शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

कस्तुरबाच्या लेकींची पाण्यासाठीची थांबली भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 22:59 IST

पेठ : आजूबाजूला पाण्याचा स्रोत नसल्याने विद्यालयाच्या आवारात बोअरवेल खोदण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे बोअरवेलला पाणीही भरपूर लागल्याने बालिकांच्या व शिक्षकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते.

ठळक मुद्देभगवान काळे यांनी स्वखर्चाने पाण्याची व्यवस्था करून दिली.

पेठ : आजूबाजूला पाण्याचा स्रोत नसल्याने विद्यालयाच्या आवारात बोअरवेल खोदण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे बोअरवेलला पाणीही भरपूर लागल्याने बालिकांच्या व शिक्षकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते.पेठ येथील कस्तुरबा गांधी निवासी बालिका विद्यालयात १०० मुलींचा पाणीप्रश्न कायमचा निकाली निघाला असून मुबलक पाणी मिळणार असल्याने आता या मुली ज्ञानदानाचे धडे गिरविण्यास अधिक वेळ देऊ शकतील, असा विश्वास प्राचार्य श्रीमती पवार यांनी व्यक्त केला. सर्वशिक्षा अभियानचे जिल्हा समन्वयक दराडे, विषय सहायक वाल्मीक चव्हाण यांच्या माध्यमातून भगवान काळे यांनी स्वखर्चाने पाण्याची व्यवस्था करून दिल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शालेय शिक्षणापासून वंचित राहिलेल्या शाळाबाह्य मुलींना अडचणींवर मात करून पुन्हा शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणण्यासाठी शासनाने या मुलींसाठी पेठला कस्तुरबा गांधी निवासी बालिका विद्यालय सुरू करून १०० मुलींची शिक्षणाची सोय केली खरी. मात्र रणरणते ऊन, भीषण पाणीटंचाई यामुळे या मुलींची पाण्यासाठीची वणवण काही संपत नव्हती.अखेरीस नाशिकच्या भगवान काळे यांनी सामाजिक दायित्व जपत या कस्तुरबाच्या लेकींचा पाणीप्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतला. पेठ सारख्या आदिवासी व अतिदुर्गम तालुक्यात १०० शाळाबाहय मुली शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत हीच मोठी समाधानाची बाब आहे. या मुलींना शिक्षणात कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत तसेच दुष्काळी परिस्थितीवर मात करून त्यांना चांगले शिक्षण मिळावे या उद्देशाने पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला आणी सुदैवाने त्याला यश ही आले.-भगवान काळे, नाशिक