शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कश्यपी प्रकल्पग्रस्तांना नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:54 IST

सभापतींचे निर्देश : जलसंपदाकडून यादी सादर; मनपात सामावून घेणार नाशिक : गेल्या ३० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कश्यपी प्रकल्पग्रस्तांच्या शासकीय नोकरीचा प्रश्न अखेर सुटला असून, विधीमंडळाच्या सभापतींनी नाशिक महापालिकेने प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे आदेश दिले आहेत.

सभापतींचे निर्देश : जलसंपदाकडून यादी सादर; मनपात सामावून घेणार

नाशिक : गेल्या ३० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कश्यपी प्रकल्पग्रस्तांच्या शासकीय नोकरीचा प्रश्न अखेर सुटला असून, विधीमंडळाच्या सभापतींनी नाशिक महापालिकेने प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे आदेश दिले आहेत.नाशिक शहराच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन नाशिक महापालिकेने तालुक्यातील धोंडेगाव, देवरगाव शिवारात कश्यपी धरणाची १९८८ मध्ये उभारणी केली. त्यावेळी जमीनमालकांना त्यांच्या जमिनीचा मोबदला देण्याबरोबरच प्रकल्पग्रस्तांना महापालिकेच्या नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. जिल्हा प्रशासनाच्या वतीने धरणासाठी महापालिकेला जमीन संपादित करून देण्यात आली व १९९२ मध्ये धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर महापालिकेने १२४ प्रकल्पाग्रस्तांपैकी काहींना नोकरीत पहिल्या टप्प्यात सामावून घेतले व त्यानंतर मात्र हात वर केले होते. तेव्हापासून प्रकल्पग्रस्तांकडून महापालिकेकडे पाठपुरावा केला गेला. त्यासाठी अर्ज, विनंत्या, धरणे, उपोषणे करण्यात आली परंतु पदरी काहीच पडत नसल्याचे पाहून गेल्या वर्षी १५ आॅगस्ट रोजी प्रकल्पग्रस्तांनी थेट धरणात उड्या मारण्याचा प्रयत्न केला व त्यातून आंदोलन चिघळून सरकारी अधिकाºयांना पिटाळून लावण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत, या संदर्भात प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते, तर राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनातही या प्रश्नाची चर्चा होऊन सरकारने उपसमिती नेमून अहवाल देण्याचे आदेश दिले होते. या समितीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला. तथापि, शासनानेच याबाबत मार्गदर्शन करावे असे अहवालात नमूद करण्यात आल्याने शासनाकडे हा प्रश्न सोपविण्यात आला.कश्यपी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत दोन दिवसांपूर्वी विधीमंळाचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. मदत व पुनर्वसनमंत्री कांबळे, आमदार जयंत जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कश्यपी प्रकल्पग्रस्तांना महापालिकेने दिलेले आश्वासनाची आठवण करून देण्यात आली. पहिल्या टप्प्यात महापालिकेने काही प्रकल्पग्रस्तांना नोकरी दिली व उर्वरितांना डावलल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याचे सांगण्यात आले. मनपावर जबाबदारीमहापालिकेने प्रकल्पग्रस्तांचा शैक्षणिक मुद्दा तसेच भरतीबाबत शासनाचे आदेशाचे कारण पुढे केल्यावर सभापतींनी आपल्या अधिकारात प्रकल्पग्रस्तांना तत्काळ महापालिकेने नोकरी द्यावी व तसा अहवाल सभापतींना सादर करण्याच्या सूचना दिल्या. या संदर्भात जलसंपदा विभागाने प्रकल्पग्रस्तांची यादी यापूर्वीच महापालिकेला दिली असून, त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी आता महापालिकेवर सोपविण्यात आली आहे.