शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात खरीप हंगाम संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 22:50 IST

नाशिक : कळवण तालुक्यांतील ओतूर परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले असून, बळीराजा संकटात सापडला आहे.

नाशिक : कळवण तालुक्यांतील ओतूर परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले असून, बळीराजा संकटात सापडला आहे.अतिपावसामुळे मका कणसे सडली असून डिर फुटायला लागले आहेत तर बाजरीची कणसे सडली आहेत व कांदा रोपे खराब होत आहेत, त्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार असल्याने बळीराजा पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या दोन दिवसात परिसरात ढगाळ वातावरण असल्याने पिकांवर बुरशी, मावा रोगांचा फैलाव झाला आहे.गेल्या वर्षापेक्षा यावर्षी खरीप पिकांची फारच दयनीय अवस्था पिकांची सुरुवाती- पासूनच झाली आहे. त्यातच परतीचा पाऊस व रोगराईची भर पडली आहे. उन्हाळी कांदा रोपे भुईसपाट झाली आहेत. मक्याचा चारा सडला असून, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. चार महिने राब राब राबून पिकांसाठी घेतलेल्या कष्टाला पावसाने नुकसान केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हजारो रुपये खर्च करून उभी केलेली पिके डोळ्यासमोर भुईसपाट होताना बळीराजा पाहत आहे. काही ठिकाणी सोयाबीन पाण्यात तरंगत आहे तर मक्याचा कणसांना कोंब फुटले आहेत, त्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच द्राक्षबागा व फळ पिकांचेही नुकसान झाले आहे. अतिवृष्टी झाल्याने पिकांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. पावसाने शेतकरी धास्तावला आहे. शासनाने पंचनामे न करता सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ओतूर परिसरातील शेतकरीवर्गाने केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक