शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

भूमिअभिलेखतर्फे जमिनी वाटपाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 00:31 IST

जमिनीचे वाढते मूल्य, मोठे कुटुंब विभक्त झाल्याने होणारे जमिनीचे वाटप यामुळे अनेक शेतकरी नेहमीच तहसीलदारांच्या अर्धन्यायिक न्यायालयात दावे दाखल करतात. यासह जमिनीच्या वाटपाचे आपसातील दस्त तालुक्याच्या दुय्यम निबंधकांकडे नोंदवतात. मात्र या दोन्ही पद्धतींमध्ये सदोषता असल्याने वाटप झालेल्या जमिनीचा नकाशा आणि हद्दीखुणा अंतिम होत नाही. यामुळे शेतीचे वाद वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर भूमिअभिलेख कार्यालयाकडून जमीन वाटपाबाबत दूरगामी निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देदौंडत गावची निवड : वाद कमी होण्यास मदत होणार

भास्कर सोनवणे।घोटी : जमिनीचे वाढते मूल्य, मोठे कुटुंब विभक्त झाल्याने होणारे जमिनीचे वाटप यामुळे अनेक शेतकरी नेहमीच तहसीलदारांच्या अर्धन्यायिक न्यायालयात दावे दाखल करतात. यासह जमिनीच्या वाटपाचे आपसातील दस्त तालुक्याच्या दुय्यम निबंधकांकडे नोंदवतात. मात्र या दोन्ही पद्धतींमध्ये सदोषता असल्याने वाटप झालेल्या जमिनीचा नकाशा आणि हद्दीखुणा अंतिम होत नाही. यामुळे शेतीचे वाद वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर भूमिअभिलेख कार्यालयाकडून जमीन वाटपाबाबत दूरगामी निर्णय घेण्यात आला आहे.वाट्याला येणारी प्रत्यक्ष जमीन आणि तिचे तंतोतंत मोजमाप करून सहमतीने अत्यंत सुलभ प्रक्रियेद्वारे आणि अत्यल्प खर्चात शेतकऱ्यांचे काम होणार आहे. भूमिअभिलेख कार्यालयामार्फत हे महत्त्वपूर्ण काम होणार असल्याने जमिनीचे वाद कमी होणार आहेत. या योजनेअंतर्गत इगतपुरी तालुक्यातील दौंडत या गावाची निवड करण्यात आली असून, जनजागृती सुरू केल्याची माहिती उपअधीक्षक दत्तात्रय वाघ, मुख्यालय सहायक मिलिंद जगताप यांनी दिली.तहसीलदारांकडे जमिनीचे वाटप करताना सर्व हिस्सेदारांना समान प्रमाणात जमीन येण्यासाठी मोजणी केली जात असली तरी आपसातील ठरावाप्रमाणे तहसीलदार साधक बाधक पद्धतीने निर्णय घेतात. हे वाटप करताना कुटुंबातील कोणाचीही हरकत नसली तरच जमिनीची विभागणी करून, सातबारा उताºयावर नोंदणी करताना हिस्सेदारापुढे त्याचे क्षेत्र नमूद केले जाते. पुढे वाटपाने मिळालेली जमीन नेमकी कोणती, त्याच्या सीमा कोणत्या आदींमुळे शेतकऱ्यांत वाद उभे राहतात. नोंदणी कार्यालयाकडे केलेल्या वाटपातसुद्धा याच अडचणी आणि मोठा खर्च सोसावा लागतो. अनेक कुटुंबांची ही अडचण लक्षात घेऊन भूमिअभिलेख विभागाने ही प्रक्रिया सोपी केली आहे. यानुसार कुटुंबातील सर्व नातेवाइकांची सहमती असल्यास/नसल्यास त्यांनी सर्वांच्या सह्या घेऊन अर्ज, कोणाला कोणत्या दिशेचा हिस्सा हवा आहे, याचा कच्चा नकाशा द्यावा लागेल. त्या नकाशावरून जमिनींची वाटणी केली जाईल. यातून पोटहिस्सा वाटपाची समस्या सुटणार आहे. इगतपुरीचे उपअधीक्षक भूमिअभिलेख दत्तात्रय वाघ, मुख्यालय सहायक मिलिंद जगताप यांनी सांगितले की, इगतपुरी तालुक्यातील दौंडत या गावाची या प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे. प्रत्यक्ष मोजणी न करता, नाममात्र साधे शुल्क आकारून असा हिस्सा तत्काळ दुरुस्त करण्यासाठी जागृती सुरू केली आहे. या अभिनव योजनेनुसार नागरिकांना आपला पोटहिस्सा नकाशा अद्ययावत करणे, दुरुस्ती करणे नाममात्र खर्चात सुलभ होणार आहे. दौंडत येथे या योजनेसाठी शनिवारी (दि. ७) सकाळी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. भूमिअभिलेख कार्यालयाचे अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :landslidesभूस्खलन