शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

कोकाटे यांना राज्यसभा, हरिश्चंद्र चव्हाण यांना विधानसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 01:36 IST

लोकसभा निवडणुकीत नाशिक आणि दिंडोरीमधील बंड शमविण्यासाठी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच लक्ष घातले असून, माणिकराव कोकाटे यांना राज्यसभा आणि हरिश्चंद्र चव्हाण यांना कळवण-सुरगाणा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी देऊ केली आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीत नाशिक आणि दिंडोरीमधील बंड शमविण्यासाठी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच लक्ष घातले असून, माणिकराव कोकाटे यांना राज्यसभा आणि हरिश्चंद्र चव्हाण यांना कळवण-सुरगाणा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी देऊ केली आहे. माघारीचा निर्णय आता उभयतांनाच घ्यायचा असून, त्यावर त्यांचे भाजपातील भवितव्य ठरणार आहे.लोकसभा निवडणुकीसाठी माणिकराव कोकाटे आणि हरिश्चंद्र चव्हाण या दोघांनीही तयारी केली होती. हरिश्चंद्र चव्हाण यांनी तर आपल्या मतदारसंघातून तीन वेळा निवडून येण्याची हॅटट्रिक केली असल्याने विद्यमान खासदार म्हणून त्यांना पुन्हा संधी मिळेल अशी खात्री होती. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांनी राष्ट्रवादीमध्ये शिरकाव करून तिकीट मिळविले, त्यामुळे राष्ट्रवादीकडून संभाव्य उमेदवार असलेल्या भारती पवार यांनी भाजपात प्रवेश करून उमेदवारी मिळविली त्यामुळे हरिश्चंद्र चव्हाण कमालीचे नाराज असून, त्यांनी बंडाचे निशाण फडकविण्याची तयारी दर्शविली आहे.दुसरीकडे भाजपा लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार म्हणून माणिकराव कोकाटे यांनी तयारी केली, पण ऐनवेळी भाजपा शिवसेनेची युती झाल्याने माणिकरावांची अडचण झाली असून, त्यांनीदेखील बंडखोरीची तयारी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे.लोकसभा निवडणूक अटीतटीची होत आहे. अशा वेळी प्रत्येक जागा महत्त्वाची असल्याने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील बंड शमविण्यासाठी प्रयत्न चालविले असून, इच्छुक उमेदवारांना विविध मार्गाने माघार घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपा