शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
4
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
5
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
6
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
7
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
8
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
10
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
11
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
12
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
13
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
14
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
15
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
16
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
17
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
18
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
19
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
20
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

कनकापूरच्या शेतकऱ्याचे जडले वृक्षवल्लीशी नाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 00:29 IST

देवळा : दरवर्षी पर्यावरण दिनाच्या दिवशी मोठ्या उत्साहाने हजारो वृक्षांची लागवड करून पर्यावरणाविषयीची तळमळ व प्रेम व्यक्त करण्यात येते; ...

ठळक मुद्देचार वर्षांपासून शेतात साजरा होताहेत वृक्षांचे वाढदिवस

देवळा : दरवर्षी पर्यावरण दिनाच्या दिवशी मोठ्या उत्साहाने हजारो वृक्षांची लागवड करून पर्यावरणाविषयीची तळमळ व प्रेम व्यक्त करण्यात येते; परंतु नंतर लागवड केलेल्या वृक्षांचे खरेच संगोपन केले जाते का, हा संशोधनाचा विषय आहे; परंतु कनकापूर येथील शेतकरी चार वर्षांपासून स्वतः लागवड केलेल्या वृक्षांचा दरवर्षी वाढदिवस साजरा करून ह्यवृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरेह्ण या काव्यपंक्तींची प्रचिती आणून देत आहेत.कनकापूर येथील शेतकरी बापू शिंदे हे दरवर्षी आपल्या शेताच्या बांधावर आंबा, सीताफळ, आवळा, वड, पिंपळ आदी देशी वृक्षांची लागवड करतात. लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन व संरक्षण काटेकोरपणे केल्यामुळे सर्व झाडे जगली आहेत. त्या झाडांचा दरवर्षी ते वाढदिवस साजरा करतात, शिंदे यांची पत्नी प्राजक्ता, मुले इश्वर व साक्षी असे कुटुंब मिळून त्या झाडांची पूजा करून त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन वृक्षांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. तसेच नवीन झाडांची लागवड करतात. चार वर्षांपासून हा उपक्रम शिंदे आपल्या शेतात राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आहेत.शेतातील सामायिक बांध व हद्दीच्या वादांमुळे बांधावरील झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल झाली आहे. ग्रामीण भागात शेतातील बांधावर असलेली झाडे मोठ्या प्रमाणात नामशेष झाल्यामुळे काही शेतात सावलीसाठीदेखील झाड शिल्लक राहिलेले नसून, अशी शेते ओकीबोकी दिसू लागली आहेत. झाडांच्या आसऱ्याला येणारे विविध पक्षी, मधमाश्यांसारखे कीटक हे घटक महत्त्वाचे व शेतीसाठी पूरक आहेत. शेतीसाठी पर्यावरणाच्या साखळीतील असे महत्त्वाचे घटक नामशेष झाल्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून, पूर्वीच्या तुलनेत शेतातील पिकांवर विविध प्रकारच्या रोगराई व किडींना पिके बळी पडत आहेत.शेताच्या बांधावरील झाडांचे पर्यावरणाच्या साखळीतील महत्त्व व शेती उत्पादनात होणारा फायदा, तसेच झाडांमुळे शेतात निर्माण होणारे आल्हाददायक वातावरण आदी गोष्टींचे महत्त्व लक्षात आले. सेंद्रिय शेतीला आता महत्त्व प्राप्त होत असून, बांधावरील झाडांची त्यात महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे. शेतीचे आरोग्य हे बांधावर असलेल्या झाडांवर अवलंबून असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने दरवर्षी बांधावर किमान पाच झाडे लावून त्यांचे संगोपन करून पर्यावरणाला हातभार लावावा.- बापू शिंदे , शेतकरी, कनकापूर 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती