शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

द्राक्ष बागेवर चालवली कुऱ्हाड

By admin | Updated: March 8, 2016 22:40 IST

द्राक्ष बागेवर चालवली कुऱ्हाड

आंबेगाव : येवल्यातील विहिरी कोरड्याठाकपाटोदा : यावर्षीच्या भीषण दुष्काळाचा फटका पाटोदा परिसरातील निर्यातक्षम द्राक्ष व डाळींबबागांनाही बसला असून, द्राक्षबाग जोपासण्यासाठी येथील शेतकऱ्यांची कसरत सुरू आहे. मात्र पाण्याचा मेळ बसत नसल्याने आंबेगाव येथील शेतकरी विठ्ठल दत्तू सानप यांनी आपल्या पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळलेली सुमारे आठ एकर द्राक्षबाग मजुरांकरवी तोडून टाकली आहे.येवला तालुक्यात दुष्काळ परिस्थिती यंदा निर्माण झाली असून, अभूतपूर्व तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने माणसांनाच पिण्यास पाणी मिळत नसल्याने पोटच्या मुला-बाळांप्रमाणे जीव लावून जगविलेल्या द्राक्षबागेला कुठून पाणी द्यावे या विवंचनेत असलेल्या या शेतकऱ्याने आपल्या बागेवर कुऱ्हाड चालविली आहे.पाटोदा परिसरात सुमारे तीन हजार हेक्टरवर द्राक्ष व डाळींबबागा आहेत. दरवर्षी पर्जन्यमान कमी कमी होत चालल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. परिसरातील विहिरींनी केव्हाच तळ गाठला आहे. नगदी पीक म्हणून जोपासलेल्या या बागांना पाणीटंचाईची झळ बसली आहे. जनावरांना तर पाणी मिळणे मुश्किल होऊन बसले आहे. चाऱ्याचाही प्रश्न आहे.यावर्षी पिकांना पोषक हवामान असल्याने पीकही चांगले आहे. शेकडो हेक्टरवरील द्राक्षबागांचा खुडा झाला असून, उर्वरित बागांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. त्यातच दरम्यानच्या काळात परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने अनेक द्राक्षबागातील द्राक्ष मण्यांना तडे गेल्याने उत्पादक शेतकरी चिंतित आहेत. (वार्ताहर)