शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारींची नोंद ठेवा... अन्यथा कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 01:05 IST

सर्वसामान्य नागरिकांच्या शासकीय कामकाजासंदर्भात असलेल्या तक्रारी दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रत्येक उपविभागीय कार्यालयांमध्ये व्हॉट््सअ‍ॅप ग्रिव्हनसेस फेडरल योजना सुरू करण्यात आलेली आहे. तथापि, अनेक नागरिकांच्या तक्रारींची नोंद न घेता त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविले जाते. सर्वसामान्यांच्या तक्रारींची रितसर नोंद न ठेवणाºया तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांवर यापुढे जबाबदारी निश्चित केली जाईल, असे पत्र जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी अधिकाºयांना बजावले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : व्हॉट्सअ‍ॅप ग्रिव्हनसेस फेडरल योजना सुरू

नाशिक : सर्वसामान्य नागरिकांच्या शासकीय कामकाजासंदर्भात असलेल्या तक्रारी दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रत्येक उपविभागीय कार्यालयांमध्ये व्हॉट््सअ‍ॅप ग्रिव्हनसेस फेडरल योजना सुरू करण्यात आलेली आहे. तथापि, अनेक नागरिकांच्या तक्रारींची नोंद न घेता त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविले जाते. सर्वसामान्यांच्या तक्रारींची रितसर नोंद न ठेवणाºया तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांवर यापुढे जबाबदारी निश्चित केली जाईल, असे पत्र जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी अधिकाºयांना बजावले आहे.शासकीय कार्यालयात असलेल्या प्रकरणासंदर्भात शासकीय कामाचा पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाभरातील नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागते. येथे आल्यानंतर त्यांना अनेक ठिकाणी फिरावे लागते. यातच त्यांचा दिवसही खर्ची होतो. त्यामुळे त्यांना तक्रार करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने एक व्हॉट््सअ‍ॅप क्रमांक दिलेला आहे. तसेच प्रत्येक उपविभागीय कार्यालयांच्या स्तरावरदेखील व्हॉट््सअ‍ॅप क्रमांकावर तक्रार करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांच्या तक्रारींची वेळीच दखल घेऊन त्यांचे समाधान करणे हा त्या मागचा हेतू आहे. परंतु अजूनही जिल्हाभरातून नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात येतात. स्थानिक पातळीवर त्यांच्या तक्रारींची कोणतीही नोंद ठेवली जात नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या तक्रारींची दखल घेण्यासंदर्भात आणि त्यांचे प्रकरण कुठपर्यंत आले आहे याची माहिती प्रत्येक तक्ररींची नोंद करून तक्रार निकाली काढण्यात आली की प्रलंबित आहे याची माहिती तक्रारकर्त्याला मिळाली पाहिजेच शिवाय त्याचे समाधान करणेदेखील अपेक्षित असून, जिल्ह्णातील सहायक जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी तक्रारींची नोंद आणि कामाचे प्राधान्य तक्रारकर्त्यांना कळविणे अपेक्षित आहे. असे न झाल्यामुळे अजूनही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी संंबंधित अधिकाºयांना तक्रारींची नोंद ठेवा अन्यथा जबाबदार धरण्यात येईल, असे पत्र अधिकाºयांना बजावले आहे. तक्रारी घेऊन आलेल्या नागरिकांच्या तक्रारीची नोंद आॅनलाइन घेण्यात आलेली नसेल आणि संबंधितास तक्रारींची सद्यस्थिती कळविली नसेल अशा अधिकाºयांवर यापुढे जबाबदारी निश्चित केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी अधिकाºयांना कळविले आहे.

टॅग्स :Governmentसरकार