शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

लाखो लिटर पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 23:53 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या भोजापूर धरणाचे आवर्तन अंतिम टप्प्यात येताच माळवाडीला प्रवाही पद्धतीने आवर्तन देण्याच्या प्रयत्नात शेकडो लिटर पाण्याची नासाडी झाली. चारीची क्षमता विचारात न घेतल्याने डाव्या कालव्याला तीन ठिकणी भराव्यावरून पाणी वाहून गेले आहे. अधिकाºयांच्या पाठबळाने हा प्रकार झाल्याचा आरोप दोडीच्या पाणी वापर संस्था पदाधिकाºयांनी केला आहे. तर अधिकाºयांनी आरोपांचे खंडन करताना थेट उत्तर देण्याचे टाळले आहे.

ठळक मुद्देनांदूरशिंगोटे : चारीची क्षमता लक्षात न घेता प्रवाह पद्धतीने पाणी सोडलेडाव्या कालव्याला तीन ठिकणी भराव्यावरून पाणी वाहून गेले

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या भोजापूर धरणाचे आवर्तन अंतिम टप्प्यात येताच माळवाडीला प्रवाही पद्धतीने आवर्तन देण्याच्या प्रयत्नात शेकडो लिटर पाण्याची नासाडी झाली. चारीची क्षमता विचारात न घेतल्याने डाव्या कालव्याला तीन ठिकणी भराव्यावरून पाणी वाहून गेले आहे. अधिकाºयांच्या पाठबळाने हा प्रकार झाल्याचा आरोप दोडीच्या पाणी वापर संस्था पदाधिकाºयांनी केला आहे. तर अधिकाºयांनी आरोपांचे खंडन करताना थेट उत्तर देण्याचे टाळले आहे.दोडी शिवारात सोमवारी रात्री ९ ला जेसीबीच्या सहाय्याने डाव्या कालव्यावरील चारी क्र मांक १ , २, व ३ चे पाणी बंद करण्यात आले. प्रवाही पध्दतीने पाणी देण्याचे ठरलेले नसताना चारी क्र मांक ४ मधून क्षमतेपेक्षा अधिक पाणी माळवाडीच्या दिशेने सोडण्यात आले.रात्री अंधारात घडलेला प्रकार पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आला. पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी गणपत केदार, के. पी. आव्हाड, विष्णू साबळे, शंकर केदार, रामनाथ आव्हाड, रोहीत आव्हाड, शरद केदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. क्षमतेपेक्षा जास्त पाणी प्रवाहीत केल्याने चारीतून दोन्ही बाजूला पाणी उफाळून शेतात साचले. त्यामुळे शेतकºयांच्या पिकांचेही नुकसान झाले आहे. पाणी उफाळून भराव्याची माती वाहून गेल्याने तीन ठिकाणी माती खचली आहे.डाव्या कालव्यावरील पाच पाणी वापर संस्थांना लागणारे पाणी पूर्ण झाले होते. धरणातील उरलेल्या सिंचन पाण्याचे दुसºया आवर्तनासाठी नियोजन सुरु होते. त्यातच प्रवाही पाणी देण्याचा बेकायदा प्रकार घडल्याने शेतकºयांनी संताप व्यक्त केला आहे. कारभारी शिंदे, भागवत घुगे, पाराजी शिंदे, शंकरराव केदार, सोपान आव्हाड, रामनाथ आव्हाड, शरद केदार, रमेश उगले आदींनी क्षेत्राबाहेर पाणी विकण्याचा आरोप अधिकाºयांवर केला आहे. गैरप्रकार बंद न झाल्यास पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी राजीनामे देणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.धरणात सिंचनाचे ३ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक होते. पाणी वापर संस्थांचा कोटा पूर्ण झाला आहे. त्यामुळे प्रवाही पध्दतीने पाणी सोडले होते. सिंचनाचे पाणी बंद केले आहे.- एस. एस. गोंदकर, उपअभियंता, पाटबंधारे विभाग सिंचनासाठी नसलेल्या ठिकाणी पाणी सोडण्यात आले. हा प्रकार अधिकाºयांच्या संगमताने झाला असून पाण्याची विक्र ी करण्यात आली. समितीच्या बैठकीत प्रवाही पाणी देण्याबाबत काहीही ठरले नव्हते. पाणी नासाडी संदर्भात जिल्हाधिकारी, आमदार, पाटबंधारे विभाग यांना निवेदन देणार आहे.- गणपत केदार, अध्यक्ष, रेणुका पाणी वापर संस्था दोडी.