शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

भाषा, प्रांतवाद ही संकुचित भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 01:03 IST

समरसता, सेवा आणि हिंंदुत्व हा व्यापक संघ विचार असून भाषा, प्रांतवाद ही संकुचित भावना आहे. समरसता म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा विचार असल्याने अल्प आणि बहुमताच्या संख्येचा विचार करणे चुकीचे आहे. सर्वांना बरोबर घेऊन चाललो तरच जगावर वर्चस्व राखता येऊ शकेल, असे प्रतिपादन राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले.

ठळक मुद्देभय्याजी जोशी : अहिरे स्मृतिग्रंथ प्रकाशन सोहळ्यात प्रतिपादन

नाशिक : समरसता, सेवा आणि हिंंदुत्व हा व्यापक संघ विचार असून भाषा, प्रांतवाद ही संकुचित भावना आहे. समरसता म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा विचार असल्याने अल्प आणि बहुमताच्या संख्येचा विचार करणे चुकीचे आहे. सर्वांना बरोबर घेऊन चाललो तरच जगावर वर्चस्व राखता येऊ शकेल, असे प्रतिपादन राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले.गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात कै. बाळासाहेब अहिरे स्मृतिग्रंथ प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, निशिकांत अहेर, नानासाहेब जाधव, स्मृतिग्रंथ समितीचे कैलासनाना साळुंखे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कै. बाळासाहेब अहिरे स्मृतिग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जोशी म्हणाले, संघाचा विचार हा सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा आहे.भाषा, प्रांतवाद समाजाला संकुचित करीत असल्यामुळे समाजातील ही विषमता दूर करण्याचे काम संघ समरसतेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाषा, प्रांत हा काही अल्प आणि बहुमताचा विषय नाही तर समरसता आचरणाचा विषय असल्याचे जोशी म्हणाले. हिंदुत्व हे एक सत्य असल्यामुळे सत्य सिद्ध करण्याला बहुमत लागत नाही. त्यामुळे धर्मांतरीत करून हिंदूंची संख्या वाढविण्याची गरज नसल्याचे विधानही त्यांनी केले.हिंदुत्व ही समर्पण आणि समरसता असून हा विचार संघाच्या असंख्य ज्येष्ठांनी रूजविला आहे. त्याच पाऊलखुणांवर संघाची पुढची पिढी साधना करीत आहे. आपसातील मतभेद विसरून उभे राहिलो तरच आपण जगात स्थान निर्माण करू शकतो, असा पुनरुच्चार करताना जोशी यांनी प्राचीन काळापासून चालत आलेल्या हिंदुत्व विचाराचे पोषण राष्टÑीय स्वयंसेवक संघ करीत असल्याचे सांगितले. हिंदुत्व विचाराचे आणि चिंतनाचे पोषण झाले नाही तर हा विचारच दुर्बल होऊन जाईल, असेही ते म्हणाले.हिंदुत्व म्हणजे समर्पणहिंदुत्व म्हणजे सर्वसमावेशक समर्पणाची भावना आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा हा विचार आचरणात आणण्याची आवश्यकता आहे. जो सर्वांना बरोबर घेऊन चालेल तोच जगावर वर्चस्व राखू शकतो. आम्ही कोण तर आम्ही अमुकअमुक आहोत ही समरतसेची भावना नाही तर सर्वांबरोबर घेण्याचा विचार आहे. समरतेविषयी आज कुणीही बोलू शकतो. परंतु समरसता ही आचरणातून अंमलात आणण्याची आवश्यकता असल्याचे भय्याजी जोशी म्हणाले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकliteratureसाहित्यRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ