शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पुरेशा पावसाअभावी खरीपाच्या पेरण्या खोंळबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 19:35 IST

लोहोणेर : जुलै महीना संपत आला आहे परंतु अद्यापही नाशिक जिल्ह्यातील विशेषत:, देवळा, कळवण, बागलाण, मालेगाव तालुक्यात पुरेशा पावसाअभावी खरीपाच्या पेरण्या खोंळबल्या असुन कळवण तालुक्यात तर अजिबात पाउस नसल्यामुळे पुनद, चणकापुर व बागलाण तालुक्यातील केळझर ही धरणे कोरडी ठाक आहेत. या गंभीर परिस्थितीची शासनाने वेळीच दखल घेण्याकरीता देवळा येथे तहसिलदार दत्तात्रेय शेजुळ यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देनिवेदन : देवळा, कळवण, बागलाण, मालेगाव तालुक्यातील शेतकरी चिंतीत

लोहोणेर : जुलै महीना संपत आला आहे परंतु अद्यापही नाशिक जिल्ह्यातील विशेषत:, देवळा, कळवण, बागलाण, मालेगाव तालुक्यात पुरेशा पावसाअभावी खरीपाच्या पेरण्या खोंळबल्या असुन कळवण तालुक्यात तर अजिबात पाउस नसल्यामुळे पुनद, चणकापुर व बागलाण तालुक्यातील केळझर ही धरणे कोरडी ठाक आहेत. या गंभीर परिस्थितीची शासनाने वेळीच दखल घेण्याकरीता देवळा येथे तहसिलदार दत्तात्रेय शेजुळ यांना निवेदन देण्यात आले.धरणातच पाणीसाठा नसल्यामुळे कसमादेतील शेतकऱ्यांबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने वेळीच दखल घ्यावी व सक्तिची कर्ज वसुली तसेच विविध प्रकारच्या कर्जापोटी घेतलेल्या वसुलीसाठी होत असलेले जमीनीचे लीलाव थांबवावेत. जिल्हा बॅँकेसह इतर राष्ट्रीकृत बॅँकाकडुन त्वरित पीककर्ज उपलब्ध व्हावे. मागील वर्षी कांद्यासाठी घोषित केलेले कांदा अनुदानाचे पैसे त्वरित मिळावेत. केंद्र शासनाकडुन दिली जाणारी सहा हजारांची आर्थिक मदत कर्जखाती जमा न करता शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मिळावी. ज्या शेतकºयांचे देवळा, उमराणे, सटाणा, मालेगाव बाजार समितीमधील व्यापाºयांनी कांद्याचे पैसे थकविले व दिलेले धनादेश वटत नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी. पीक विम्याचे पैसे त्वरित मिळावेत संपुर्ण नाशिक जिल्ह्यात दुष्काळ मंडळे स्थापन झालेली असतांना सुद्धा सक्तीची कर्ज वसुली थांबलेली नाही. ती त्वरित थांबवावी. देवळा, कळवण, सटाणा, चांदवड, मालेगांव तालुके हे दुष्काळी तालुके घोषित करावेत इत्यादी मागण्यांचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटनाच्यावतीने देवळा तहसिलदार दत्रात्रेय शेजुळ यांना देण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुबेर जाधव, प्रहार शेतकरी संघटनेचे उपजिल्हा अध्यक्ष कृष्णा जाधव, विनोद आहेर, कुबेर जाधव आदींनी तहसिलदारांची भेट घेतली.