शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
2
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
3
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
4
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
5
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
6
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
7
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
8
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
9
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
10
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
11
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
12
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
13
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
14
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
15
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
16
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
17
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
18
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
19
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
20
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर

इच्छाशक्तीचा अभाव, विकासावर घाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 00:49 IST

नाशिक : रतन इंडियाच्या वीज प्रकल्पाचा ताबा पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने घेतल्याने अडचणीत आलेल्या या कंपनीमुळे सिन्नरमधील या मोठ्या प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी आहे. राज्य सरकारच्या उदासीन भूमिकेमुळे हा दुर्धर प्रसंग ओढावला आहे. इतकेच नव्हे तर कंपनीला नाशिकमधील कार्यालयदेखील बंद करण्याची नामुष्की आली आहे.

ठळक मुद्देराजकीय अनास्था नडली : तीन कंपन्यांचे करार; प्रत्यक्षात एकच सुरू

संजय पाठक ।नाशिक : रतन इंडियाच्या वीज प्रकल्पाचा ताबा पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने घेतल्याने अडचणीत आलेल्या या कंपनीमुळे सिन्नरमधील या मोठ्या प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी आहे. राज्य सरकारच्या उदासीन भूमिकेमुळे हा दुर्धर प्रसंग ओढावला आहे. इतकेच नव्हे तर कंपनीला नाशिकमधील कार्यालयदेखील बंद करण्याची नामुष्की आली आहे.गुळवंच आणि मुसळगाव या गावांमधील अडीच हजार हेक्टर क्षेत्रात साकारण्यात आलेला सेझ सुरुवातीला इंडिया बुल्स नावाने होता नंतर कंपनी वेगळी झाल्यानंतर तो रतन इंडिया नावाने ओळखला जाऊ लागला. रतन इंडिया कंपनीने २००९ पासून मोठ्या मेहनतीने हा प्रकल्प सादर केला. हा प्रकल्प साकरताना सुरुवातीला अनंत अडचणी आल्या. नाशिक महापालिकेकडून प्रक्रियायुक्त मलजल पुरवण्यासाठी मागितलेली रक्कम, त्यानंतर पाटबंधारे खात्याने आपल्याकडूनच पाणीपुरवठा करण्याची केलेली तयारी यानंतर १९० दशलक्ष लिटर्स पाणी घेण्याचा करार करण्यात आला. औष्णिक वीज प्रकल्पातून कोळसा थेट सेझमध्ये पुरवण्यासाठी २८ किलोमीटरची रेल्वेलाइन टाकण्यास विरोध झाला. त्यानंतर आता ८० टक्के भूसंपादन झाले असून, अवघे २० टक्के क्षेत्र बाकी आहे. तरीही कंपनीने हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी वेळ न घालविता चाचणीसाठी रस्त्याने ट्रकद्वारे कोळसा आणून चाचणी घेतली. याशिवाय कंपनीतील वाद, युनियन बाजी या सर्वांवर मात करून हा प्रकल्प उभारण्यात आला. परंतु सरकारकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य अथवा उद्योगस्नेही वातावरण म्हणून या कंपनीकडे बघितले गेले नाही. मेक इन महाराष्टÑसारखे इव्हेंट होत असताना या प्रकल्पाकडे लक्ष देण्यास अथवा उद्योगांना आमंत्रित करण्याकडे सरकारी यंत्रणेने स्वारस्य दाखविले नसल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीने २०१४ मध्ये चाचणी झाल्यानंतर या ठिकाणी उद्योजकांना निमंत्रित करण्यासाठी एक्स्प्रेस इन हॉटेलमध्ये एक बैठक घेतली होती. यावेळी सेझमध्ये असलेले प्लॉट तेथील सुविधा आणि अन्य अनेक फायदे सांगण्यात आले होते. त्यानंतर पाच ते सहा कंपन्यानी याठिकाणी येण्यास स्वारस्य दाखवले. परंतु त्यातील कोसो इंडिया, ए. एम. क्रॉप आणि आयटीसीएल या तीन कंपन्यांनी रतन इंडियाशी करार केला. त्यातही सद्य: स्थितीत आयटीसीएल ही एकमेव आयटी कंपनी सध्या सुरू आहे. परंतु या व्यतिरिक्त ना राज्यसरकारकडून प्रोत्साहन ना स्थानिक राजकीय व्यक्तींचे स्वारस्य अशी अवस्था असल्याने या ठिकाणी उद्योग वाढावे, असे प्रयत्नही झाले नाहीत. नाशिकमधील निमासारख्या उद्योग संस्थांनी आणि काही वर्षांपूर्वी एमआयडीसीच्या तत्कालीन प्रादेशिक अधिकाऱ्यांनी येथे उद्योग येण्यासाठी केलेले प्रयत्न वगळता कोणीही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे शेकडो हाताना रोजगार देऊ शकणाºया सेझची अवस्था बिकट झाली आहे. 

जॉन डियर कंपनीही माघारीनाशिकच्या सेझमध्ये उद्योग यावेत यासाठी सुरुवातीला काही प्रमाणात प्रयत्न झाले तेव्हा जॉन डियर या बड्या कंपनीच्या अधिकाºयांनी येथे भेट दिली होती. त्यानंतर चिनी कौन्सिलेटच्या शिष्टमंडळानेदेखील एकदा निमाच्या मध्यस्थीनंतर याच सेझमध्ये भेट देऊन उद्योग सुरू करण्याची इच्छा दर्शविली होती. मात्र त्यानंतर पाठपुरावा झाला नाही. त्यामुळे जॉन डियर कंपनीने पाठ फिरवली.

कंपनीचे नाशिकमधील कार्यालय बंदरतन इंडियाचे मुंबई नाका येथे असलेले भाड्याचे कार्यालय बंद करण्यात आले आहे. दीड लाख रुपये भाडे मोजून कंपनीने हे कार्यालय घेतले होते. परंतु ते बंद करण्यात आले आहे. सध्या कंपनीच्या अधिकाºयांसाठी असलेल्या गेस्ट हाउसमधून कार्यालय सुरू असल्याचे समजते.