शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
2
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
3
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
4
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
5
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
6
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
7
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
8
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
9
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
10
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
11
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
12
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
13
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
14
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
15
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
16
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
17
Ola Electric ला सरकारकडून मिळणार ३६६.७८ कोटी रुपयांचा मोठा दिलासा; शेअरमध्ये जोरदार तेजी, जाणून घ्या
18
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावमध्ये एमआयएम-काँग्रेस युतीचा प्रयोग; वरिष्ठांच्या हालचाली, जागा वाटपाचीही चर्चा
19
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
20
क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल; वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव
Daily Top 2Weekly Top 5

कनकापूरच्या शेतकऱ्याचे जडले वृक्षवल्लीशी नाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 00:29 IST

देवळा : दरवर्षी पर्यावरण दिनाच्या दिवशी मोठ्या उत्साहाने हजारो वृक्षांची लागवड करून पर्यावरणाविषयीची तळमळ व प्रेम व्यक्त करण्यात येते; ...

ठळक मुद्देचार वर्षांपासून शेतात साजरा होताहेत वृक्षांचे वाढदिवस

देवळा : दरवर्षी पर्यावरण दिनाच्या दिवशी मोठ्या उत्साहाने हजारो वृक्षांची लागवड करून पर्यावरणाविषयीची तळमळ व प्रेम व्यक्त करण्यात येते; परंतु नंतर लागवड केलेल्या वृक्षांचे खरेच संगोपन केले जाते का, हा संशोधनाचा विषय आहे; परंतु कनकापूर येथील शेतकरी चार वर्षांपासून स्वतः लागवड केलेल्या वृक्षांचा दरवर्षी वाढदिवस साजरा करून ह्यवृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरेह्ण या काव्यपंक्तींची प्रचिती आणून देत आहेत.कनकापूर येथील शेतकरी बापू शिंदे हे दरवर्षी आपल्या शेताच्या बांधावर आंबा, सीताफळ, आवळा, वड, पिंपळ आदी देशी वृक्षांची लागवड करतात. लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन व संरक्षण काटेकोरपणे केल्यामुळे सर्व झाडे जगली आहेत. त्या झाडांचा दरवर्षी ते वाढदिवस साजरा करतात, शिंदे यांची पत्नी प्राजक्ता, मुले इश्वर व साक्षी असे कुटुंब मिळून त्या झाडांची पूजा करून त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन वृक्षांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. तसेच नवीन झाडांची लागवड करतात. चार वर्षांपासून हा उपक्रम शिंदे आपल्या शेतात राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आहेत.शेतातील सामायिक बांध व हद्दीच्या वादांमुळे बांधावरील झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल झाली आहे. ग्रामीण भागात शेतातील बांधावर असलेली झाडे मोठ्या प्रमाणात नामशेष झाल्यामुळे काही शेतात सावलीसाठीदेखील झाड शिल्लक राहिलेले नसून, अशी शेते ओकीबोकी दिसू लागली आहेत. झाडांच्या आसऱ्याला येणारे विविध पक्षी, मधमाश्यांसारखे कीटक हे घटक महत्त्वाचे व शेतीसाठी पूरक आहेत. शेतीसाठी पर्यावरणाच्या साखळीतील असे महत्त्वाचे घटक नामशेष झाल्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून, पूर्वीच्या तुलनेत शेतातील पिकांवर विविध प्रकारच्या रोगराई व किडींना पिके बळी पडत आहेत.शेताच्या बांधावरील झाडांचे पर्यावरणाच्या साखळीतील महत्त्व व शेती उत्पादनात होणारा फायदा, तसेच झाडांमुळे शेतात निर्माण होणारे आल्हाददायक वातावरण आदी गोष्टींचे महत्त्व लक्षात आले. सेंद्रिय शेतीला आता महत्त्व प्राप्त होत असून, बांधावरील झाडांची त्यात महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे. शेतीचे आरोग्य हे बांधावर असलेल्या झाडांवर अवलंबून असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने दरवर्षी बांधावर किमान पाच झाडे लावून त्यांचे संगोपन करून पर्यावरणाला हातभार लावावा.- बापू शिंदे , शेतकरी, कनकापूर 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती