शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
Nitin Shete: मोठी बातमी! शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
6
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
7
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
8
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
9
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
10
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
11
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
12
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
13
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
15
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
16
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
17
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
18
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
19
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
20
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...

...म्हणून काश्मीर भारताच्या नकाशावर : विनायक आगाशे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 00:56 IST

पाकिस्तानी सैन्याने आक्रमण करत काश्मीरच्या विमानतळापर्यंत घूसखोरी केली होती. यावेळी मेजर सोमनाथ शर्मा व त्यांच्यासोबत असलेल्या ७० शूरवीरांच्या तुकडीने १९४७ साली चिवट लढा देत पाकिस्तानी सैन्याला काश्मीरमधून बाहेर काढले, म्हणून आज भारताच्या नकाशावर काश्मीर झळकत असल्याचे प्रतिपादन कमांडर विनायक आगाशे यांनी केले.

नाशिक : पाकिस्तानी सैन्याने आक्रमण करत काश्मीरच्या विमानतळापर्यंत घूसखोरी केली होती. यावेळी मेजर सोमनाथ शर्मा व त्यांच्यासोबत असलेल्या ७० शूरवीरांच्या तुकडीने १९४७ साली चिवट लढा देत पाकिस्तानी सैन्याला काश्मीरमधून बाहेर काढले, म्हणून आज भारताच्या नकाशावर काश्मीर झळकत असल्याचे प्रतिपादन कमांडर विनायक आगाशे यांनी केले.गोदाघाटावर सुरू असलेल्या नाशिक वसंत व्याख्यानमालेचे २१वे पुष्प आगाशे यांनी मंगळवारी (दि.२१) ‘सैनिकाच्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग’ या विषयावर गुंफले. भारतीय सैन्यदलातील शूरवीर पराक्रमी अशा हुतात्म्यांच्या शौर्यकथांचे त्यांनी विवेचन केले. यावेळी आगाशे म्हणाले, काश्मीरच्या संरक्षणासाठी शर्मा व त्यांच्यासोबत असलेल्या जवानांनी दिलेले बलिदान अविस्मरणीय असेच आहे. शर्मा जेव्हा आपल्या ७० जवानांच्या मदतीसाठी धावले तेव्हा ते रुग्णालयात उपचारार्थ दाखल होते. त्यांच्या शौर्यपूर्ण कामगिरीची दखल घेत त्यांना परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले. तसेच लेफ्टनंट क र्नल प्रीती चांद यांनी लडाखसारख्या प्रतिकूल वातावरणाच्या प्रदेशात केवळ १८ जवान २०० रायफल घेऊन पाकिस्तानी सैन्यांचा सामना केला. त्यांना महावीर चक्रने सन्मानित करण्यात आले. चांद यांची शौर्यकथाही भारतीय सेनेच्या इतिहासात उल्लेखनीय अशीच असल्याचे आगाशे म्हणाले. भारतीय सेनेत लढणारे सैनिक म्हणून नव्हे तर सपोर्ट स्टाफमध्ये असलेले बूट दुरुस्ती करणारे कारागीर हवालदार सियाराम यांनीही देशसेवा करताना आपल्या ‘शुटिंग’च्या कौशल्याचा अचूक वापर करत भारतीय सेनेला गरज पडली तेव्हा हातात बंदूक घेऊन शत्रूला धडा शिकविला. त्यांची शौर्यगाथाही प्रेरणादायी अशीच असल्याचे त्यांनी सांगितले.सैनिकाचे जीवन सर्वसामान्य माणसापेक्षा कितीतरी पटीने वेगळे असते. सैनिक देशाच्या सीमांचे रक्षणासाठी डोळ्यांत तेल घालून आपले कुटुंब, कौटुंबिक भावना, सुख-चैन अशा सर्व गोष्टी विसरून केवळ देशप्रेमाखातर देशसेवेचे व्रत घेत सैनिकी धर्म निभावण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. भारतीय सेनेच्या इतिहासात स्वातंत्र्यापासून आतापर्यंत अशा अनेक शूरवीरांच्या शौर्यगाथा इतरांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या असल्याचे आगाशे यांनी यावेळी अधोरेखित केले.आजचे व्याख्यानवक्ते : कवी संदीप जगतापविषय : शिवशाही ते लोकशाही

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान