शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

...म्हणून काश्मीर भारताच्या नकाशावर : विनायक आगाशे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:55 AM

पाकिस्तानी सैन्याने आक्रमण करत काश्मीरच्या विमानतळापर्यंत घूसखोरी केली होती. यावेळी मेजर सोमनाथ शर्मा व त्यांच्यासोबत असलेल्या ७० शूरवीरांच्या तुकडीने १९४७ साली चिवट लढा देत पाकिस्तानी सैन्याला काश्मीरमधून बाहेर काढले, म्हणून आज भारताच्या नकाशावर काश्मीर झळकत असल्याचे प्रतिपादन कमांडर विनायक आगाशे यांनी केले.

नाशिक : पाकिस्तानी सैन्याने आक्रमण करत काश्मीरच्या विमानतळापर्यंत घूसखोरी केली होती. यावेळी मेजर सोमनाथ शर्मा व त्यांच्यासोबत असलेल्या ७० शूरवीरांच्या तुकडीने १९४७ साली चिवट लढा देत पाकिस्तानी सैन्याला काश्मीरमधून बाहेर काढले, म्हणून आज भारताच्या नकाशावर काश्मीर झळकत असल्याचे प्रतिपादन कमांडर विनायक आगाशे यांनी केले.गोदाघाटावर सुरू असलेल्या नाशिक वसंत व्याख्यानमालेचे २१वे पुष्प आगाशे यांनी मंगळवारी (दि.२१) ‘सैनिकाच्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग’ या विषयावर गुंफले. भारतीय सैन्यदलातील शूरवीर पराक्रमी अशा हुतात्म्यांच्या शौर्यकथांचे त्यांनी विवेचन केले. यावेळी आगाशे म्हणाले, काश्मीरच्या संरक्षणासाठी शर्मा व त्यांच्यासोबत असलेल्या जवानांनी दिलेले बलिदान अविस्मरणीय असेच आहे. शर्मा जेव्हा आपल्या ७० जवानांच्या मदतीसाठी धावले तेव्हा ते रुग्णालयात उपचारार्थ दाखल होते. त्यांच्या शौर्यपूर्ण कामगिरीची दखल घेत त्यांना परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले. तसेच लेफ्टनंट क र्नल प्रीती चांद यांनी लडाखसारख्या प्रतिकूल वातावरणाच्या प्रदेशात केवळ १८ जवान २०० रायफल घेऊन पाकिस्तानी सैन्यांचा सामना केला. त्यांना महावीर चक्रने सन्मानित करण्यात आले. चांद यांची शौर्यकथाही भारतीय सेनेच्या इतिहासात उल्लेखनीय अशीच असल्याचे आगाशे म्हणाले. भारतीय सेनेत लढणारे सैनिक म्हणून नव्हे तर सपोर्ट स्टाफमध्ये असलेले बूट दुरुस्ती करणारे कारागीर हवालदार सियाराम यांनीही देशसेवा करताना आपल्या ‘शुटिंग’च्या कौशल्याचा अचूक वापर करत भारतीय सेनेला गरज पडली तेव्हा हातात बंदूक घेऊन शत्रूला धडा शिकविला. त्यांची शौर्यगाथाही प्रेरणादायी अशीच असल्याचे त्यांनी सांगितले.सैनिकाचे जीवन सर्वसामान्य माणसापेक्षा कितीतरी पटीने वेगळे असते. सैनिक देशाच्या सीमांचे रक्षणासाठी डोळ्यांत तेल घालून आपले कुटुंब, कौटुंबिक भावना, सुख-चैन अशा सर्व गोष्टी विसरून केवळ देशप्रेमाखातर देशसेवेचे व्रत घेत सैनिकी धर्म निभावण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. भारतीय सेनेच्या इतिहासात स्वातंत्र्यापासून आतापर्यंत अशा अनेक शूरवीरांच्या शौर्यगाथा इतरांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या असल्याचे आगाशे यांनी यावेळी अधोरेखित केले.आजचे व्याख्यानवक्ते : कवी संदीप जगतापविषय : शिवशाही ते लोकशाही

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान