शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

जिल्ह्यात खरीप हंगाम संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 22:50 IST

नाशिक : कळवण तालुक्यांतील ओतूर परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले असून, बळीराजा संकटात सापडला आहे.

नाशिक : कळवण तालुक्यांतील ओतूर परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले असून, बळीराजा संकटात सापडला आहे.अतिपावसामुळे मका कणसे सडली असून डिर फुटायला लागले आहेत तर बाजरीची कणसे सडली आहेत व कांदा रोपे खराब होत आहेत, त्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार असल्याने बळीराजा पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या दोन दिवसात परिसरात ढगाळ वातावरण असल्याने पिकांवर बुरशी, मावा रोगांचा फैलाव झाला आहे.गेल्या वर्षापेक्षा यावर्षी खरीप पिकांची फारच दयनीय अवस्था पिकांची सुरुवाती- पासूनच झाली आहे. त्यातच परतीचा पाऊस व रोगराईची भर पडली आहे. उन्हाळी कांदा रोपे भुईसपाट झाली आहेत. मक्याचा चारा सडला असून, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. चार महिने राब राब राबून पिकांसाठी घेतलेल्या कष्टाला पावसाने नुकसान केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हजारो रुपये खर्च करून उभी केलेली पिके डोळ्यासमोर भुईसपाट होताना बळीराजा पाहत आहे. काही ठिकाणी सोयाबीन पाण्यात तरंगत आहे तर मक्याचा कणसांना कोंब फुटले आहेत, त्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच द्राक्षबागा व फळ पिकांचेही नुकसान झाले आहे. अतिवृष्टी झाल्याने पिकांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. पावसाने शेतकरी धास्तावला आहे. शासनाने पंचनामे न करता सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ओतूर परिसरातील शेतकरीवर्गाने केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक