शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

पुरेशा पावसाअभावी खरीपाच्या पेरण्या खोंळबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 19:35 IST

लोहोणेर : जुलै महीना संपत आला आहे परंतु अद्यापही नाशिक जिल्ह्यातील विशेषत:, देवळा, कळवण, बागलाण, मालेगाव तालुक्यात पुरेशा पावसाअभावी खरीपाच्या पेरण्या खोंळबल्या असुन कळवण तालुक्यात तर अजिबात पाउस नसल्यामुळे पुनद, चणकापुर व बागलाण तालुक्यातील केळझर ही धरणे कोरडी ठाक आहेत. या गंभीर परिस्थितीची शासनाने वेळीच दखल घेण्याकरीता देवळा येथे तहसिलदार दत्तात्रेय शेजुळ यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देनिवेदन : देवळा, कळवण, बागलाण, मालेगाव तालुक्यातील शेतकरी चिंतीत

लोहोणेर : जुलै महीना संपत आला आहे परंतु अद्यापही नाशिक जिल्ह्यातील विशेषत:, देवळा, कळवण, बागलाण, मालेगाव तालुक्यात पुरेशा पावसाअभावी खरीपाच्या पेरण्या खोंळबल्या असुन कळवण तालुक्यात तर अजिबात पाउस नसल्यामुळे पुनद, चणकापुर व बागलाण तालुक्यातील केळझर ही धरणे कोरडी ठाक आहेत. या गंभीर परिस्थितीची शासनाने वेळीच दखल घेण्याकरीता देवळा येथे तहसिलदार दत्तात्रेय शेजुळ यांना निवेदन देण्यात आले.धरणातच पाणीसाठा नसल्यामुळे कसमादेतील शेतकऱ्यांबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने वेळीच दखल घ्यावी व सक्तिची कर्ज वसुली तसेच विविध प्रकारच्या कर्जापोटी घेतलेल्या वसुलीसाठी होत असलेले जमीनीचे लीलाव थांबवावेत. जिल्हा बॅँकेसह इतर राष्ट्रीकृत बॅँकाकडुन त्वरित पीककर्ज उपलब्ध व्हावे. मागील वर्षी कांद्यासाठी घोषित केलेले कांदा अनुदानाचे पैसे त्वरित मिळावेत. केंद्र शासनाकडुन दिली जाणारी सहा हजारांची आर्थिक मदत कर्जखाती जमा न करता शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मिळावी. ज्या शेतकºयांचे देवळा, उमराणे, सटाणा, मालेगाव बाजार समितीमधील व्यापाºयांनी कांद्याचे पैसे थकविले व दिलेले धनादेश वटत नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी. पीक विम्याचे पैसे त्वरित मिळावेत संपुर्ण नाशिक जिल्ह्यात दुष्काळ मंडळे स्थापन झालेली असतांना सुद्धा सक्तीची कर्ज वसुली थांबलेली नाही. ती त्वरित थांबवावी. देवळा, कळवण, सटाणा, चांदवड, मालेगांव तालुके हे दुष्काळी तालुके घोषित करावेत इत्यादी मागण्यांचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटनाच्यावतीने देवळा तहसिलदार दत्रात्रेय शेजुळ यांना देण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुबेर जाधव, प्रहार शेतकरी संघटनेचे उपजिल्हा अध्यक्ष कृष्णा जाधव, विनोद आहेर, कुबेर जाधव आदींनी तहसिलदारांची भेट घेतली.