शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

कोकाटे यांना राज्यसभा, हरिश्चंद्र चव्हाण यांना विधानसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 01:36 IST

लोकसभा निवडणुकीत नाशिक आणि दिंडोरीमधील बंड शमविण्यासाठी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच लक्ष घातले असून, माणिकराव कोकाटे यांना राज्यसभा आणि हरिश्चंद्र चव्हाण यांना कळवण-सुरगाणा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी देऊ केली आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीत नाशिक आणि दिंडोरीमधील बंड शमविण्यासाठी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच लक्ष घातले असून, माणिकराव कोकाटे यांना राज्यसभा आणि हरिश्चंद्र चव्हाण यांना कळवण-सुरगाणा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी देऊ केली आहे. माघारीचा निर्णय आता उभयतांनाच घ्यायचा असून, त्यावर त्यांचे भाजपातील भवितव्य ठरणार आहे.लोकसभा निवडणुकीसाठी माणिकराव कोकाटे आणि हरिश्चंद्र चव्हाण या दोघांनीही तयारी केली होती. हरिश्चंद्र चव्हाण यांनी तर आपल्या मतदारसंघातून तीन वेळा निवडून येण्याची हॅटट्रिक केली असल्याने विद्यमान खासदार म्हणून त्यांना पुन्हा संधी मिळेल अशी खात्री होती. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांनी राष्ट्रवादीमध्ये शिरकाव करून तिकीट मिळविले, त्यामुळे राष्ट्रवादीकडून संभाव्य उमेदवार असलेल्या भारती पवार यांनी भाजपात प्रवेश करून उमेदवारी मिळविली त्यामुळे हरिश्चंद्र चव्हाण कमालीचे नाराज असून, त्यांनी बंडाचे निशाण फडकविण्याची तयारी दर्शविली आहे.दुसरीकडे भाजपा लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार म्हणून माणिकराव कोकाटे यांनी तयारी केली, पण ऐनवेळी भाजपा शिवसेनेची युती झाल्याने माणिकरावांची अडचण झाली असून, त्यांनीदेखील बंडखोरीची तयारी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे.लोकसभा निवडणूक अटीतटीची होत आहे. अशा वेळी प्रत्येक जागा महत्त्वाची असल्याने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील बंड शमविण्यासाठी प्रयत्न चालविले असून, इच्छुक उमेदवारांना विविध मार्गाने माघार घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपा