शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

तक्रारींची नोंद ठेवा... अन्यथा कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 01:05 IST

सर्वसामान्य नागरिकांच्या शासकीय कामकाजासंदर्भात असलेल्या तक्रारी दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रत्येक उपविभागीय कार्यालयांमध्ये व्हॉट््सअ‍ॅप ग्रिव्हनसेस फेडरल योजना सुरू करण्यात आलेली आहे. तथापि, अनेक नागरिकांच्या तक्रारींची नोंद न घेता त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविले जाते. सर्वसामान्यांच्या तक्रारींची रितसर नोंद न ठेवणाºया तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांवर यापुढे जबाबदारी निश्चित केली जाईल, असे पत्र जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी अधिकाºयांना बजावले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : व्हॉट्सअ‍ॅप ग्रिव्हनसेस फेडरल योजना सुरू

नाशिक : सर्वसामान्य नागरिकांच्या शासकीय कामकाजासंदर्भात असलेल्या तक्रारी दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रत्येक उपविभागीय कार्यालयांमध्ये व्हॉट््सअ‍ॅप ग्रिव्हनसेस फेडरल योजना सुरू करण्यात आलेली आहे. तथापि, अनेक नागरिकांच्या तक्रारींची नोंद न घेता त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविले जाते. सर्वसामान्यांच्या तक्रारींची रितसर नोंद न ठेवणाºया तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांवर यापुढे जबाबदारी निश्चित केली जाईल, असे पत्र जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी अधिकाºयांना बजावले आहे.शासकीय कार्यालयात असलेल्या प्रकरणासंदर्भात शासकीय कामाचा पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाभरातील नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागते. येथे आल्यानंतर त्यांना अनेक ठिकाणी फिरावे लागते. यातच त्यांचा दिवसही खर्ची होतो. त्यामुळे त्यांना तक्रार करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने एक व्हॉट््सअ‍ॅप क्रमांक दिलेला आहे. तसेच प्रत्येक उपविभागीय कार्यालयांच्या स्तरावरदेखील व्हॉट््सअ‍ॅप क्रमांकावर तक्रार करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांच्या तक्रारींची वेळीच दखल घेऊन त्यांचे समाधान करणे हा त्या मागचा हेतू आहे. परंतु अजूनही जिल्हाभरातून नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात येतात. स्थानिक पातळीवर त्यांच्या तक्रारींची कोणतीही नोंद ठेवली जात नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या तक्रारींची दखल घेण्यासंदर्भात आणि त्यांचे प्रकरण कुठपर्यंत आले आहे याची माहिती प्रत्येक तक्ररींची नोंद करून तक्रार निकाली काढण्यात आली की प्रलंबित आहे याची माहिती तक्रारकर्त्याला मिळाली पाहिजेच शिवाय त्याचे समाधान करणेदेखील अपेक्षित असून, जिल्ह्णातील सहायक जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी तक्रारींची नोंद आणि कामाचे प्राधान्य तक्रारकर्त्यांना कळविणे अपेक्षित आहे. असे न झाल्यामुळे अजूनही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी संंबंधित अधिकाºयांना तक्रारींची नोंद ठेवा अन्यथा जबाबदार धरण्यात येईल, असे पत्र अधिकाºयांना बजावले आहे. तक्रारी घेऊन आलेल्या नागरिकांच्या तक्रारीची नोंद आॅनलाइन घेण्यात आलेली नसेल आणि संबंधितास तक्रारींची सद्यस्थिती कळविली नसेल अशा अधिकाºयांवर यापुढे जबाबदारी निश्चित केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी अधिकाºयांना कळविले आहे.

टॅग्स :Governmentसरकार