शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

‘खाकी’चे कर्तव्य बजावले; मात्र लोकशाहीच्या अधिकारापासून पोलीस वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 16:27 IST

निवडणूक कोणतीही असो गल्लीची अथवा दिल्लीची. त्या सुरळीत पार पाडण्याची मुख्यत्वे जबाबदारी येऊन ठेपते ती ‘खाकी’वरच. सकाळी मतदान सुरू होण्यापासून ते सायंकाळी उशिरापर्यंत ईव्हीएम यंत्रे सील करेपर्यंत पोलिसांना सक्तीने थांबावे लागले. घड्याळाचा काटा जसाजसा पुढे सरकत जातो, तसे त्यांच्याही मनात येते की आपणही मतदानाचा हक्क बजावावा; मात्र नाईलाजाने हक्कापासून वंचित रहावे लागते

ठळक मुद्देपोलीसदादाने खाकीचे  ‘कर्तव्य’ बजावलेटपालीची व्यवस्था अयशस्वीमतदानप्रक्रियेवर पाणी सोडावे लागले हे खरे

नाशिक : ‘वोट कर नाशिककर’ला नाशिकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदानाचा टक्का वाढविला; मात्र मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली जावी, यासाठी डोळ्यांत तेल घालून बंदोबस्तावर असलेल्या ‘खाकी’च्या कर्मचाऱ्यांना लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार बजावता आला नाही; मात्र पोलीस कर्मचाऱ्यांनी ‘खाकी’चे कर्तव्य चोखपणे बजावले हे तितकेच खरे.पोलीस म्हटला की, बंदोबस्त आलाच. त्याला कुठलाही सण, उत्सव साजरा करता येत नाही व सण-उत्सव नागरिकांचे शांततेत साजरे व्हावे, यासाठी तो रस्त्यावर असतो. सोमवारी (दि.२९) लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा राष्टÑीय महोत्सव साजरा होत असतानाही नेमके हेच चित्र पहावयास मिळाले. पोलीस कर्मचारी वर्दी घालून रस्त्यावर उभा राहिला. मतदारांना लोकशाहीचा अधिकार निर्धास्त व सुरक्षितपणे बजावता यावा, यासाठी रणरणत्या उन्हात पोलीसदादाने खाकीचे  ‘कर्तव्य’ बजावले.निवडणूक कोणतीही असो गल्लीची अथवा दिल्लीची. त्या सुरळीत पार पाडण्याची मुख्यत्वे जबाबदारी येऊन ठेपते ती ‘खाकी’वरच. सकाळी मतदान सुरू होण्यापासून ते सायंकाळी उशिरापर्यंत ईव्हीएम यंत्रे सील करेपर्यंत पोलिसांना सक्तीने थांबावे लागले. घड्याळाचा काटा जसाजसा पुढे सरकत जातो, तसे त्यांच्याही मनात येते की आपणही मतदानाचा हक्क बजावावा; मात्र नाईलाजाने हक्कापासून वंचित रहावे लागते; कारण ज्या केंद्राबाहेर ‘ड्युटी’ आहे, ते कें द्र सोडून ज्या केंद्रात नाव आले आहे, त्या केंद्रावर पोहचता येत नाही. त्यामुळे मतदानावर पाणी सोडावे लागते, असे काही पोलीस कर्मचा-यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.मतदानासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेले जवळपास दोन हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर होते. वरिष्ठ अधिका-यांनी जरी मतदानाचा हक्क बजावला असला तरी पोलीस शिपाईपासून हवालदारपर्यंत सर्वांना मतदानापासून वंचित रहावे लागले ही वस्तूस्थिती. नाशिक पोलीस आयुक्तालयातील केवळ २० ते २५ टक्के कर्मचा-यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असला तरी निम्म्याहून अधिक कर्मचा-यांना मतदानप्रक्रियेवर पाणी सोडावे लागले हे खरे.टपालीची व्यवस्था अयशस्वीबंदोबस्तावरील अधिकारी-कर्मचा-यांसाठी टपाली मतदानाची व्यवस्था केली जाते. मतदानाच्या तीन दिवसांअगोदर टपाली मतदानासाठी कागदपत्रे द्यावी लागतात. मात्र निवडणूक मतदानापूर्वीच पोलिसांना बंदोबस्तावर हजर व्हावे लागत असल्याने त्यांना ते शक्य होत नाही. एकतर ग्राउंड बंदोबस्त नाहीतर बुथ बंदोबस्त असतो त्यामुळे आपली जागा सोडता येत नाही.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक