शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

...म्हणून काश्मीर भारताच्या नकाशावर : विनायक आगाशे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 00:56 IST

पाकिस्तानी सैन्याने आक्रमण करत काश्मीरच्या विमानतळापर्यंत घूसखोरी केली होती. यावेळी मेजर सोमनाथ शर्मा व त्यांच्यासोबत असलेल्या ७० शूरवीरांच्या तुकडीने १९४७ साली चिवट लढा देत पाकिस्तानी सैन्याला काश्मीरमधून बाहेर काढले, म्हणून आज भारताच्या नकाशावर काश्मीर झळकत असल्याचे प्रतिपादन कमांडर विनायक आगाशे यांनी केले.

नाशिक : पाकिस्तानी सैन्याने आक्रमण करत काश्मीरच्या विमानतळापर्यंत घूसखोरी केली होती. यावेळी मेजर सोमनाथ शर्मा व त्यांच्यासोबत असलेल्या ७० शूरवीरांच्या तुकडीने १९४७ साली चिवट लढा देत पाकिस्तानी सैन्याला काश्मीरमधून बाहेर काढले, म्हणून आज भारताच्या नकाशावर काश्मीर झळकत असल्याचे प्रतिपादन कमांडर विनायक आगाशे यांनी केले.गोदाघाटावर सुरू असलेल्या नाशिक वसंत व्याख्यानमालेचे २१वे पुष्प आगाशे यांनी मंगळवारी (दि.२१) ‘सैनिकाच्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग’ या विषयावर गुंफले. भारतीय सैन्यदलातील शूरवीर पराक्रमी अशा हुतात्म्यांच्या शौर्यकथांचे त्यांनी विवेचन केले. यावेळी आगाशे म्हणाले, काश्मीरच्या संरक्षणासाठी शर्मा व त्यांच्यासोबत असलेल्या जवानांनी दिलेले बलिदान अविस्मरणीय असेच आहे. शर्मा जेव्हा आपल्या ७० जवानांच्या मदतीसाठी धावले तेव्हा ते रुग्णालयात उपचारार्थ दाखल होते. त्यांच्या शौर्यपूर्ण कामगिरीची दखल घेत त्यांना परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले. तसेच लेफ्टनंट क र्नल प्रीती चांद यांनी लडाखसारख्या प्रतिकूल वातावरणाच्या प्रदेशात केवळ १८ जवान २०० रायफल घेऊन पाकिस्तानी सैन्यांचा सामना केला. त्यांना महावीर चक्रने सन्मानित करण्यात आले. चांद यांची शौर्यकथाही भारतीय सेनेच्या इतिहासात उल्लेखनीय अशीच असल्याचे आगाशे म्हणाले. भारतीय सेनेत लढणारे सैनिक म्हणून नव्हे तर सपोर्ट स्टाफमध्ये असलेले बूट दुरुस्ती करणारे कारागीर हवालदार सियाराम यांनीही देशसेवा करताना आपल्या ‘शुटिंग’च्या कौशल्याचा अचूक वापर करत भारतीय सेनेला गरज पडली तेव्हा हातात बंदूक घेऊन शत्रूला धडा शिकविला. त्यांची शौर्यगाथाही प्रेरणादायी अशीच असल्याचे त्यांनी सांगितले.सैनिकाचे जीवन सर्वसामान्य माणसापेक्षा कितीतरी पटीने वेगळे असते. सैनिक देशाच्या सीमांचे रक्षणासाठी डोळ्यांत तेल घालून आपले कुटुंब, कौटुंबिक भावना, सुख-चैन अशा सर्व गोष्टी विसरून केवळ देशप्रेमाखातर देशसेवेचे व्रत घेत सैनिकी धर्म निभावण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. भारतीय सेनेच्या इतिहासात स्वातंत्र्यापासून आतापर्यंत अशा अनेक शूरवीरांच्या शौर्यगाथा इतरांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या असल्याचे आगाशे यांनी यावेळी अधोरेखित केले.आजचे व्याख्यानवक्ते : कवी संदीप जगतापविषय : शिवशाही ते लोकशाही

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान