शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

चार दशकांचा ‘त्र्यंबकचा राजा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:17 IST

वर्षा ऋतूतील भाद्रपद महिन्यात सन १९८१ मध्ये नशिब मित्रमंडळाची स्थापना मंगेश विश्वनाथ धारणे व सहकारी मित्र ...

वर्षा ऋतूतील भाद्रपद महिन्यात सन १९८१ मध्ये नशिब मित्रमंडळाची स्थापना मंगेश विश्वनाथ धारणे व सहकारी मित्र परिवाराने केली. मंडळाने विविध उपक्रम आपल्या ४१ वर्षांच्या कालखंडात राबवलेले आहेत. त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी असलेले इंद्रतीर्थ पाणवेलींनी गच्च भरले होते. या सुंदर जलाशयाभोवती आठही दिशांना कचऱ्याचे साम्राज्य होते. प्रदूषण वाढले होते. अस्वच्छता वाढली होती. मंडळाने इंद्राळेश्वर तलाव व परिसर स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली. संपूर्ण इंद्राळेश्वर पाणवेलींनी मुक्त व परिसर स्वच्छ केला. यानंतर गावातील अनेक सेवाभावी संस्थांनी या उपक्रमात भाग घेऊन हा परिसर पर्यावरणपूरक व प्रदूषण मुक्त केला आहे.

सांस्कृतिक क्षेत्रात हौशी नाटके या मंडळाने आणली आहेत. गेल्या दोन दशकांपासून दहा हजार लिटर्सच्या जलकुंभातून ग्रामीण भागातील लोकांना वर्षभर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मंडळाने केली आहे. त्र्यंबक नगरीच्या पंचक्रोशीत सामाजिक, सांस्कृतिक परंपरा जिवंत ठेवण्याचे काम मृत्युंजय प्रतिष्ठान करत आहे. माघी गणेश जन्मोत्सव व भागवत समाप्तीला असे वर्षातून दोन वेळा अन्नदान व अनधान्य वाटप करण्यात येते. कोरोना काळात ऑक्सिजनची कमतरता ओळखून संस्थेतर्फे तीन कायमस्वरूपी ऑक्सिजन सिलिंडर उपजिल्हा रुग्णालयात भेट देण्यात आले.