शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

लाखो लिटर पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 23:53 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या भोजापूर धरणाचे आवर्तन अंतिम टप्प्यात येताच माळवाडीला प्रवाही पद्धतीने आवर्तन देण्याच्या प्रयत्नात शेकडो लिटर पाण्याची नासाडी झाली. चारीची क्षमता विचारात न घेतल्याने डाव्या कालव्याला तीन ठिकणी भराव्यावरून पाणी वाहून गेले आहे. अधिकाºयांच्या पाठबळाने हा प्रकार झाल्याचा आरोप दोडीच्या पाणी वापर संस्था पदाधिकाºयांनी केला आहे. तर अधिकाºयांनी आरोपांचे खंडन करताना थेट उत्तर देण्याचे टाळले आहे.

ठळक मुद्देनांदूरशिंगोटे : चारीची क्षमता लक्षात न घेता प्रवाह पद्धतीने पाणी सोडलेडाव्या कालव्याला तीन ठिकणी भराव्यावरून पाणी वाहून गेले

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या भोजापूर धरणाचे आवर्तन अंतिम टप्प्यात येताच माळवाडीला प्रवाही पद्धतीने आवर्तन देण्याच्या प्रयत्नात शेकडो लिटर पाण्याची नासाडी झाली. चारीची क्षमता विचारात न घेतल्याने डाव्या कालव्याला तीन ठिकणी भराव्यावरून पाणी वाहून गेले आहे. अधिकाºयांच्या पाठबळाने हा प्रकार झाल्याचा आरोप दोडीच्या पाणी वापर संस्था पदाधिकाºयांनी केला आहे. तर अधिकाºयांनी आरोपांचे खंडन करताना थेट उत्तर देण्याचे टाळले आहे.दोडी शिवारात सोमवारी रात्री ९ ला जेसीबीच्या सहाय्याने डाव्या कालव्यावरील चारी क्र मांक १ , २, व ३ चे पाणी बंद करण्यात आले. प्रवाही पध्दतीने पाणी देण्याचे ठरलेले नसताना चारी क्र मांक ४ मधून क्षमतेपेक्षा अधिक पाणी माळवाडीच्या दिशेने सोडण्यात आले.रात्री अंधारात घडलेला प्रकार पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आला. पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी गणपत केदार, के. पी. आव्हाड, विष्णू साबळे, शंकर केदार, रामनाथ आव्हाड, रोहीत आव्हाड, शरद केदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. क्षमतेपेक्षा जास्त पाणी प्रवाहीत केल्याने चारीतून दोन्ही बाजूला पाणी उफाळून शेतात साचले. त्यामुळे शेतकºयांच्या पिकांचेही नुकसान झाले आहे. पाणी उफाळून भराव्याची माती वाहून गेल्याने तीन ठिकाणी माती खचली आहे.डाव्या कालव्यावरील पाच पाणी वापर संस्थांना लागणारे पाणी पूर्ण झाले होते. धरणातील उरलेल्या सिंचन पाण्याचे दुसºया आवर्तनासाठी नियोजन सुरु होते. त्यातच प्रवाही पाणी देण्याचा बेकायदा प्रकार घडल्याने शेतकºयांनी संताप व्यक्त केला आहे. कारभारी शिंदे, भागवत घुगे, पाराजी शिंदे, शंकरराव केदार, सोपान आव्हाड, रामनाथ आव्हाड, शरद केदार, रमेश उगले आदींनी क्षेत्राबाहेर पाणी विकण्याचा आरोप अधिकाºयांवर केला आहे. गैरप्रकार बंद न झाल्यास पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी राजीनामे देणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.धरणात सिंचनाचे ३ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक होते. पाणी वापर संस्थांचा कोटा पूर्ण झाला आहे. त्यामुळे प्रवाही पध्दतीने पाणी सोडले होते. सिंचनाचे पाणी बंद केले आहे.- एस. एस. गोंदकर, उपअभियंता, पाटबंधारे विभाग सिंचनासाठी नसलेल्या ठिकाणी पाणी सोडण्यात आले. हा प्रकार अधिकाºयांच्या संगमताने झाला असून पाण्याची विक्र ी करण्यात आली. समितीच्या बैठकीत प्रवाही पाणी देण्याबाबत काहीही ठरले नव्हते. पाणी नासाडी संदर्भात जिल्हाधिकारी, आमदार, पाटबंधारे विभाग यांना निवेदन देणार आहे.- गणपत केदार, अध्यक्ष, रेणुका पाणी वापर संस्था दोडी.