शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

खरीप पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 01:31 IST

मालेगाव तालुका दुष्काळी जाहीर करण्यासाठी आवश्यक निकषांची चाचणी महसूल व कृषी विभागाने सुरू केली आहे. तालुक्यातील १५ गावांमध्ये पथकांमार्फत महामदत अ‍ॅपद्वारे खरीप पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण केले जात आहे.

ठळक मुद्देकृषी विभाग : शासनाला अहवाल सादर करणार

मालेगाव : तालुका दुष्काळी जाहीर करण्यासाठी आवश्यक निकषांची चाचणी महसूल व कृषी विभागाने सुरू केली आहे. तालुक्यातील १५ गावांमध्ये पथकांमार्फत महामदत अ‍ॅपद्वारे खरीप पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण केले जात आहे.पावसाचे प्रमाण, गंभीर परिस्थिती व पीक सर्वेक्षण पाहणीतून समोर येणारी उत्पादन टक्केवारी यांचा एकत्रित अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे. तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासन आदेशानुसार पीक नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी होत आहे.सत्यमापन चाचणीत प्रत्येक मंडळातील एका गावाचा समावेश आवश्यक असल्याने कृषी विभागाच्या तक्त्यानुसार सोयगाव, आघार बुद्रुक, सौंदाणे, टाकळी, जळगाव (निंबायती), मेहुणे, कळवाडी, गुगुळवाड, सायने बुद्रुक, अजंदे, घाणेगाव, टिंगरी, दहिदी, अजंग व रामपुरा या १५ गावांची निवड करण्यात आली आहे. या प्रत्येक गावात जाऊन पीक कापणी प्रयोग केला जात आहे. निवड झालेल्या गावातील मुख्य पिकांची कापणी करून उत्पादनात किती घट आली याची माहिती घेतली जात आहे. प्रत्येक गावातील सत्यमापन चाचणीसाठी एक याप्रमाणे १५ पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. तहसीलदार ज्योती देवरे, कृषी अधिकारी गोकुळ आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यमापन चाचणीचे काम सुरू आहे. तालुक्यात पावसाअभावी खरीप पिके जळूनखाक झाली आहेत. मक्याची वाढ खुंटली आहे. बाजरीत दाणा दिसत नाही. कपाशीचे पीक भुईसपाटझाले आहे.

टॅग्स :agricultureशेतीGovernmentसरकार