शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

लेंडेझरी वनपरिक्षेत्रात गैरव्यवहार ?

By admin | Updated: October 26, 2016 01:00 IST

लेंडेझरी वनपरिक्षेत्रातील विविध कामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची माहिती आहे.

गंगापूर : येथे आपल्या विविध मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने काढण्यात आलेला मूक मोर्चा शांततेत पार पडला. जिल्हाभरातून आलेले पुरुष, महिला, ज्येष्ठ नागरिक, मुले, मुलींच्या सहभागामुळे गंगापुरातील सर्वच रस्ते गर्दीने फुलून गेले होते.कोपर्डी प्रकरण जलदगती चालवून सहा महिन्यांच्या आत आरोपींना शिक्षा द्यावी, मराठा समाजाला तात्काळ आरक्षण मिळावे, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होऊ नये यासाठी तात्काळ या कायद्यात बदल करण्यात यावा, विद्यार्थ्यांना ईबीसी सवलत मिळवण्यासाठी घालण्यात आलेली ६० टक्के गुणाची अट काढून विनाअट ईबीसी सवलत देण्यात यावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू कराव्यात, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचे स्मारक २०१७ अखेरपर्यंत पूर्ण करावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.या मोर्चात प्रेरणा पाटील, भाग्यश्री नरोडे, सुधा गावंडे, नम्रता देशमुख, शुभांगी देशमुख, तारा झिम्मन, भाग्यश्री यादव या तरुणींनी मनोगत व्यक्त केले. जि.प. शाळेच्या मैदानावरून सुरुवात झालेल्या या मोर्चात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ यांची वेशभूषा केलेल्या लहान मुलांनी सर्वांचे लक्ष वेधले. छत्रपती शिवाजी महाराज चौक, गणेश मंदिर, मारुती चौक, तीनकोनी, राजीव गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकामार्गे तहसील कार्यालयात या मोर्चाची सांगता झाली. गंगापूर शहरासह मोर्चा निघालेल्या मार्गावर मोठमोठे फलक, झेंडे, लाऊडस्पीकर यंत्रणा, ड्रोन कॅमेरे, वॉकीटॉकीसह पोलीस यंत्रणा, वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका, सर्व खबरदारीच्या उपाययोजना संयोजकांतर्फे करण्यात आल्या होत्या. मोर्चामध्ये तालुक्यातील सर्व पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावली; मात्र व्यासपीठावर केवळ निवेदन देणाऱ्या तरुणींनीच संचलन केले. मोर्चा आटोपताच स्वयंसेवकांनी शहरातील मोर्चाच्या मार्गात स्वच्छता मोहीम राबविली. विशेष म्हणजे या मोर्चात अमन सोशल फाऊंडेशन, व्यापारी महासंघ, आझाद हिंद मंडळ, नाभिक महासंघ, पंचायत नुरानी ग्रुप, ब्राह्मण महासंघाने मोर्चात सहभागी नागरिकांसाठी पाणी व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.