शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

ठकठक वाढे डोक्यात...

By admin | Updated: May 14, 2014 01:12 IST

लोकसभा : दोन दिवसांवर आला निकाल

लोकसभा : दोन दिवसांवर आला निकालनाशिक : येत्या शुक्रवारी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांना गेल्या दोन-चार महिन्यांच्या धामधुमीचा थकवा घालविण्यासाठी दोन आठवड्यांपासून विश्रांती घेतल्यानंतर निकाल अवघ्या काही तासांवर आल्याने त्यांच्या डोक्यातील ठकठक वाढू लागली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत हे उमेदवार पुन्हा कार्यकर्त्यांमध्ये सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी गेल्या २४ एप्रिल रोजी मतदान झाले. त्यापूर्वी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात प्रत्यक्ष निवडणूक कामकाजाला सुरुवात झाली असली, तरी उमेदवारांनी त्यापूर्वी दोन-चार महिने अगोदरपासूनच मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचाराला प्रारंभ केला होता. प्रत्यक्ष निवडणुकीला प्रारंभ झाल्यानंतर उमेदवारांना तळपत्या उन्हात चांगलीच दगदग सोसावी लागली होती. अखेरच्या क्षणापर्यंत रंगतदार झालेल्या या निवडणुकीमुळे आजही अंदाज बांधणे कठीण झालेले असताना, मातब्बरांनाही शाश्वती नाही. त्यामुळे निवडणूक आटोपताच काहींनी दीर्घ विश्रांती घेणे पसंत केले, तर काहींनी थेट थंड हवेच्या ठिकाणची सहल करून थकवा घालविला. अनेकांनी निवडणुकीच्या काळातील रोजचा संपर्क कमी करून मोजक्याच काही कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवला होता. त्यातही सार्वजनिक ठिकाणी जाणे अनेकांनी टाळल्याचे दिसून आले. यातही गेलेच तर तिथेही निवडणुकीच्याच गप्पा रंगतात आणि त्यातून नको असलेले टेन्शन येतेच. त्यामुळे अनेकांनी सार्वजनिक ठिकाणी येणे बंद करून विश्रांती घेणेच पसंत केले होते. दरम्यान, राजकारणात मुरलेल्या उमेदवारांनीही गेल्या दोन आठवड्याच्या काळात स्वत:ला वेगळ्याच कामात गंुतवून घेतल्याचे दिसून आले. त्यावरून हार-जीत निवडणुकीचा एक अविभाज्य भाग असला, तरी त्याचे टेन्शन त्यांच्यावरही दिसून आलेच, हे अनेक बाबींवरून दिसलेच. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराच्या डोक्यात निवडणूक निकालाची ठकठक सुरू झाली असून, निकालापर्यंत ते ठोके वाढतच जाणार आहेत...