शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकमध्ये कोव्हीडचा कहर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 00:54 IST

त्र्यंबकेश्वर : मार्च ते जुलै २०२० पेक्षा मार्च २१ हा महिना कोरोना कोव्हीड १९ च्या बाबतीत अधिक चिंताजनक बनला असल्याचे दृश्य बुधवारी त्र्यंबकेश्वरची कोव्हीड विषयक परिस्थितीचे अवलोकन करतांना दिसते. विशेष म्हणजे संपुर्ण त्र्यंबक तालुका व केवळ नगरपरिषद हद्दीतील एकुण रुग्णसंख्येच्या आकडेवारीत स्पर्धा सुरु आहे.

ठळक मुद्दे१६५ पॉझिटिव्ह : आजपासून ह्यमोतीवालाह्ण ची टीम त्र्यंबकेश्वरमध्ये

त्र्यंबकेश्वर : मार्च ते जुलै २०२० पेक्षा मार्च २१ हा महिना कोरोना कोव्हीड १९ च्या बाबतीत अधिक चिंताजनक बनला असल्याचे दृश्य बुधवारी त्र्यंबकेश्वरची कोव्हीड विषयक परिस्थितीचे अवलोकन करतांना दिसते. विशेष म्हणजे संपुर्ण त्र्यंबक तालुका व केवळ नगरपरिषद हद्दीतील एकुण रुग्णसंख्येच्या आकडेवारीत स्पर्धा सुरु आहे.जिल्हा परिषद हद्दीतील पॉझिटिव्ह रुग्ण ३९२ होते आता ४२७ आहे. तर नगरपरिषद हद्दीतील पॉझिटिव्ह रुग्ण आता ३६२ आहेत.ग्रामीण भागातील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी त्र्यंबकेश्वरच्या घराघरात सर्वेक्षण मोहीम सुरु करुन पॉझिटिव्ह रुग्ण अंजनेरी शिवारात ब्रम्हाव्हॅली नजीक निसर्गाच्या सान्निध्यातील ट्रेकींग विश्राम गृह येथे दाखल करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून तेथे कोव्हीड केअर सेंटर सुरु करण्यात आलेले आहे. इतक्या दिवस जागाच मिळत नव्हती आता येथे दोन मोठे हॉल असुन बुधवारी तेथे ३८ रुग्ण उपचार घेत आहेत.रविवार पासुन गावातर्फे जनता कर्फ्यु आठ दिवस पाळण्यात येत आहे. याशिवाय दर शनीवारी रविवारी जिल्हा प्रशासनाने यापुर्वीच संचारबंदी लागु केलेली आहे. त्यात त्र्यंबकेश्वर मंदीरही बंद ठेवले आहे.सध्या तालुक्यातील रुग्ण संदीप फाउंडेशन येथे डीसीएचसी उपचार केले जातात. शहरातील सर्वसाधारण रुग्ण कोव्हीड केअर सेंटर अंजनेरी येथे ठेवले जात आहे. आता त्र्यंबकमधील रुग्ण संख्या १० ते २० संख्येने वाढत असुन ही बाब चिंताजनक आहे.दरम्यान पालिकेने आता शहराच्या सर्वच भागात सॅनिटायझरची फवारणी सुरु केली आहे. पण कोव्हीडची शृंखला तोडणे गरजेचे आहे. कारण रुग्ण वाढले की त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे स्वॅब घेण्यात येतात. त्र्यंबकेश्वर, हरसुल, अंजनेरी येथील ॲन्टीजेन रॅपिडचे स्वॅब थेट ५०/६० होतात. त्यांच्यातून निम्याहून अधिक पॉझिटिव्ह असतात. ही शृंखला तोडणे गरजेचे आहे.वैद्यकीय अधिक्षक डॉ. मंदाकिनी बर्वे, डॉ. मोतीलाल पाटील, डॉ. भागवत लोंढे, अंजनेरी येथील प्रा. आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा सोनवणे, स्व शहरी ग्रामीण आरोग्य कर्मचारी आदी कोरोना कोव्हीड योध्दे काम करत आहे.शहरात पॉझिटिव्ह रुग्ण वाढण्याचे कारण म्हणजे कोरोनाची लक्षणे संशय आल्यास गावातील सधन परिस्थितीतील रुग्ण थेट नाशिक येथील मोठी हॉस्पिटल गाठतात. तेथे स्वॅब देण्याऐवजी लगेच एमआरआय काढला जातो. आणि लगेच आयसीयुमध्ये दाखल करुन उपचार सुरु करतात. त्यामुळे कोण पॉझिटिव्ह कोण निगेटिव्ह असे कर्मचा-यांना माहित पडत नाही.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरcorona virusकोरोना वायरस बातम्या