शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

चार दशकांचा ‘त्र्यंबकचा राजा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:17 IST

वर्षा ऋतूतील भाद्रपद महिन्यात सन १९८१ मध्ये नशिब मित्रमंडळाची स्थापना मंगेश विश्वनाथ धारणे व सहकारी मित्र ...

वर्षा ऋतूतील भाद्रपद महिन्यात सन १९८१ मध्ये नशिब मित्रमंडळाची स्थापना मंगेश विश्वनाथ धारणे व सहकारी मित्र परिवाराने केली. मंडळाने विविध उपक्रम आपल्या ४१ वर्षांच्या कालखंडात राबवलेले आहेत. त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी असलेले इंद्रतीर्थ पाणवेलींनी गच्च भरले होते. या सुंदर जलाशयाभोवती आठही दिशांना कचऱ्याचे साम्राज्य होते. प्रदूषण वाढले होते. अस्वच्छता वाढली होती. मंडळाने इंद्राळेश्वर तलाव व परिसर स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली. संपूर्ण इंद्राळेश्वर पाणवेलींनी मुक्त व परिसर स्वच्छ केला. यानंतर गावातील अनेक सेवाभावी संस्थांनी या उपक्रमात भाग घेऊन हा परिसर पर्यावरणपूरक व प्रदूषण मुक्त केला आहे.

सांस्कृतिक क्षेत्रात हौशी नाटके या मंडळाने आणली आहेत. गेल्या दोन दशकांपासून दहा हजार लिटर्सच्या जलकुंभातून ग्रामीण भागातील लोकांना वर्षभर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मंडळाने केली आहे. त्र्यंबक नगरीच्या पंचक्रोशीत सामाजिक, सांस्कृतिक परंपरा जिवंत ठेवण्याचे काम मृत्युंजय प्रतिष्ठान करत आहे. माघी गणेश जन्मोत्सव व भागवत समाप्तीला असे वर्षातून दोन वेळा अन्नदान व अनधान्य वाटप करण्यात येते. कोरोना काळात ऑक्सिजनची कमतरता ओळखून संस्थेतर्फे तीन कायमस्वरूपी ऑक्सिजन सिलिंडर उपजिल्हा रुग्णालयात भेट देण्यात आले.