शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कनकापूरच्या शेतकऱ्याचे जडले वृक्षवल्लीशी नाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 00:29 IST

देवळा : दरवर्षी पर्यावरण दिनाच्या दिवशी मोठ्या उत्साहाने हजारो वृक्षांची लागवड करून पर्यावरणाविषयीची तळमळ व प्रेम व्यक्त करण्यात येते; ...

ठळक मुद्देचार वर्षांपासून शेतात साजरा होताहेत वृक्षांचे वाढदिवस

देवळा : दरवर्षी पर्यावरण दिनाच्या दिवशी मोठ्या उत्साहाने हजारो वृक्षांची लागवड करून पर्यावरणाविषयीची तळमळ व प्रेम व्यक्त करण्यात येते; परंतु नंतर लागवड केलेल्या वृक्षांचे खरेच संगोपन केले जाते का, हा संशोधनाचा विषय आहे; परंतु कनकापूर येथील शेतकरी चार वर्षांपासून स्वतः लागवड केलेल्या वृक्षांचा दरवर्षी वाढदिवस साजरा करून ह्यवृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरेह्ण या काव्यपंक्तींची प्रचिती आणून देत आहेत.कनकापूर येथील शेतकरी बापू शिंदे हे दरवर्षी आपल्या शेताच्या बांधावर आंबा, सीताफळ, आवळा, वड, पिंपळ आदी देशी वृक्षांची लागवड करतात. लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन व संरक्षण काटेकोरपणे केल्यामुळे सर्व झाडे जगली आहेत. त्या झाडांचा दरवर्षी ते वाढदिवस साजरा करतात, शिंदे यांची पत्नी प्राजक्ता, मुले इश्वर व साक्षी असे कुटुंब मिळून त्या झाडांची पूजा करून त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन वृक्षांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. तसेच नवीन झाडांची लागवड करतात. चार वर्षांपासून हा उपक्रम शिंदे आपल्या शेतात राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आहेत.शेतातील सामायिक बांध व हद्दीच्या वादांमुळे बांधावरील झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल झाली आहे. ग्रामीण भागात शेतातील बांधावर असलेली झाडे मोठ्या प्रमाणात नामशेष झाल्यामुळे काही शेतात सावलीसाठीदेखील झाड शिल्लक राहिलेले नसून, अशी शेते ओकीबोकी दिसू लागली आहेत. झाडांच्या आसऱ्याला येणारे विविध पक्षी, मधमाश्यांसारखे कीटक हे घटक महत्त्वाचे व शेतीसाठी पूरक आहेत. शेतीसाठी पर्यावरणाच्या साखळीतील असे महत्त्वाचे घटक नामशेष झाल्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून, पूर्वीच्या तुलनेत शेतातील पिकांवर विविध प्रकारच्या रोगराई व किडींना पिके बळी पडत आहेत.शेताच्या बांधावरील झाडांचे पर्यावरणाच्या साखळीतील महत्त्व व शेती उत्पादनात होणारा फायदा, तसेच झाडांमुळे शेतात निर्माण होणारे आल्हाददायक वातावरण आदी गोष्टींचे महत्त्व लक्षात आले. सेंद्रिय शेतीला आता महत्त्व प्राप्त होत असून, बांधावरील झाडांची त्यात महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे. शेतीचे आरोग्य हे बांधावर असलेल्या झाडांवर अवलंबून असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने दरवर्षी बांधावर किमान पाच झाडे लावून त्यांचे संगोपन करून पर्यावरणाला हातभार लावावा.- बापू शिंदे , शेतकरी, कनकापूर 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती