शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
7
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
8
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
9
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
10
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
11
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
12
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
13
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
14
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
15
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
16
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
17
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
18
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
19
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल

खिलार गाय-बैल नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 15:00 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये पुर्वी गोठ्यामध्ये खिलार गाय-बैल मोठ्या प्रमाणावर असत. परंतु शासनाच्या बैल गाडा शर्यत बंदी मुळे ग्रामीण भागातील गोठ्यातील खिलार गाय-बैल आता नामशेष झाले आहे.

ठळक मुद्देलखमापूर : परराज्यातील गिर गायीला शेतकऱ्यांची विशेष पसंती

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये पुर्वी गोठ्यामध्ये खिलार गाय-बैल मोठ्या प्रमाणावर असत. परंतु शासनाच्या बैल गाडा शर्यत बंदी मुळे ग्रामीण भागातील गोठ्यातील खिलार गाय-बैल आता नामशेष झाले आहे.राज्यातील देशी जनावरांमधील सर्वात सुंदर व रुबाबदार म्हणून ओळखली जाणारी खिलार प्रवर्गातील गाय-बैल सध्या नामशेष अथवा दुर्मिळ झाल्याने ग्रामीण भागातील गोठ्यातील ते वैभव आता ओसरु लागले आहे.पुर्वी ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकरी वर्गाच्या गाईच्या गोठ्यात खिलार गाय असायची. खिलार गाय दुध कमी देत असली तरी शरीरयेष्ठीने अत्यंत चपळ व दिसायला सुंदर असणारी या प्रवर्गातील गाय व बैल माणसांच्या मनाला मोहिनी घालतात. खिलार गायीचे दुध दोन प्रकारात मोडते.तल्लख बुद्धी व निरोगी शरीरांसाठी अतिशय उत्कृष्ट पोषणमुल्य असलेले हे दुध आज दुर्मिळ होत चालले आहे.देशात देशी गायीच्या दुधाबाबत जागरूकता दिवसेंदिवस वाढत असुनही खिलारच्या दुधवाढीबाबत अनेक वर्षापासुन काहीच प्रयत्न झालेले दिसत नाही. यांचा परिणाम म्हणून शेजारील राज्यांतुन गिर गायीची जाहिरात होऊन अशा स्वरूपांच्या गायी सध्या महाराष्ट्रांच्या ग्रामीण भागातील शेतकरी खरेदी करतांना दिसत आहे.त्यामध्येही जातीवंत गिर गाय पाहायला मिळत नाही. त्यात काही प्रमाणात संकरीत प्रमाण आढळून येत आहे. त्या गाई त्या भागात कमी किंमतीत विकल्या जातात. म्हणून तिची जाहिरात करून आपल्याकडे गीर गाय रूपाने जास्त किंमतीत विकल्या जात आहे.महाराष्ट्रातील खिलार गायीच्या बाबतीत असा प्रयत्न कोणी करतांना दिसत नाही. म्हणून महाराष्ट्रातील खिलार प्रवर्गातील गाय आजअखेरीच्या घटका मोजत आहे.खिलार गायीपासुन तयार होणारे बैल अतिशय रूबाबदार व चपळ समजले जातात. खिलार जातीचे मुळ कर्नाटकांच्या हल्लीकर जातीमध्ये सापडते. असे जाणकार शेतकरी वर्गातुन बोलले जाते.देशी खिलार गायीच्या वासरांमध्ये बैल असल्यास त्यांचा वापर शेती व बैलगाडा शर्यतीसाठी गेला जातो. खिलार गायीच्या वासरांला पंचवीस हजार ते दीड लाख रुपयां पर्यंत किंमत मोजावी लागत आहे. परंतु आता शेती यांत्रिकीकरणांवर केली जाते, व बैलगाडा शर्यती बंद झाल्यामुळे खिलार बैल खरेदीला बहुतांशी शेतकरी वर्गाने राम राम ठोकला आहे.

(२९ लखमापूर १)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी