शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

शाश्वत विकासासाठी विवेकबुद्धी जागृत ठेवा : तुकाराम मुंढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 00:48 IST

शहराचे जीवनमान उंचविण्यासाठी स्वयंरोजगार निर्मितीसह मूलभूत सोयीसुविधांचा दर्जा सुधारणे आवश्यक आहे. स्मार्ट शहराकडे वाटचाल करताना मूलभूत सोयीसुविधा पुरविणे महापालिकेची जबाबदारी आहे. कारण ‘स्मार्ट शहर’ केवळ नावापुरते असून चालणार नाही. त्यासाठी शाश्वत विकास गरजेचा आहे,

नाशिक : शहराचे जीवनमान उंचविण्यासाठी स्वयंरोजगार निर्मितीसह मूलभूत सोयीसुविधांचा दर्जा सुधारणे आवश्यक आहे. स्मार्ट शहराकडे वाटचाल करताना मूलभूत सोयीसुविधा पुरविणे महापालिकेची जबाबदारी आहे. कारण ‘स्मार्ट शहर’ केवळ नावापुरते असून चालणार नाही. त्यासाठी शाश्वत विकास गरजेचा आहे, त्यामुळे शहराचे नागरिक या नात्याने शाश्वत विकास संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी विवेकबुद्धी जागृत ठेवावी, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले. डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेचे ५४वे पुष्प मूलभूत हक्क आंदोलन समितीच्या वतीने बुधवारी (दि.२०) परशुराम साईखेडकर सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी मुंढे यांनी ‘महानगर प्रशासन-शासन व नागरिक’ या विषयावर व्याख्यानातून प्रशासनाची व नागरिकांची कर्तव्ये-अधिकार, नगरनियोजन धोरण-अंमलबजावणी या बाबींचा आढावा घेतला. यावेळी मुंढे म्हणाले, नाशिककरांना आज पाणी मिळत असले तरी ते पुरेसे आणि गुणवत्तापूर्ण नाही. नाशिकमध्ये भविष्यात २४ तास पाणीपुरवठा व्हावा, हा प्रयत्न राहणार आहे. ज्या नवीन वसाहती उदयास येत आहे तेथे पिण्याच्या पाण्याच्या उपजलवाहिन्या टाकणे तसेच जलवाहिन्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. यासाठी ५० कोटींची गरज आहे, मात्र त्यासाठी कोणीही प्रश्न उपस्थित करीत नाही, असेही मुंढे म्हणाले. भूमिगत ड्रेनेजची व्यवस्था सुधारायची असेल तर त्यासाठी कर लावावा लागेल, कारण त्या सुविधेचा दर्जा सुधारण्यासाठी खर्च करावा लागणार आहे. तो खर्च कर स्वरूपात भागवावा लागणार आहे. तरच गोदावरी शुद्ध होईल आणि सांडपाण्याची विल्हेवाट लागेल.‘नाशिक माझं घर’नाशिक हे शहर माझे घर आहे. घर चांगले रहावे, ही माझी जबाबदारी आहे. घर चालविताना मला कर्तव्याची जाणीव करून द्यावीच लागणार आहे. या शहरात नागरिकांना सर्व मूलभूत सोयीसुविधा चांगल्या दर्जाच्या मिळाव्या यासाठी मला कर आकारावे लागेल, पण करवाढ नियमबाह्य मुळीच राहणार नाही, याचा विश्वास बाळगावा, असे मुंढे म्हणाले....म्हणून नाशिककर भाग्यवानसोलापूरला पिण्याचे पाणी दूषित स्वरूपाचे असल्याचे सिद्ध झाले आहे. नाशिककर भाग्यवान आहे की, गंगापूर, मुक णे या धरणांच्या वरच्या बाजूस मोठी शहरे नाहीत. नैसर्गिक स्त्रोत हे वैयक्तिक मालकीचे नसून सामूहिक मालकीचे आहे, त्यावर सर्वांचा अधिकार आहे, असा दृष्टिकोन जोपर्यंत विकसित होत नाही, तोपर्यंत शाश्वत विकासाची संकल्पना अमलात येऊ शकत नाही, असे मुंढे म्हणाले.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढे