शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

कोराटे येथील शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 17:49 IST

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील कोराटे येथील दिगंबर वामन कदम या शेतकऱ्यांने सततच्या नापिकीला तसेच कर्जाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे.

ठळक मुद्देविषारी कीटकनाशकाची बाटली आढळून आली.

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील कोराटे येथील दिगंबर वामन कदम या शेतकऱ्यांने सततच्या नापिकीला तसेच कर्जाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे.दिंडोरी तालुक्यातील गट नंबर ३०८ मध्ये शेतामध्येच वास्तव्यास असलेल्या शेतकरी दिगंबर वामन कदम यांच्या मुलाने सहा महिन्यांपूर्वी द्राक्षबागेत पाच रुपयांनी द्राक्षबाग गेल्यामुळे आत्महत्या केली होती. मात्र असे असले तरी दिगंबर कदम यांच्या आपल्या तीन मुलींचे लग्न यापूर्वीच झाली आहे, तर एक मुलगा दत्तात्रय लष्करी सेवेत गुजरात बॉर्डरवर आहे.कदम यांनी द्राक्षबाग नुकतीच नापिकीमुळे तोडून टाकली आहे. सध्या शेतात कुठल्याही प्रकारचे उत्पन्न नसल्याने मुलगा गेला आपला जगून काही उपयोग नाही, असा विचार ते नेहमी करत होते.मंगळवारी (दि.२४) रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून ते घराबाहेर पडले. रात्रभर घरी न परतल्याने त्यांचा बुधवारी (दि.२५) सकाळी तपास सुरू झाला. या दरम्यान पत्नी सुशीला यांना दिगंबर कदम हे घराजवळच ज्याठिकाणी मुलगा बापू कदम याने आत्महत्या केली होती त्या जागेपासून काही अंतरावर झोपलेल्या स्थितीत दिसले व शेजारी विषारी कीटकनाशकाची बाटली आढळून आली.त्यानंतर त्यांना तात्काळ दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने सकाळी अकराला नाशिक ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान बुधवारी रात्री त्यांचे निधन झाले.विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे त्यांच्यावर साडेतीन लाख रुपये व मध्यवर्ती बँकेचे कर्ज असल्याचे नातेवाइकांकडून सांगण्यात आले.‌ दिगंबर कदम यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा असा परिवार आहे. एकाच घरामध्ये कर्जबाजाराला कंटाळून मुलाचे व वडिलांचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (फोटो २८ दिगंबर कदम)

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिस