शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

कोकाटे, हरिश्चंद्र चव्हाणांच्या अर्जांमुळे युतीत अस्वस्थता

By श्याम बागुल | Updated: April 3, 2019 18:21 IST

माणिकराव कोकाटे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. तत्पूर्वी सेना-भाजपाची युती होणार नाही असे गृहीत धरून कोकाटे यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी काही महिन्यांपासूनच सुरू केली होती. परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर युती झाल्याने कोकाटे यांचा

ठळक मुद्देदोन्ही बंडखोर : नामांकन नेल्याने तर्कवितर्कांना उधाण दोहोंनी अर्ज नेल्यामुळे याचाच अर्थ पक्षनेतृत्व त्यांची समजूत काढण्यास अपयशी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : युतीच्या ताब्यात असलेल्या नाशिक व दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांतून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले भाजपाचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण व माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी नामांकन दाखल करण्यासाठी समर्थकांकरवी अर्ज नेल्याने युतीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. या दोहोंनी अर्ज नेल्यामुळे याचाच अर्थ पक्षनेतृत्व त्यांची समजूत काढण्यास अपयशी ठरल्याचा अर्थ काढला जात असून, त्यांची बंडखोरी दोन्ही लोकसभा मतदारसंघांत पक्षाला मारक ठरणार असल्याचे तर्कवितर्क लढविले जात आहेत.

माणिकराव कोकाटे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. तत्पूर्वी सेना-भाजपाची युती होणार नाही असे गृहीत धरून कोकाटे यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी काही महिन्यांपासूनच सुरू केली होती. परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर युती झाल्याने कोकाटे यांचा भ्रमनिरास झाला. सेनेने उमेदवारी नाकारली तर मतदार संघ सेनेच्या वाट्याला गेल्यामुळे कोकाटे यांनी केलेली तयारी वाया जाऊ नये म्हणून लोकसभा निवडणूक लढविण्याचा इरादा जाहीर करून प्रचाराचा नारळही फोडला आहे. सध्या त्यांचा प्रचार सुरू असला तरी, ऐनवेळी पक्ष त्यांची समजूत घालून माघार घेण्यास भाग पाडतील, असे बोलले जात होते. परंतु मंगळवारी कोकाटे यांनी त्यांच्या समर्थकांकरवी नामांकन अर्ज नेला व सदरचा अर्ज भारतीय जनता पक्षासाठी नेल्याची नोंद सरकारी दप्तरात केली आहे. त्यामुळे कोकाटे यांनी बंडखोरी करण्याची पुरेपूर तयारी केल्याचे मानले जात असून, त्यासाठी त्यांनी भाजपाचे नाव घेतल्याने त्यांना पडद्याआड भाजपाची फूस आहे काय असा अर्थ काढला जात आहे. कोकाटे यांची उमेदवारी शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासाठी धोकादायक मानली जात आहे. दुसरीकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या हरिश्चंद्र चव्हाण यांनी पक्षाविरुद्ध भूमिका घेतली असली तरी, अपक्ष उमेदवारी करून कोरड्या विहिरीत उडी घेणार नाही, असे जाहीर केल्याने भाजपाला काहीसे हायसे वाटलेले असताना बुधवारी हरिश्चंद्र चव्हाण व त्यांची पत्नी कलावती या दोघांच्या नावे त्यांचे पुत्र समीर यांनी दिंडोरी मतदारसंघासाठी नामांकन नेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :nashik-pcनाशिकNashikनाशिकPoliticsराजकारणElectionनिवडणूक