शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात खरीप हंगाम संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 22:50 IST

नाशिक : कळवण तालुक्यांतील ओतूर परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले असून, बळीराजा संकटात सापडला आहे.

नाशिक : कळवण तालुक्यांतील ओतूर परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले असून, बळीराजा संकटात सापडला आहे.अतिपावसामुळे मका कणसे सडली असून डिर फुटायला लागले आहेत तर बाजरीची कणसे सडली आहेत व कांदा रोपे खराब होत आहेत, त्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार असल्याने बळीराजा पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या दोन दिवसात परिसरात ढगाळ वातावरण असल्याने पिकांवर बुरशी, मावा रोगांचा फैलाव झाला आहे.गेल्या वर्षापेक्षा यावर्षी खरीप पिकांची फारच दयनीय अवस्था पिकांची सुरुवाती- पासूनच झाली आहे. त्यातच परतीचा पाऊस व रोगराईची भर पडली आहे. उन्हाळी कांदा रोपे भुईसपाट झाली आहेत. मक्याचा चारा सडला असून, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. चार महिने राब राब राबून पिकांसाठी घेतलेल्या कष्टाला पावसाने नुकसान केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हजारो रुपये खर्च करून उभी केलेली पिके डोळ्यासमोर भुईसपाट होताना बळीराजा पाहत आहे. काही ठिकाणी सोयाबीन पाण्यात तरंगत आहे तर मक्याचा कणसांना कोंब फुटले आहेत, त्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच द्राक्षबागा व फळ पिकांचेही नुकसान झाले आहे. अतिवृष्टी झाल्याने पिकांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. पावसाने शेतकरी धास्तावला आहे. शासनाने पंचनामे न करता सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ओतूर परिसरातील शेतकरीवर्गाने केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक