शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कोकाटे यांना राज्यसभा, हरिश्चंद्र चव्हाण यांना विधानसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 01:36 IST

लोकसभा निवडणुकीत नाशिक आणि दिंडोरीमधील बंड शमविण्यासाठी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच लक्ष घातले असून, माणिकराव कोकाटे यांना राज्यसभा आणि हरिश्चंद्र चव्हाण यांना कळवण-सुरगाणा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी देऊ केली आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीत नाशिक आणि दिंडोरीमधील बंड शमविण्यासाठी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच लक्ष घातले असून, माणिकराव कोकाटे यांना राज्यसभा आणि हरिश्चंद्र चव्हाण यांना कळवण-सुरगाणा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी देऊ केली आहे. माघारीचा निर्णय आता उभयतांनाच घ्यायचा असून, त्यावर त्यांचे भाजपातील भवितव्य ठरणार आहे.लोकसभा निवडणुकीसाठी माणिकराव कोकाटे आणि हरिश्चंद्र चव्हाण या दोघांनीही तयारी केली होती. हरिश्चंद्र चव्हाण यांनी तर आपल्या मतदारसंघातून तीन वेळा निवडून येण्याची हॅटट्रिक केली असल्याने विद्यमान खासदार म्हणून त्यांना पुन्हा संधी मिळेल अशी खात्री होती. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांनी राष्ट्रवादीमध्ये शिरकाव करून तिकीट मिळविले, त्यामुळे राष्ट्रवादीकडून संभाव्य उमेदवार असलेल्या भारती पवार यांनी भाजपात प्रवेश करून उमेदवारी मिळविली त्यामुळे हरिश्चंद्र चव्हाण कमालीचे नाराज असून, त्यांनी बंडाचे निशाण फडकविण्याची तयारी दर्शविली आहे.दुसरीकडे भाजपा लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार म्हणून माणिकराव कोकाटे यांनी तयारी केली, पण ऐनवेळी भाजपा शिवसेनेची युती झाल्याने माणिकरावांची अडचण झाली असून, त्यांनीदेखील बंडखोरीची तयारी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे.लोकसभा निवडणूक अटीतटीची होत आहे. अशा वेळी प्रत्येक जागा महत्त्वाची असल्याने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील बंड शमविण्यासाठी प्रयत्न चालविले असून, इच्छुक उमेदवारांना विविध मार्गाने माघार घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपा