शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

तक्रारींची नोंद ठेवा... अन्यथा कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 01:05 IST

सर्वसामान्य नागरिकांच्या शासकीय कामकाजासंदर्भात असलेल्या तक्रारी दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रत्येक उपविभागीय कार्यालयांमध्ये व्हॉट््सअ‍ॅप ग्रिव्हनसेस फेडरल योजना सुरू करण्यात आलेली आहे. तथापि, अनेक नागरिकांच्या तक्रारींची नोंद न घेता त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविले जाते. सर्वसामान्यांच्या तक्रारींची रितसर नोंद न ठेवणाºया तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांवर यापुढे जबाबदारी निश्चित केली जाईल, असे पत्र जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी अधिकाºयांना बजावले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : व्हॉट्सअ‍ॅप ग्रिव्हनसेस फेडरल योजना सुरू

नाशिक : सर्वसामान्य नागरिकांच्या शासकीय कामकाजासंदर्भात असलेल्या तक्रारी दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रत्येक उपविभागीय कार्यालयांमध्ये व्हॉट््सअ‍ॅप ग्रिव्हनसेस फेडरल योजना सुरू करण्यात आलेली आहे. तथापि, अनेक नागरिकांच्या तक्रारींची नोंद न घेता त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविले जाते. सर्वसामान्यांच्या तक्रारींची रितसर नोंद न ठेवणाºया तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांवर यापुढे जबाबदारी निश्चित केली जाईल, असे पत्र जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी अधिकाºयांना बजावले आहे.शासकीय कार्यालयात असलेल्या प्रकरणासंदर्भात शासकीय कामाचा पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाभरातील नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागते. येथे आल्यानंतर त्यांना अनेक ठिकाणी फिरावे लागते. यातच त्यांचा दिवसही खर्ची होतो. त्यामुळे त्यांना तक्रार करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने एक व्हॉट््सअ‍ॅप क्रमांक दिलेला आहे. तसेच प्रत्येक उपविभागीय कार्यालयांच्या स्तरावरदेखील व्हॉट््सअ‍ॅप क्रमांकावर तक्रार करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांच्या तक्रारींची वेळीच दखल घेऊन त्यांचे समाधान करणे हा त्या मागचा हेतू आहे. परंतु अजूनही जिल्हाभरातून नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात येतात. स्थानिक पातळीवर त्यांच्या तक्रारींची कोणतीही नोंद ठेवली जात नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या तक्रारींची दखल घेण्यासंदर्भात आणि त्यांचे प्रकरण कुठपर्यंत आले आहे याची माहिती प्रत्येक तक्ररींची नोंद करून तक्रार निकाली काढण्यात आली की प्रलंबित आहे याची माहिती तक्रारकर्त्याला मिळाली पाहिजेच शिवाय त्याचे समाधान करणेदेखील अपेक्षित असून, जिल्ह्णातील सहायक जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी तक्रारींची नोंद आणि कामाचे प्राधान्य तक्रारकर्त्यांना कळविणे अपेक्षित आहे. असे न झाल्यामुळे अजूनही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी संंबंधित अधिकाºयांना तक्रारींची नोंद ठेवा अन्यथा जबाबदार धरण्यात येईल, असे पत्र अधिकाºयांना बजावले आहे. तक्रारी घेऊन आलेल्या नागरिकांच्या तक्रारीची नोंद आॅनलाइन घेण्यात आलेली नसेल आणि संबंधितास तक्रारींची सद्यस्थिती कळविली नसेल अशा अधिकाºयांवर यापुढे जबाबदारी निश्चित केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी अधिकाºयांना कळविले आहे.

टॅग्स :Governmentसरकार