचे सांगितले. हिंदुत्व विचाराचे आणि चिंतनाचे पोषण झाले नाही तर हा विचारच दुर्बल होऊन जाईल, असेही ते म्हणाले.हिंदुत्व म्हणजे समर्पणहिंदुत्व म्हणजे सर्वसमावेशक समर्पणाची भावना आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा हा विचार आचरणात आणण्याची आवश्यकता आहे. जो सर्वांना बरोबर घेऊन चालेल तोच जगावर वर्चस्व राखू शकतो. आम्ही कोण तर आम्ही अमुकअमुक आहोत ही समरतसेची भावना नाही तर सर्वांबरोबर घेण्याचा विचार आहे. समरतेविषयी आज कुणीही बोलू शकतो. परंतु समरसता ही आचरणातून अंमलात आणण्याची आवश्यकता असल्याचे भय्याजी जोशी म्हणाले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकliteratureसाहित्यRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ