शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

ठाणगावला पदाधिकाऱ्यांना कोंडले पाटोदा : पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या ग्रामस्थांचा सरपंच, ग्रामसेवकावर रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:00 IST

पाटोदा : येवला तालुक्यातील ठाणगाव येथे पाणीटंचाईने उग्र रुप धारण केले असून, बाया-बापड्यांना हंडाभर पाण्यासाठी कामधंदा सोडून दिवसभर रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देपदाधिकाºयांना घेराव घालत जाब विचारलापाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन

पाटोदा : येवला तालुक्यातील ठाणगाव येथे पाणीटंचाईने उग्र रुप धारण केले असून, बाया-बापड्यांना हंडाभर पाण्यासाठी कामधंदा सोडून दिवसभर रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.ग्रामपंचायत प्रशासन पाणीटंचाईबाबत गंभीर नसल्याने सोमवारी सकाळी (दि.७) महिला व ग्रामस्थांनी सरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत पदाधिकाºयांना घेराव घालत जाब विचारला. मात्र पदाधिकाºयांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतप्त ग्रामस्थांनी सरपंच सविता शेळके, ग्रामसेवक रावसाहेब वानखेडे, संजय शेळके, रवींद्र शेळके, मारुती नेहरे, समाधान घुसळे, आनंदा शेळके, शिपाई उत्तम पिंपरकर यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून घेत निषेध व्यक्त केला. जोपर्यंत ठोस आश्वासन देऊन पाणीपुरवठा सुरळीत केला जात नाही तोपर्यंत कुलूप न उघडण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. येवल्याचे सहायक गटविकास अधिकारी अन्सार शेख यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ व महिलांनी आंदोलन मागे घेत पदाधिकाºयांची सुटका केली. ग्रामस्थांनी पाणीपुरवठा विहिरीचे काम पूर्ण करावे यासाठी ग्रामपंचायत व ठेकेदारास वारंवार सांगूनही काम केले नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने ग्रामस्थांनी सरपंच सविता शेळके, उपसरपंच कचरू चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य संजय शेळके, मारु ती नेहरे, समाधान घुसळे, ग्रामसेवक रावसाहेब वानखेडे यांच्यासह पदाधिकाºयांना घेराव घालत ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून घेतले. निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने ग्रामसेवक रावसाहेब वानखेडे यांनी सहाय्यक गटविकास अधिकारी अन्सार शेख यांच्याशी फोनवर चर्चा करून मार्ग काढण्यास विनंती केली. शेख यांनी ग्रामस्थांशी याबाबत चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. आश्वासन मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेत पदाधिकाºयांची सुटका केली. या आंदोलनात सिंधूबाई नेहरे, गीताबाई भवर, जया जाधव, केशरबाई खरात, अंजनाबाई पवार, जिजाबाई घुसळे, शकुंतला खुरासाने, ताराबाई वाणी, शोभाबाई जाधव, उज्ज्वला पिंपरकर, अनिता वाणी, मीरा शिंदे, जिजाबाई शेळके, विनता जाधव, परिघाबाई शिरसाठ, रंभाबाई शेळके, स्वाती यादव, अनिता शेळके, मंगला शेळके, अर्चना जाधव, हौशाबाई शेळके, परिघाबाई यादव, मंगल मोरे, सीताबाई शेळके, भगवान नेहरे आदींसह महिला व ग्रामस्थ सहभागी झाले होते.