शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

आश्रमशाळांच्या जमिनी आदिवासी विभागाच्या नावावर करणार; अनलॉक लर्निंगही सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 02:24 IST

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत खावटी अनुदान वाटप केले जाते. त्यादृष्टीने सर्वेक्षणाचे कामकाज सुरू असून, त्यासाठीचे अर्ज भरून घेण्यात आले आहेत. 

संजय दुनबळे नाशिक : आश्रमशाळांच्या जमिनी आदिवासी विभागाच्या नावावर करण्याचा संकल्प आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी सोडला आहे. त्यांनी नुकताच आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. मंत्रालय स्तरावर काम करण्याचा अनुभव असलेल्या सोनवणे यांनी आपल्या कार्यकाळात विविध कामे पूर्ण करण्याचा विश्वास ‘लोकमत’शी साधलेल्या संवादात व्यक्त केला. 

राज्यातील आदिवासी बांधवांना खावटी कर्ज केव्हा मिळणार ? महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत खावटी अनुदान वाटप केले जाते. त्यादृष्टीने सर्वेक्षणाचे कामकाज सुरू असून, त्यासाठीचे अर्ज भरून घेण्यात आले आहेत.  त्याची छाननी करून लवकरात लवकर साहित्य खरेदी करून त्याच्या वाटपास सुरुवात होईल. राज्य शासनाने ११ लाख ५५ हजार लाभार्थ्याना मंजुरी  दिली आहे. त्यात थोडीफार वाढ होऊ शकते. या योजनेत आदिम जमाती, भूमिहीन यांच्याबरोबरच शहरी भागात राहणाऱ्या आदिवासींनाही लाभ देण्यात येणार आहे. 

आपण कोणत्या कामाला प्राधान्य देणार आहात ? राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा, वसतिगृह आहेत. काही ठिकाणी या इमारती ज्या जागेवर उभ्या आहेत त्या जागेच्या सातबारा उताऱ्यावर आदिवासी विभागाची कोणतीही नोंद नाही. या जागा काही ठिकाणी दान दिल्या आहेत तर काही बक्षीसपत्र करून दिल्या आहेत. या सर्व जागांचे कागदपत्र जमा करून त्याची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यास  प्राधान्य देणार आहे. संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. ही कामे जिल्हास्तरावर केली जातील. काही कामांमध्ये आयुक्तालयाची मदत लागल्यास त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल. अधिकाधिक जमिनींवर आदिवासी विभागाची नोंद करण्याचे उद्दिष्ट आहे. अनेक आश्रमशाळांना संरक्षक भिंती नाहीत, त्या बांधण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. याशिवाय काही ठिकाणी भाडेतत्त्वावरील इमारतीत वसतिगृह सुरू आहेत. तेथे जिल्हाधिकाऱ्यांकडे जागेची मागणी करून आदिवासी विभागाच्या मालकीची वसतिगृह बांधण्याचे कामही हाती घेण्यात येणार आहे.

मुख्याध्यापकांना खरेदीचे अधिकारआश्रमशाळा सुरू होत असताना आता आरोग्य दक्षतेबाबत काळजी घ्यावी लागणार आहे. सॅनिटाझयर, ऑक्सिमीटर, थर्मल गन असे सर्व साहित्य खरेदीचा अधिकार केंद्रीय स्तरावर न ठेवता स्थानिक पातळीवर देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही सोनवणे यांंनी सांगितले.

अनलॉक लर्निंगही सुरू राहणार

  • राज्य शासनाच्या निर्देशानुसार आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेण्याबाबत दक्षता घेण्यात येणार आहे. 
  • शाळेत येऊ न शकणाऱ्या मुलांसाठी अनलॉक लर्निंगचा उपक्रम सुरूच राहणार असून, संबंधित शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या गावांना भेटी देऊन त्यांच्या अडीअडचणींचे निराकरण करण्यावर भर असेल, असे त्यांनी सांगितले.